शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगाम सुरू, दराचा निर्णय अधांतरीच !

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

शेतकरी संभ्रमात : सरकारच्या कोर्टात चेंडू, शेतकरी संघटनांतही एकी नाही

आयुब मुल्ला- खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखाने वगळता सर्व कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यापैकी शाहू (कागल), गुरुदत्त (टाकळीवाडी) यांनी अनुक्रमे २५३० व २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली. अन्य कारखान्यांनी मात्र पहिली उचल जाहीर न करता हंगामाची सुरुवात केली आहे. एफआरपीचा चेंडू शासनाच्या कोर्टात असून, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एफआरपीसाठी काय तोडगा निघणार व ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, या संभ्रमात शेतकरी आहे. एकीकडे बहुतांश कारखाने सुरू होऊन दोन आठवडे झाली आहेत. मग नियमाचे काय, हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो.ऊस नियामक समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली. पण त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा यासंदर्भात समितीची बैठक होणार आहे. निर्णयाला विलंब लागत असला तरी कारखाने धडाक्यात हंगाम सुरू करीत आहेत. राज्याचा विचार करता उचल जाहीर न करता निम्म्या कारखान्यांनी सुमारे तीस लाख टन उसाचे गाळप केले आहे. आता शेतकरीही तोडणीस विरोध करताना दिसत नाही. कारण सरकार, संघटना, कारखानदार यांच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.ऊस दराची मागणी पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी २७०० रुपये, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये, किसान सभेने ३००० रुपये, तर बळिराजा संघटनेने ३५०० रुपये केली आहे. नियामक समितीच्या बैठकीत सदस्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. परंतु, हा निर्णयच आता सरकारच्या हाती गेला आहे. त्यामुळे खरी कसोटी पहायला मिळणार आहे, ती सरकारची.राज्य सरकारी बँकेने चालू वर्षी साखरेचे प्रतिक्विंटल मूल्यांकन केले आहे. चालू महिन्यासाठी ते २६३० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के कर्ज म्हणजे २२३५ रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. यामध्ये तोडणी वाहतूक व उत्पादन खर्च आदी वजा जाता पंधराशे रुपयांच्या आसपास पहिली उचल कारखाने देऊ शकतात, असे गणित समोर येते. मग संघटनांची मागणी व एफआरपीनुसार होणारे दर यामध्ये चार आकड्यांचा (बाराशे ते दोन हजार) इतका फरक पडतो. तो मिळताजुळता करण्याची वेळ सरकारवर आली आहे. एकीकडे एफआरपीनुसार दर व १४ दिवसांची पैसे मिळण्याची मुदत असा नियम आहे. तर दुसरीकडे कारखाने सुरु होऊन पंधरवडा गाठत आला अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे.विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा चांगला आहे. सन २०१३-१४ चा उतारा १२.८४ आहे. याचा विचार करता चांगला दर मिळणे इथल्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. ..गळितात आघाडी जिल्ह्यातील वारणा, दौलत, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला, भोगावती या कारखान्यांच्या गळीत हंगामास अद्याप वेग आलेला नाही. तर शाहू (कागल), छत्रपती राजाराम (क. बावडा), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा), शरद (नरंदे), डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा (बिद्री), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), जवाहर (हुपरी), दत्त (शिरोळ), दालमिया शुगर्स या कारखान्यांनी मात्र हंगाम सुरूकरून गळितात आघाडी घेतली आहे.