शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला ...

कोल्हापूर : कोरोना आजाराचा पॉझिटिव्हिटी दर कमी आल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. पण दुकाने दुपारी चारला बंद झाल्यानंंतर ग्राहकांना घरी जाण्यासाठी एक तासाचा वेळ राहील. त्यानंतर संचारबंदी असेल. याची शहर, जिल्ह्यात आज (मंगळवार)पासून कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सरकारच्या निकषानुसार जिल्हा तिसऱ्या स्तरावर आला आहे. यामुळे काही निर्बंध शिथील झाले आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तरीही जमावबंदी आणि सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम असेल. राजकीय कार्यक्रम, आंदोलन, मोर्चा, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गाव पातळीवरील कार्यक्रमांची माहिती पोलीस पाटलांनी देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई होईल.

शहरातील मंगल कार्यालयांनी गर्दीचे कार्यक्रम स्वीकारू नयेत, अशा नोटीस देण्यात येत आहेत. रात्रीच्यावेळी हॉटेलमधून केवळ पार्सल देण्याची मुभा आहे. मात्र, असे काही ठिकाणी होत नसल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेतली आहे. दुकानदार, व्यापाऱ्यांनी दुकानात ग्राहकांना विनामास्क प्रवेश देऊ नये. एखादा ग्राहक विनामास्क आल्यास त्याला आपल्याकडील मास्क द्यावा. गर्दीमुळे पॉझिटिव्हिटी दर वाढल्यास पुन्हा जिल्हा चौथ्या स्तरावर जाईल. त्यानंतर सरसकट दुकाने उघडण्यावर निर्बंध येतील. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी जबाबदारीने वागावे. गर्दी टाळण्यासाठी धबधबे, पर्यटन स्थळांवरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच कारवाईची मोहीमही तीव्र केली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

किती ही बेफिकिरी...

वारंवार सांगून, दंड करुनही आजही जिल्ह्यात रोज १,५०० जण विनामास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विनामास्कच्या एकूण ८४ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहन परवाना नसलेले, ट्रीपल सीट अशा वाहतूक नियमांचा भंग केलेल्या १ लाख ७० हजार जणांवर कारवाई केल्याचे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

४०० पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु

जिल्ह्यात एकूण २,८०० पोलीस आहेत. सरकारच्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात ४०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातील. त्याची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही बलकवडे यांनी सांगितले.