शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:46 IST

‘महावितरण’च्या धोरणाचा परिणाम : कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार

शिवाजी सावंत - गारगोटीमहावितरण कंपनीने नवीन कामगार भरती करताना कंत्राटी कामगारांबाबत ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हे धोरण अवलंबल्याने हजारो कंत्राटी कामगार रस्त्यावर आले आहेत.महावितरण कंपनीने सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी कामगार नेमले आहेत. संपूर्ण राज्यात दहा हजार कंत्राटी कामगार तीन हजार ते पाच हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर ‘कायम होऊ’ या आशेवर काम करीत आहेत; पण महावितरण कंपनीने नवीन भरती करताना अनुभवी कंत्राटी कामगारांना वगळून दहावीच्या टक्केवारीवर नवीन नेमणुका केल्या आहेत. पूर्वीच्या दहावीच्या लोकांना टक्केवारी कमी असल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. नवीन भरतीमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. या महिलांची भरती दुरुस्ती विभागाकडेही केली आहे. त्या महिलांना लाईनमनचे काम करावे लागते. विद्युत खांबावर चढण्यासाठी विवाहित महिला आपल्या पतिराजांचा आश्रय घेत आहेत. तेव्हा कंपनीने या महिलांची इतरत्र बदली करणे आवश्यक आहे.भरती करण्यापूर्वी सुमारे दहा वर्षे कायम कर्मचारी कमी होते तेव्हा कंत्राटी कामगारांची भरती केली. यात या कामगारांनी सर्व कामे केली. पगार कमी असतानाही इमाने-इतबारे कंपनीची सेवा केली. कारण कंपनी आपला सहृदयतेने विचार करून सेवेत ‘कायमस्वरूपी’ सामावून घेईल. अनेक कंत्राटी कामगारांनी काम करताना आपला जीव गमवला आहे, तर उर्वरित मजुरांचा विचार न करता सर्व कंत्राटी कामगारांचे संसार उघड्यावर पाडले आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी कंपनी व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना सूचना दिल्या व शिष्टमंडळाला आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने संघटना सुखावली होती; पण कंपनीने त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. ‘रोख-ठोक उपमुख्यमंत्री’ अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांनाही कंपनीने जुमानले नसल्याचे दिसते.पात्रतेबरोबर योग्यता असणे आवश्यक असते. केवळ टक्केवारी न पाहता अनुभव पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, नवीन भरतीतील अनेक कामगारांनी जीव गमावला आहे. कंपनीच्या दुटप्पी धोरणामुळे आमचा बळी जात आहे. वेळोवेळी आम्ही निवेदने देऊनसुद्धा केवळ आश्वासने मिळाली प्रत्यक्षात काहीही नाही.- विजय मोरे, अध्यक्ष, भुदरगड तालुका कंत्राटी कामगार संघटना.