शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:46 IST

‘महावितरण’च्या धोरणाचा परिणाम : कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार

शिवाजी सावंत - गारगोटीमहावितरण कंपनीने नवीन कामगार भरती करताना कंत्राटी कामगारांबाबत ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हे धोरण अवलंबल्याने हजारो कंत्राटी कामगार रस्त्यावर आले आहेत.महावितरण कंपनीने सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी कामगार नेमले आहेत. संपूर्ण राज्यात दहा हजार कंत्राटी कामगार तीन हजार ते पाच हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर ‘कायम होऊ’ या आशेवर काम करीत आहेत; पण महावितरण कंपनीने नवीन भरती करताना अनुभवी कंत्राटी कामगारांना वगळून दहावीच्या टक्केवारीवर नवीन नेमणुका केल्या आहेत. पूर्वीच्या दहावीच्या लोकांना टक्केवारी कमी असल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. नवीन भरतीमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. या महिलांची भरती दुरुस्ती विभागाकडेही केली आहे. त्या महिलांना लाईनमनचे काम करावे लागते. विद्युत खांबावर चढण्यासाठी विवाहित महिला आपल्या पतिराजांचा आश्रय घेत आहेत. तेव्हा कंपनीने या महिलांची इतरत्र बदली करणे आवश्यक आहे.भरती करण्यापूर्वी सुमारे दहा वर्षे कायम कर्मचारी कमी होते तेव्हा कंत्राटी कामगारांची भरती केली. यात या कामगारांनी सर्व कामे केली. पगार कमी असतानाही इमाने-इतबारे कंपनीची सेवा केली. कारण कंपनी आपला सहृदयतेने विचार करून सेवेत ‘कायमस्वरूपी’ सामावून घेईल. अनेक कंत्राटी कामगारांनी काम करताना आपला जीव गमवला आहे, तर उर्वरित मजुरांचा विचार न करता सर्व कंत्राटी कामगारांचे संसार उघड्यावर पाडले आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी कंपनी व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना सूचना दिल्या व शिष्टमंडळाला आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने संघटना सुखावली होती; पण कंपनीने त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. ‘रोख-ठोक उपमुख्यमंत्री’ अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांनाही कंपनीने जुमानले नसल्याचे दिसते.पात्रतेबरोबर योग्यता असणे आवश्यक असते. केवळ टक्केवारी न पाहता अनुभव पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, नवीन भरतीतील अनेक कामगारांनी जीव गमावला आहे. कंपनीच्या दुटप्पी धोरणामुळे आमचा बळी जात आहे. वेळोवेळी आम्ही निवेदने देऊनसुद्धा केवळ आश्वासने मिळाली प्रत्यक्षात काहीही नाही.- विजय मोरे, अध्यक्ष, भुदरगड तालुका कंत्राटी कामगार संघटना.