शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

By admin | Updated: June 18, 2015 00:39 IST

इचलकरंजी नगरपालिका : कारभाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत; नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील - इचलकरंजी --नगरपालिकेत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळेच नगरसेवकांत होणारे राडाचे प्रसंग घडत आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचे कामकाज चालविणाऱ्या नेतृत्वाने यावर नियंत्रण ठेऊन संबंधितांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नगरपालिका म्हणजे विकास-विधायक कामाचे केंद्र आणि नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्याची आवश्यकता आहे.साधारणत: शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेला जसा इतिहास आहे, तसे ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिले नगराध्यक्ष कै. बाळासाहेब चिवटे यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले. त्यामध्ये कै. पी. टी. कणसे, कै. रामभाऊ जगताप, कै. सदाशिवराव मुरदंडे, कै. सदाशिवराव सुलतानपुरे, कै. श्रीपतराव वडिंगे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींचा समावेश आहे. तर अशोकराव आरगे, अशोकराव जांभळे, शंकरराव पुजारी, रामकुमार मर्दा, हिंदुराव शेळके, राजीव आवळे, संजय आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, किशोरी आवाडे, मेघा चाळके, आदी मान्यवरांनी नगराध्यक्षपद आणि नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.नगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्याची परंपरा आहे. निवडणुकीनंतर सर्वच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन शहराच्या विकासासाठी एकत्रित येतात. एकजुटीने, एकसंघपणे दिशा ठरवून प्रगती साधली जाते. त्याकाळी वाद-विवाद होत असत; पण ते पालिका सभागृहात आपापल्या परीने नोंदविले जात. सभागृहात शाब्दिक चकमक, कागदांची फेकाफेक, माईकची आदळआपट होई; पण सभागृहाबाहेर एकदिलाने कामकाज चालविले जाई.अशा परंपरेला अलीकडील काळात मात्र गालबोट लागत आहे. काही नगरसेवकांच्या आग्रहाच्या अतिरेकामुळे वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. नगरसेवक विरूद्ध नगरसेवक आणि नगरसेवक विरूद्ध प्रशासन असे संघर्ष होत असताना टोकाची भूमिका घेतली जात आहे. शिवीगाळ, हाणामारी, रेटारेटी अशा घटनांमुळे नगरपालिकेच्या पावित्र्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता आत्मकेंद्रित होऊन विचार करावा. नगरसेवकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा बसून विकास-प्रगती साधत, शहराचे हित जोपासत कामकाज चालवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गोपनीय अहवालाची चर्चानगरपालिकेत काही नगरसेवक मक्तेदार असल्याचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे पालिकेची घडी विस्कटली. कामांचा दर्जा ढासळला. ‘टक्का’ संस्कृती बोकाळली. परिणामी नगरपालिकेत कमालीचा गोंधळ वाढीस लागला. याची दखल घेत एक महिन्यापूर्वी खुद्द आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेत येऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार यांनी मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे सूचविले. त्याचीही विचारणा नागरिकांतून होत आहे.