शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

By admin | Updated: June 18, 2015 00:39 IST

इचलकरंजी नगरपालिका : कारभाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत; नागरिकांची अपेक्षा

राजाराम पाटील - इचलकरंजी --नगरपालिकेत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळेच नगरसेवकांत होणारे राडाचे प्रसंग घडत आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचे कामकाज चालविणाऱ्या नेतृत्वाने यावर नियंत्रण ठेऊन संबंधितांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नगरपालिका म्हणजे विकास-विधायक कामाचे केंद्र आणि नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्याची आवश्यकता आहे.साधारणत: शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेला जसा इतिहास आहे, तसे ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिले नगराध्यक्ष कै. बाळासाहेब चिवटे यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले. त्यामध्ये कै. पी. टी. कणसे, कै. रामभाऊ जगताप, कै. सदाशिवराव मुरदंडे, कै. सदाशिवराव सुलतानपुरे, कै. श्रीपतराव वडिंगे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींचा समावेश आहे. तर अशोकराव आरगे, अशोकराव जांभळे, शंकरराव पुजारी, रामकुमार मर्दा, हिंदुराव शेळके, राजीव आवळे, संजय आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, किशोरी आवाडे, मेघा चाळके, आदी मान्यवरांनी नगराध्यक्षपद आणि नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.नगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्याची परंपरा आहे. निवडणुकीनंतर सर्वच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन शहराच्या विकासासाठी एकत्रित येतात. एकजुटीने, एकसंघपणे दिशा ठरवून प्रगती साधली जाते. त्याकाळी वाद-विवाद होत असत; पण ते पालिका सभागृहात आपापल्या परीने नोंदविले जात. सभागृहात शाब्दिक चकमक, कागदांची फेकाफेक, माईकची आदळआपट होई; पण सभागृहाबाहेर एकदिलाने कामकाज चालविले जाई.अशा परंपरेला अलीकडील काळात मात्र गालबोट लागत आहे. काही नगरसेवकांच्या आग्रहाच्या अतिरेकामुळे वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. नगरसेवक विरूद्ध नगरसेवक आणि नगरसेवक विरूद्ध प्रशासन असे संघर्ष होत असताना टोकाची भूमिका घेतली जात आहे. शिवीगाळ, हाणामारी, रेटारेटी अशा घटनांमुळे नगरपालिकेच्या पावित्र्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता आत्मकेंद्रित होऊन विचार करावा. नगरसेवकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा बसून विकास-प्रगती साधत, शहराचे हित जोपासत कामकाज चालवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गोपनीय अहवालाची चर्चानगरपालिकेत काही नगरसेवक मक्तेदार असल्याचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे पालिकेची घडी विस्कटली. कामांचा दर्जा ढासळला. ‘टक्का’ संस्कृती बोकाळली. परिणामी नगरपालिकेत कमालीचा गोंधळ वाढीस लागला. याची दखल घेत एक महिन्यापूर्वी खुद्द आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेत येऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार यांनी मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे सूचविले. त्याचीही विचारणा नागरिकांतून होत आहे.