शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

करंजिवणे-हळदवडे ग्रामस्थांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:29 IST

पाण्याच्या हक्काचा प्रश्न : हळदवडेकरांचा रास्ता रोको; करंजिवणेकरांचा ठिय्या

मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या तलावातून गुरुवारी संध्याकाळी हळदवडे गावासाठी कालव्यातून सोडलेले पाणी बेकायदेशीर आहे, असा आरोप करून पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारून ते पाणी तत्काळ बंद करण्यास करंजिवणे ग्रामस्थांनी भाग पाडले. ही बातमी ज्यावेळी हळदवडे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी त्यांनी या प्रकारचा निषेध करीत रात्री उशिरा कापशी-मुरगूड रस्त्यावर रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने रास्ता रोको रात्री साडेअकरा वाजता हळदवडेकरांनी स्थगित केला. शुक्रवारी सकाळी मात्र करंजिवणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी मुरगूडच्या पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी हळदवडे गावातील ग्रामस्थांनी आपल्याला पाणी पाहिजे, असे सांगून निढोरी येथील पाटबंधारे कार्यालयात रितसर पाणीपट्टी भरून कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी रितसर या तलावातून पाणी सोडले होते. सुमारे दोन तासांनंतर ही बातमी करंजिवणे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तलावावर जमले आणि तेथूनच पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांच्याशी संपर्क साधला आणि कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले पाहून, दारवाडकरांनी कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद केले.रितसर परवानगी घेऊन व पाणीपट्टी भरून सोडलेले पाणी करंजिवणेकरांनी बंद केले. ही बातमी हळदवडे गावात समजली. त्यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले आणि गुरुवारी रात्री १0 वाजता मुरगूड-कापशी रस्त्यावर एकत्र येऊन अचानक रास्ता रोको सुरू केला. शुक्रवारी दोन्ही गावांतील नागरिकांनी सकाळी दहा वाजता मुरगूड पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या मांडला. यामध्ये करंजिवणे ग्रामस्थांची संख्या जास्त होती. दरम्यान, पाटबंधारे अधिकारी डी. बी. दारवाडकर, उत्तम कापशे पोलिस ठाण्यात आल्यानंतर करंजिवणे ग्रामस्थांनी त्याच्यावर पैसे घेऊन तुम्ही कालव्यातून पाणी सोडला असल्याचा आरोप केला. दरम्यान, करंजिवणेकर ग्रामस्थांनी कालव्यातून पाणी सोडून हळदवडे ग्रामस्थ आपल्या खासगी विहिरी भरून घेतात. त्यामुळे पाणी अजिबात सोडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.तलावात पुरेशे पाणीसध्या तलावात समाधानकारक पाणीसाठा असून, सर्व गावांना पिण्याचे पाणी देऊन हळदवडे आणि करंजिवणे या दोन्ही गावांतील शेतीला योग्य पाणी नियोजन करून देता येईल; पण असा वाद निर्माण होत असल्याने नाइलाजास्तव कालव्यातील पाणीपुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती डी. बी. दारवाडकर यांनी दिली. पाणी संस्था बोगस असल्याचा आरोपदरम्यान, तलावातील पाणी शेतीला देण्यासाठी किसान पाणी संस्था या नावाने संस्था स्थापन केली होती. यामध्ये हळदीचे सहा सदस्य आणि हळदवडे व करंजिवणे गावांतील तीन सदस्य होते. पण, गेल्या अनेक वर्षांपासून सदरची संस्था बंदच असून, या संस्थेच्या नावाखाली बोगस कामे होत असल्याचा आरोप हळदवडे ग्रामस्थांनी केला आहे.