शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शासनाची ऊस पिकावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ज्या ऊसपिकाने राज्य शासनाची तिजोरी विविध करांनी भरली व राज्याच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तूट भरून काढली; त्या ऊस पिकावर शासनाची वक्रदृष्टी कायम आहे. आघाडी शासनाने जे केले तेच विद्यमान शासनही करत असल्याचे चित्र शासनाने याहीवर्षी ऊस पिकाला पीक विमा योजनेतून वगळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया ऊस उत्पादकांतून व्यक्त ...

ठळक मुद्देअतिपाऊस झाल्याने उसाच्या हेक्टरी उत्पादनात मोठी घट
लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : ज्या ऊसपिकाने राज्य शासनाची तिजोरी विविध करांनी भरली व राज्याच्या अर्थसंकल्पातील आर्थिक तूट भरून काढली; त्या ऊस पिकावर शासनाची वक्रदृष्टी कायम आहे. आघाडी शासनाने जे केले तेच विद्यमान शासनही करत असल्याचे चित्र शासनाने याहीवर्षी ऊस पिकाला पीक विमा योजनेतून वगळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया ऊस उत्पादकांतून व्यक्त होत आहेत.‘अच्छे दिन’ची घोषणा करत शेतकरी व जनमानसावर मोहिनी घालत केंद्रातच काय राज्यातही सत्तेत आलेल्या भाजप शासनाने ऊस उत्पादकांना म्हणावे तसे कृतीतून ‘अच्छे दिन’ दाखवून दिलेले नाही. काही दिवसांपूर्वी ऊसशेतीसाठी ठिबक पद्धतीचा वापर बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आले. गेली अनेक वर्षे ऊस उत्पादक शेतकºयांची ऊस पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करावा म्हणून अनेक वर्षे मागणी होत आहे. किमान विद्यमान भाजप शासन तरी ऊस पिकाची यावर्षी पीक विमा योजनेत समावेश होईल, अशी आशा होती; पण याही वर्षी ऊस पिकाला विमा योजनेतून वगळल्याने पुन्हा ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात ऊस पीक प्रमुख पीक आहे. या पिकाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील ५० टक्के क्षेत्र आहे. यावर्षी ऊसपिकाखाली जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हंगाम २००३मध्ये मावा किडीने हाहाकार माजविला होता. यानंतरही मावा किडीने सलग तीन वर्षे धुमाकूळ घातला होता. या तीन वर्षांत ऊस उत्पादक शेतकºयांचे किमान ३० ते कमाल ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. यावेळी आघाडी शासनाने अगदी नाममात्र नुकसानभरपाई देऊन ऊस उत्पादकांची बोळवण केली. यानंतर अतिपावसाने ऊस उत्पादक नदीकाठचे ऊस पीक गेल्याने मेटाकुटीला आला. गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतीच्या पाण्यासाठी उपसाबंदीमुळे ऊस पीक पाण्याअभावी वाळली तर पावसाळ्यात अतिपाऊस झाल्याने उसाच्या हेक्टरी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. यावेळी शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना तुटपुंजी मदत केली पण तीही विविध निकषात अडकल्याने शेतकरी निराश झाले. जर ऊस पिकाला विम्याचे संरक्षण असते तर ऊस उत्पादक शेतकरी वाचला असता.आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी शासनाने उसाच्या पट्ट्यावर आपले राजकारण सांभाळून ४० वर्षे सत्ता भोगली. ऊस व साखर कारखाने ही दोन्ही काँग्रेसची राजकीय ताकद समजली जाते. यालाच सुरुंग लावला तर राजकारणात या दोन पक्षांची मोठी पीछेहाट होईल हे लक्षात घेवूनच विद्यमान भाजप शासनाकडून वाटचाल सुरू आहे. म्हणूनच याही वर्र्षी उसावर शासनाची वक्रदृष्टी असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.