शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

By admin | Updated: July 16, 2014 23:46 IST

‘महावितरण’च्या धोरणाचा परिणाम : कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार

शिवाजी सावंत - गारगोटीमहावितरण कंपनीने नवीन कामगार भरती करताना कंत्राटी कामगारांबाबत ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हे धोरण अवलंबल्याने हजारो कंत्राटी कामगार रस्त्यावर आले आहेत.महावितरण कंपनीने सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी कामगार नेमले आहेत. संपूर्ण राज्यात दहा हजार कंत्राटी कामगार तीन हजार ते पाच हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर ‘कायम होऊ’ या आशेवर काम करीत आहेत; पण महावितरण कंपनीने नवीन भरती करताना अनुभवी कंत्राटी कामगारांना वगळून दहावीच्या टक्केवारीवर नवीन नेमणुका केल्या आहेत. पूर्वीच्या दहावीच्या लोकांना टक्केवारी कमी असल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. नवीन भरतीमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. या महिलांची भरती दुरुस्ती विभागाकडेही केली आहे. त्या महिलांना लाईनमनचे काम करावे लागते. विद्युत खांबावर चढण्यासाठी विवाहित महिला आपल्या पतिराजांचा आश्रय घेत आहेत. तेव्हा कंपनीने या महिलांची इतरत्र बदली करणे आवश्यक आहे.भरती करण्यापूर्वी सुमारे दहा वर्षे कायम कर्मचारी कमी होते तेव्हा कंत्राटी कामगारांची भरती केली. यात या कामगारांनी सर्व कामे केली. पगार कमी असतानाही इमाने-इतबारे कंपनीची सेवा केली. कारण कंपनी आपला सहृदयतेने विचार करून सेवेत ‘कायमस्वरूपी’ सामावून घेईल. अनेक कंत्राटी कामगारांनी काम करताना आपला जीव गमवला आहे, तर उर्वरित मजुरांचा विचार न करता सर्व कंत्राटी कामगारांचे संसार उघड्यावर पाडले आहेत. या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी कंपनी व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना सूचना दिल्या व शिष्टमंडळाला आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने संघटना सुखावली होती; पण कंपनीने त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. ‘रोख-ठोक उपमुख्यमंत्री’ अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांनाही कंपनीने जुमानले नसल्याचे दिसते.पात्रतेबरोबर योग्यता असणे आवश्यक असते. केवळ टक्केवारी न पाहता अनुभव पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, नवीन भरतीतील अनेक कामगारांनी जीव गमावला आहे. कंपनीच्या दुटप्पी धोरणामुळे आमचा बळी जात आहे. वेळोवेळी आम्ही निवेदने देऊनसुद्धा केवळ आश्वासने मिळाली प्रत्यक्षात काहीही नाही.- विजय मोरे, अध्यक्ष, भुदरगड तालुका कंत्राटी कामगार संघटना.