शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

जिल्ह्यात आजपासून सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला ...

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला बंद झाल्यानंंतर ग्राहकांना घरी जाण्यासाठी एक तासाचा वेळ राहील. त्यानंतर संचारबंदी असेल. याची शहर, जिल्ह्यात आज (मंगळवार)पासून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सरकारच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्या स्तरावर आला आहे. यामुळे काही निर्बंध शिथील झाले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तरीही जमावबंदी आणि सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम असेल. राजकीय कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गाव पातळीवरील कार्यक्रमांची माहिती पोलीस पाटलांनी देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई होईल.

शहरातील मंगल कार्यालयांनी गर्दीचे कार्यक्रम स्वीकारू नयेत, अशा नोटीस देण्यात येत आहेत. रात्रीच्यावेळी हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा आहे. मात्र, असे काही ठिकाणी होत नसल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेतली आहे. दुकानदार, व्यापाऱ्यांनी दुकानात ग्राहकांना विनामास्क प्रवेश देऊ नये. एखादा ग्राहक विनामास्क आल्यास त्याला आपल्याकडील मास्क द्यावा. गर्दीमुळे पॉझिटिव्हिटी दर वाढल्यास पुन्हा जिल्हा चौथ्या स्तरावर जाईल. त्यानंतर सरसकट दुकाने उघडण्यावर निर्बंध येतील. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी जबाबदारीने वागावे. गर्दी टाळण्यासाठी धबधबे, पर्यटन स्थळांवरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच कारवाईची मोहीमही तीव्र केली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

किती ही बेफिकिरी...

वारंवार सांगून, दंड करुनही आजही जिल्ह्यात रोज १,५०० जण विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विनामास्कच्या एकूण ८४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहन परवाना नसलेले, ट्रीपल सीट अशा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या १ लाख ७० हजार जणांवर कारवाई केल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

४०० पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु

जिल्ह्यात एकूण २,८०० पोलीस आहेत. सरकारच्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात ४०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. त्याची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.