शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाडू म्हणणाऱ्यांचे वीस आमदार संपर्कात

By admin | Updated: February 20, 2017 00:59 IST

चंद्रकांतदादा पाटील : ‘बिद्री’ची निवडणूक अजून दोन वर्षे नाही

गारगोटी : सरकार पाडून मध्यावधी निवडणुकीची धमकी देणाऱ्या पक्षाचे वीस-वीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सरकार पडण्याची भीती नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी ऊस खाल्ला आहे, अशा सर्वांचा भ्रष्टाचार मुळासकट उपटून काढण्यात येणार आहे, असा घणाघात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. गारगोटी येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सांगतेप्रसंगी हुतात्मा क्रांतिसिंह नाना पाटील चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई होते.ज्या बिद्री कारखान्याच्या चिमणीभोवती या तालुक्याचे राजकारण फिरत आहे, त्या कारखान्याची निवडणूक किमान दोन वर्षे तरी होणार नाही. सतरा हजार सभासदांची तपासणी करण्यासाठी तेवढा वेळ लागणारच आहे. प्रशासकांमुळे टनाला दोनशे रुपये जादा दर मिळाल्याने शेतकरीही निवडणुकीपेक्षा प्रशासक बरे म्हणत आहेत, असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. केंद्रात भाजप सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता आवश्यक आहे, म्हणून भाजप आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असेही ते म्हणाले.यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, गेली पस्तीस वर्षे प्रलंबित असणारा सोनवडे-घोडगे घाट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अवघ्या दोन महिन्यांत वन खात्याच्या मंजुरीसह भरघोस निधी मंजूर करून मार्गी लावला. अल्पावधीतच या घाटाचे काम मार्गी लागले. यावेळी योगेश परुळेकर, देवराज बारदेस्कर, प्रवीणसिंह सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. नाथाजी पाटील म्हणाले की, पक्षाचा झेंडा गुंडाळून ठेवून राधानगरीत काँग्रेस, आजरा तालुक्यांत ताराराणी आणि भुदरगड तालुक्यात पक्षच नाही अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी आमदार असल्याचा टेंभा मिरवू नये. यावेळी अलकेश कांदळकर, धनाजी मोरूस्कर, शक्तिजित पोवार, युवराज पाटील, नामदेव चौगले, अमर पाटील, दिलीप केणे, निवास देसाई, नामदेव कांबळे, दिगंबर देसाई यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवराज बारदेस्कर यांनी काढलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.