शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

By admin | Updated: June 18, 2015 00:39 IST

इचलकरंजी नगरपालिका : कारभाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत; नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील - इचलकरंजी --नगरपालिकेत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळेच नगरसेवकांत होणारे राडाचे प्रसंग घडत आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचे कामकाज चालविणाऱ्या नेतृत्वाने यावर नियंत्रण ठेऊन संबंधितांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नगरपालिका म्हणजे विकास-विधायक कामाचे केंद्र आणि नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्याची आवश्यकता आहे.साधारणत: शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेला जसा इतिहास आहे, तसे ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिले नगराध्यक्ष कै. बाळासाहेब चिवटे यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले. त्यामध्ये कै. पी. टी. कणसे, कै. रामभाऊ जगताप, कै. सदाशिवराव मुरदंडे, कै. सदाशिवराव सुलतानपुरे, कै. श्रीपतराव वडिंगे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींचा समावेश आहे. तर अशोकराव आरगे, अशोकराव जांभळे, शंकरराव पुजारी, रामकुमार मर्दा, हिंदुराव शेळके, राजीव आवळे, संजय आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, किशोरी आवाडे, मेघा चाळके, आदी मान्यवरांनी नगराध्यक्षपद आणि नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.नगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्याची परंपरा आहे. निवडणुकीनंतर सर्वच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन शहराच्या विकासासाठी एकत्रित येतात. एकजुटीने, एकसंघपणे दिशा ठरवून प्रगती साधली जाते. त्याकाळी वाद-विवाद होत असत; पण ते पालिका सभागृहात आपापल्या परीने नोंदविले जात. सभागृहात शाब्दिक चकमक, कागदांची फेकाफेक, माईकची आदळआपट होई; पण सभागृहाबाहेर एकदिलाने कामकाज चालविले जाई.अशा परंपरेला अलीकडील काळात मात्र गालबोट लागत आहे. काही नगरसेवकांच्या आग्रहाच्या अतिरेकामुळे वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. नगरसेवक विरूद्ध नगरसेवक आणि नगरसेवक विरूद्ध प्रशासन असे संघर्ष होत असताना टोकाची भूमिका घेतली जात आहे. शिवीगाळ, हाणामारी, रेटारेटी अशा घटनांमुळे नगरपालिकेच्या पावित्र्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता आत्मकेंद्रित होऊन विचार करावा. नगरसेवकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा बसून विकास-प्रगती साधत, शहराचे हित जोपासत कामकाज चालवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गोपनीय अहवालाची चर्चानगरपालिकेत काही नगरसेवक मक्तेदार असल्याचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे पालिकेची घडी विस्कटली. कामांचा दर्जा ढासळला. ‘टक्का’ संस्कृती बोकाळली. परिणामी नगरपालिकेत कमालीचा गोंधळ वाढीस लागला. याची दखल घेत एक महिन्यापूर्वी खुद्द आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेत येऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार यांनी मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे सूचविले. त्याचीही विचारणा नागरिकांतून होत आहे.