शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

करंजिवणे-हळदवडे ग्रामस्थांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:29 IST

पाण्याच्या हक्काचा प्रश्न : हळदवडेकरांचा रास्ता रोको; करंजिवणेकरांचा ठिय्या

मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या तलावातून गुरुवारी संध्याकाळी हळदवडे गावासाठी कालव्यातून सोडलेले पाणी बेकायदेशीर आहे, असा आरोप करून पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारून ते पाणी तत्काळ बंद करण्यास करंजिवणे ग्रामस्थांनी भाग पाडले. ही बातमी ज्यावेळी हळदवडे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी त्यांनी या प्रकारचा निषेध करीत रात्री उशिरा कापशी-मुरगूड रस्त्यावर रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने रास्ता रोको रात्री साडेअकरा वाजता हळदवडेकरांनी स्थगित केला. शुक्रवारी सकाळी मात्र करंजिवणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी मुरगूडच्या पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी हळदवडे गावातील ग्रामस्थांनी आपल्याला पाणी पाहिजे, असे सांगून निढोरी येथील पाटबंधारे कार्यालयात रितसर पाणीपट्टी भरून कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी रितसर या तलावातून पाणी सोडले होते. सुमारे दोन तासांनंतर ही बातमी करंजिवणे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तलावावर जमले आणि तेथूनच पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांच्याशी संपर्क साधला आणि कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले पाहून, दारवाडकरांनी कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद केले.रितसर परवानगी घेऊन व पाणीपट्टी भरून सोडलेले पाणी करंजिवणेकरांनी बंद केले. ही बातमी हळदवडे गावात समजली. त्यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले आणि गुरुवारी रात्री १0 वाजता मुरगूड-कापशी रस्त्यावर एकत्र येऊन अचानक रास्ता रोको सुरू केला. शुक्रवारी दोन्ही गावांतील नागरिकांनी सकाळी दहा वाजता मुरगूड पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या मांडला. यामध्ये करंजिवणे ग्रामस्थांची संख्या जास्त होती. दरम्यान, पाटबंधारे अधिकारी डी. बी. दारवाडकर, उत्तम कापशे पोलिस ठाण्यात आल्यानंतर करंजिवणे ग्रामस्थांनी त्याच्यावर पैसे घेऊन तुम्ही कालव्यातून पाणी सोडला असल्याचा आरोप केला. दरम्यान, करंजिवणेकर ग्रामस्थांनी कालव्यातून पाणी सोडून हळदवडे ग्रामस्थ आपल्या खासगी विहिरी भरून घेतात. त्यामुळे पाणी अजिबात सोडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तलावात पुरेशे पाणीसध्या तलावात समाधानकारक पाणीसाठा असून, सर्व गावांना पिण्याचे पाणी देऊन हळदवडे आणि करंजिवणे या दोन्ही गावांतील शेतीला योग्य पाणी नियोजन करून देता येईल; पण असा वाद निर्माण होत असल्याने नाइलाजास्तव कालव्यातील पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती डी. बी. दारवाडकर यांनी दिली. पाणी संस्था बोगस असल्याचा आरोपदरम्यान, तलावातील पाणी शेतीला देण्यासाठी किसान पाणी संस्था या नावाने संस्था स्थापन केली होती. यामध्ये हळदीचे सहा सदस्य आणि हळदवडे व करंजिवणे गावांतील तीन सदस्य होते. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सदरची संस्था बंदच असून, या संस्थेच्या नावाखाली बोगस कामे होत असल्याचा आरोप हळदवडे ग्रामस्थांनी केला आहे.