शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गळीत हंगाम सुरू, दराचा निर्णय अधांतरीच !

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

शेतकरी संभ्रमात : सरकारच्या कोर्टात चेंडू, शेतकरी संघटनांतही एकी नाही

आयुब मुल्ला- खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखाने वगळता सर्व कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यापैकी शाहू (कागल), गुरुदत्त (टाकळीवाडी) यांनी अनुक्रमे २५३० व २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली. अन्य कारखान्यांनी मात्र पहिली उचल जाहीर न करता हंगामाची सुरुवात केली आहे. एफआरपीचा चेंडू शासनाच्या कोर्टात असून, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एफआरपीसाठी काय तोडगा निघणार व ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, या संभ्रमात शेतकरी आहे. एकीकडे बहुतांश कारखाने सुरू होऊन दोन आठवडे झाली आहेत. मग नियमाचे काय, हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो.ऊस नियामक समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली. पण त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा यासंदर्भात समितीची बैठक होणार आहे. निर्णयाला विलंब लागत असला तरी कारखाने धडाक्यात हंगाम सुरू करीत आहेत. राज्याचा विचार करता उचल जाहीर न करता निम्म्या कारखान्यांनी सुमारे तीस लाख टन उसाचे गाळप केले आहे. आता शेतकरीही तोडणीस विरोध करताना दिसत नाही. कारण सरकार, संघटना, कारखानदार यांच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.ऊस दराची मागणी पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी २७०० रुपये, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये, किसान सभेने ३००० रुपये, तर बळिराजा संघटनेने ३५०० रुपये केली आहे. नियामक समितीच्या बैठकीत सदस्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. परंतु, हा निर्णयच आता सरकारच्या हाती गेला आहे. त्यामुळे खरी कसोटी पहायला मिळणार आहे, ती सरकारची.राज्य सरकारी बँकेने चालू वर्षी साखरेचे प्रतिक्विंटल मूल्यांकन केले आहे. चालू महिन्यासाठी ते २६३० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के कर्ज म्हणजे २२३५ रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. यामध्ये तोडणी वाहतूक व उत्पादन खर्च आदी वजा जाता पंधराशे रुपयांच्या आसपास पहिली उचल कारखाने देऊ शकतात, असे गणित समोर येते. मग संघटनांची मागणी व एफआरपीनुसार होणारे दर यामध्ये चार आकड्यांचा (बाराशे ते दोन हजार) इतका फरक पडतो. तो मिळताजुळता करण्याची वेळ सरकारवर आली आहे. एकीकडे एफआरपीनुसार दर व १४ दिवसांची पैसे मिळण्याची मुदत असा नियम आहे. तर दुसरीकडे कारखाने सुरु होऊन पंधरवडा गाठत आला अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे.विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा चांगला आहे. सन २०१३-१४ चा उतारा १२.८४ आहे. याचा विचार करता चांगला दर मिळणे इथल्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. ..गळितात आघाडी जिल्ह्यातील वारणा, दौलत, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला, भोगावती या कारखान्यांच्या गळीत हंगामास अद्याप वेग आलेला नाही. तर शाहू (कागल), छत्रपती राजाराम (क. बावडा), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा), शरद (नरंदे), डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा (बिद्री), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), जवाहर (हुपरी), दत्त (शिरोळ), दालमिया शुगर्स या कारखान्यांनी मात्र हंगाम सुरूकरून गळितात आघाडी घेतली आहे.