शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

गळीत हंगाम सुरू, दराचा निर्णय अधांतरीच !

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

शेतकरी संभ्रमात : सरकारच्या कोर्टात चेंडू, शेतकरी संघटनांतही एकी नाही

आयुब मुल्ला- खोची -कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखाने वगळता सर्व कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यापैकी शाहू (कागल), गुरुदत्त (टाकळीवाडी) यांनी अनुक्रमे २५३० व २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली. अन्य कारखान्यांनी मात्र पहिली उचल जाहीर न करता हंगामाची सुरुवात केली आहे. एफआरपीचा चेंडू शासनाच्या कोर्टात असून, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एफआरपीसाठी काय तोडगा निघणार व ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पैसे मिळणार का, या संभ्रमात शेतकरी आहे. एकीकडे बहुतांश कारखाने सुरू होऊन दोन आठवडे झाली आहेत. मग नियमाचे काय, हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो.ऊस नियामक समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली. पण त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा यासंदर्भात समितीची बैठक होणार आहे. निर्णयाला विलंब लागत असला तरी कारखाने धडाक्यात हंगाम सुरू करीत आहेत. राज्याचा विचार करता उचल जाहीर न करता निम्म्या कारखान्यांनी सुमारे तीस लाख टन उसाचे गाळप केले आहे. आता शेतकरीही तोडणीस विरोध करताना दिसत नाही. कारण सरकार, संघटना, कारखानदार यांच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.ऊस दराची मागणी पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी २७०० रुपये, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ३५०० रुपये, किसान सभेने ३००० रुपये, तर बळिराजा संघटनेने ३५०० रुपये केली आहे. नियामक समितीच्या बैठकीत सदस्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. परंतु, हा निर्णयच आता सरकारच्या हाती गेला आहे. त्यामुळे खरी कसोटी पहायला मिळणार आहे, ती सरकारची.राज्य सरकारी बँकेने चालू वर्षी साखरेचे प्रतिक्विंटल मूल्यांकन केले आहे. चालू महिन्यासाठी ते २६३० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के कर्ज म्हणजे २२३५ रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. यामध्ये तोडणी वाहतूक व उत्पादन खर्च आदी वजा जाता पंधराशे रुपयांच्या आसपास पहिली उचल कारखाने देऊ शकतात, असे गणित समोर येते. मग संघटनांची मागणी व एफआरपीनुसार होणारे दर यामध्ये चार आकड्यांचा (बाराशे ते दोन हजार) इतका फरक पडतो. तो मिळताजुळता करण्याची वेळ सरकारवर आली आहे. एकीकडे एफआरपीनुसार दर व १४ दिवसांची पैसे मिळण्याची मुदत असा नियम आहे. तर दुसरीकडे कारखाने सुरु होऊन पंधरवडा गाठत आला अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होणे साहजिकच आहे.विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा चांगला आहे. सन २०१३-१४ चा उतारा १२.८४ आहे. याचा विचार करता चांगला दर मिळणे इथल्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. ..गळितात आघाडी जिल्ह्यातील वारणा, दौलत, उदयसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला, भोगावती या कारखान्यांच्या गळीत हंगामास अद्याप वेग आलेला नाही. तर शाहू (कागल), छत्रपती राजाराम (क. बावडा), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा), शरद (नरंदे), डॉ. डी. वाय. पाटील, कुंभी-कासारी (कुडित्रे), दूधगंगा (बिद्री), गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी), जवाहर (हुपरी), दत्त (शिरोळ), दालमिया शुगर्स या कारखान्यांनी मात्र हंगाम सुरूकरून गळितात आघाडी घेतली आहे.