शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

जिल्ह्यात आजपासून सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला ...

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला बंद झाल्यानंंतर ग्राहकांना घरी जाण्यासाठी एक तासाचा वेळ राहील. त्यानंतर संचारबंदी असेल. याची शहर, जिल्ह्यात आज (मंगळवार)पासून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सरकारच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्या स्तरावर आला आहे. यामुळे काही निर्बंध शिथील झाले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तरीही जमावबंदी आणि सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम असेल. राजकीय कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गाव पातळीवरील कार्यक्रमांची माहिती पोलीस पाटलांनी देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई होईल.

शहरातील मंगल कार्यालयांनी गर्दीचे कार्यक्रम स्वीकारू नयेत, अशा नोटीस देण्यात येत आहेत. रात्रीच्यावेळी हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा आहे. मात्र, असे काही ठिकाणी होत नसल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेतली आहे. दुकानदार, व्यापाऱ्यांनी दुकानात ग्राहकांना विनामास्क प्रवेश देऊ नये. एखादा ग्राहक विनामास्क आल्यास त्याला आपल्याकडील मास्क द्यावा. गर्दीमुळे पॉझिटिव्हिटी दर वाढल्यास पुन्हा जिल्हा चौथ्या स्तरावर जाईल. त्यानंतर सरसकट दुकाने उघडण्यावर निर्बंध येतील. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी जबाबदारीने वागावे. गर्दी टाळण्यासाठी धबधबे, पर्यटन स्थळांवरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच कारवाईची मोहीमही तीव्र केली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

किती ही बेफिकिरी...

वारंवार सांगून, दंड करुनही आजही जिल्ह्यात रोज १,५०० जण विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विनामास्कच्या एकूण ८४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहन परवाना नसलेले, ट्रीपल सीट अशा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या १ लाख ७० हजार जणांवर कारवाई केल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

४०० पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु

जिल्ह्यात एकूण २,८०० पोलीस आहेत. सरकारच्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात ४०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. त्याची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.