शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

कोरोनामुळे उमेदवारांना ५० जणांची सभा घेण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:20 IST

शिरोळ : कोरोनामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बदल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांची दमछाक ...

शिरोळ : कोरोनामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक बदल झाले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांची दमछाक सुरू असतानाच निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांना एकावेळी केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार आहे. शिवाय एक चारचाकी वाहन व दोन दुचाकींवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईच्या सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने गावोगावी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांमध्ये निरुत्साह जाणवत होता. तो बाजूला ठेवून आता पॅनेल प्रमुखांकडून बहुमतासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनेक बदल केले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीत सभा घेण्यासाठी ५० जणांची मर्यादा आणण्यात आली आहे. पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. एकाच वेळी केवळ पाच कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करू शकतात. निवडणुकीच्या निमित्ताने मिरवणूक, मेळावा यांबाबत अनेक निकष लावण्यात आले आहेत. कोरोनाचे नियम पाळूनच प्रचार करावा लागणार आहे.

कोट - उमेदवारांना केवळ ५० जणांची सभा घेण्याची परवानगी आहे. छाननीपूर्वी आचारसंहितेच्या निकषांबाबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.

- शंकर कवितके, आचारसंहिता पथकप्रमुख