शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची ऊस पिकावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ज्या ऊसपिकाने राज्य शासनाची तिजोरी विविध करांनी भरली व राज्याच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तूट भरून काढली; त्या ऊस पिकावर शासनाची वक्रदृष्टी कायम आहे. आघाडी शासनाने जे केले तेच विद्यमान शासनही करत असल्याचे चित्र शासनाने याहीवर्षी ऊस पिकाला पीक विमा योजनेतून वगळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया ऊस उत्पादकांतून व्यक्त ...

ठळक मुद्देअतिपाऊस झाल्याने उसाच्या हेक्टरी उत्पादनात मोठी घट
लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : ज्या ऊसपिकाने राज्य शासनाची तिजोरी विविध करांनी भरली व राज्याच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तूट भरून काढली; त्या ऊस पिकावर शासनाची वक्रदृष्टी कायम आहे. आघाडी शासनाने जे केले तेच विद्यमान शासनही करत असल्याचे चित्र शासनाने याहीवर्षी ऊस पिकाला पीक विमा योजनेतून वगळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया ऊस उत्पादकांतून व्यक्त होत आहेत.‘अच्छे दिन’ची घोषणा करत शेतकरी व जनमानसावर मोहिनी घालत केंद्रातच काय राज्यातही सत्तेत आलेल्या भाजप शासनाने ऊस उत्पादकांना म्हणावे तसे कृतीतून ‘अच्छे दिन’ दाखवून दिलेले नाही. काही दिवसांपूर्वी ऊसशेतीसाठी ठिबक पद्धतीचा वापर बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आले. गेली अनेक वर्षे ऊस उत्पादक शेतकºयांची ऊस पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करावा म्हणून अनेक वर्षे मागणी होत आहे. किमान विद्यमान भाजप शासन तरी ऊस पिकाची यावर्षी पीक विमा योजनेत समावेश होईल, अशी आशा होती; पण याही वर्षी ऊस पिकाला विमा योजनेतून वगळल्याने पुन्हा ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात ऊस पीक प्रमुख पीक आहे. या पिकाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील ५० टक्के क्षेत्र आहे. यावर्षी ऊसपिकाखाली जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हंगाम २००३मध्ये मावा किडीने हाहाकार माजविला होता. यानंतरही मावा किडीने सलग तीन वर्षे धुमाकूळ घातला होता. या तीन वर्षांत ऊस उत्पादक शेतकºयांचे किमान ३० ते कमाल ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. यावेळी आघाडी शासनाने अगदी नाममात्र नुकसानभरपाई देऊन ऊस उत्पादकांची बोळवण केली. यानंतर अतिपावसाने ऊस उत्पादक नदीकाठचे ऊस पीक गेल्याने मेटाकुटीला आला. गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदीमुळे ऊस पीक पाण्याअभावी वाळली तर पावसाळ्यात अतिपाऊस झाल्याने उसाच्या हेक्टरी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना तुटपुंजी मदत केली पण तीही विविध निकषात अडकल्याने शेतकरी निराश झाले. जर ऊस पिकाला विम्याचे संरक्षण असते तर ऊस उत्पादक शेतकरी वाचला असता.आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी शासनाने उसाच्या पट्ट्यावर आपले राजकारण सांभाळून ४० वर्षे सत्ता भोगली. ऊस व साखर कारखाने ही दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद समजली जाते. यालाच सुरुंग लावला तर राजकारणात या दोन पक्षांची मोठी पीछेहाट होईल हे लक्षात घेवूनच विद्यमान भाजप शासनाकडून वाटचाल सुरू आहे. म्हणूनच याही वर्र्षी उसावर शासनाची वक्रदृष्टी असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.