शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी शौचालयांचे बांधकाम केवळ कागदावर!

By admin | Updated: December 9, 2015 23:17 IST

आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) सरकारच्या काळात विविध केंद्रीय योजनांखाली देशाच्या ग्रामीण भागांत अडीच कोटींहून अधिक स्वच्छतागृहांचे बांधकाम केवळ कागदावरच केले

आजरा : प्रकल्पग्रस्त म्हणजे काय? धरणग्रस्तांच्या व्यथा काय? पुनर्वसनाचा प्रश्न कसा सुटू शकतो? याची काडीचीही माहिती नसणारी, तसेच ‘उचंगी’ लाभक्षेत्रासह धरणातला ‘ध’सुद्धा ज्यांना माहीत नाही, अशी मंडळी ‘उचंगी’बाबत बोलू लागली आहेत. धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत खोटे चित्र शासनाकडून उभे केले जात असून, ‘पर्यायी जमिनी द्या, मगच पाणी अडवा’ याच्याशी आपण ठाम असून, जोपर्यंत उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शंभर टक्के होत नाही. तोपर्यंत उचंगीत पाण्याचा थेंब अडवू देणार नाही, असा खणखणीत इशारा श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. भारत पाटणकर यांनी दिला.चाफवडे, जेऊर, उचंगी येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली चाफवडे येथे पार पडली. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, शासनाकडे खोट्या माहितीवर आधारित जलयुक्त शिवार योजनेला देण्यासाठी पैसे आहेत; परंतु धरणाला व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याकरिता पैसे नाहीत. गेली १८ वर्षे उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. पुनर्वसनाचे तुणतुणे वाजण्यात १८ वर्षे जात असतील, तर पुढच्या विकासाचे काय? कोल्हापूर जिल्ह्याला शासनाकडून नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. धरणांना पाट नसल्याने जमीनदारांसारखी ‘पाणीदार’ ही पाणी विकणारी नवी जमात अस्तित्वात येत आहे. धरणग्रस्तांच्या नावाने खडे फोडून लाभक्षेत्रातील मंडळींना कधीच पाणी मिळणार नाही. सरकारच्या भूलथापांना प्रकल्पग्रस्त कधीच फसणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी कॉ. संपत देसाई, नारायण भडांगे यांची भाषणे झाली. बैठकीस विष्णू मांजरेकर, दादासाहेब मोकाशी, आदी उपस्थित होते. सरकारी दराने शासकीय यंत्रणेने प्रकल्पातील पाणी शासनाने उचलून द्यावे.धरण झालेच पाहिजे; परंतु त्यासाठी शासनाने प्रकल्पासह प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत.प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पैसे न देता केवळ धरणासाठी पैसे दिल्यास धरणाचे काम सुरू करू नये.मुख्यमंत्र्यांना तिळगूळ देणारयावर्षी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी न लागल्यास धरणावर तिळाचे पीक घेऊन पुढच्या संक्रांतीला मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून तिळगूळ देण्याचे ठरले.‘उचंगी’साठी आवश्यक जमीन उपलब्ध होणारअप्पर जिल्हाधिकारी : चाफवडे येथे बैठकआजरा : वाटंगी येथील जगद्गुरू स्वामींच्या मालकीच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, ही जमीन उपलब्ध होणार असली तरीही २० हेक्टर जमीन कमी पडणार आहे. कमी पडणाऱ्या जमिनीसाठी प्रकल्पग्रस्तांनी संपादित करण्यायोग्य जमिनीचा शोध सुरू करावा, प्रशासनाचे त्याला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी दिले.उचंगीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा गतिमान झाली. ‘श्रमुद’चे डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई, उपविभागीय अधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांची बैठक चाफवडेत पार पडली.डॉ. पाटणकर यांनी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होणार असल्यास त्यामध्ये पुनर्वसनाचा समावेश आहे का? असा प्रश्न उपस्थित करून प्रकल्पाबाबत शासनाची भूमिका समजावून घेतली. एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी काहींना जमिनीपैकी काहीच जमीन मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी संपत देसाई यांनीही काही सूचना केल्या.