शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

करवीर मतदारसंघ भाजपलाच हवा

By admin | Updated: July 30, 2014 00:43 IST

कार्यकर्त्यांची मागणी : प्रयाग चिखलीत कार्यकर्त्यांची बैठक

वडणगे : गेली दहा वर्षे आमच्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होऊ लागले आहे. यापुढे हा अन्याय सहन करणार नाही. आमच्या हक्काचा मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा पदाधिकाऱ्यांच्या संत ज्ञानेश्वर समूहाचे संस्थापक पै. संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.भाजपचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९० साली दिलीप भिवटे, १९९५ ला बाबा देसाई, तर १९९९ ला संग्राम गायकवाड यांनी भाजपमधून निवडणूक लढवून चांगली मते मिळविली आहेत. २००४ साली तर भाजपच्या पाठिंब्यावर सतेज पाटील यांनी निवडणूक लढविली व २००९ ला काँग्रेसमधून आलेल्या चंद्रदीप नरके यांनी वरिष्ठ पातळीवरून तिकीट मिळवून भाजपची मदत घेतली.या सर्व घडामोडींनी भाजपच्या मतावर अन्य पक्षाचा फायदा होतो. त्यामुळे भाजपच्या पक्ष संघटनावर परिणाम होत आहे. आपल्या हक्काचा मतदारसंघ दुसऱ्यांना दिल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. मात्र, आता आपण लढायचच आणि हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेऊ देणार नाही, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्यावेळी चुकीचे सांगून आमचा मतदारसंघ घेतला. मात्र, यावेळी असे खपवून घेणार नाही. के. एस. चौगले, मारुती परितकर (मोरेवाडी), रंगराव व्हरांबळे (केर्ली), मधुकर दुधाणे (वरणगे), सरदार जाधव (वडणगे), दिलीप एकशिंगे (निगवे), अर्जुन पाटील (मुटकेश्वर), लक्ष्मण पाटील (पन्हाळा तालुकाध्यक्ष), शिवाजी पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), गामा पाटील (क।। ठाणे), बाजीराव लव्हटे (म्हाळुंगे), हैबती मगदूम (पुनाळ), रघुनाथ झेंडे (पडळ), आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आनंदराव पवळ यांनी स्वागत केले, तर सुरेश बेनाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)