शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

ग्रामपंचायतीचे आज, बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये जोडण्या करण्यासाठी सदस्य ...

ग्रामपंचायतीचे आज, बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये जोडण्या करण्यासाठी सदस्य गुंतले आहेत. आचारसंहिता असल्याने कोणतेही मोठे निर्णय जिल्हा परिषद घेऊ शकत नाही. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रशासकीय मान्यता देऊन संपल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत येऊन फार काही निधी पदरात पडण्याची शक्यता नाही.

दुसरीकडे सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदत संपत आली आहे. २ जानेवारी २०२१ रोजी या पदाधिकाऱ्यांना एक वर्ष होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचेही वारे वाहत आहे. परिणामी जिल्हा परिषदेत येऊन काय करायचे, असा प्रश्न असल्याने अनेक सदस्य इकडे येण्यापेक्षा मतदारसंघात थांबण्याकडे लक्ष देत आहेत. नेत्यांनीही संबंधितांना आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

अशा परिस्थितीत आता सदस्यांची जिल्हा परिषदेतील उपस्थिती कमी झाली आहे. दिवसभर ठिय्या मारून बसणारे पदाधिकारीही आता कामापुरते येत आहेत. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या गावची निवडणूक लागली आहे. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यावर त्यांच्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राजू मगदूम यांची माणगावची निवडणूक लागल्याने तेदेखील जिल्हा परिषदेत आता फिरकेनासे झाले आहेत.