शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्याने घडतो माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:03 IST

इंद्रजित देशमुख कधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून ...

इंद्रजित देशमुखकधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून घे पार्था’ ही रचना कानावर पडते आणि मन सखोल चिंतनाच्या गर्तेत घिरट्या घालू लागतं. भगवान जगातील उच्चतम अशा कर्तव्य प्रतिपालनाबद्दल झालेल्या या गीतातील संवादातून मानवाच्या बहुउच्च विकसनासाठी या गीतात कर्तव्याला दिलेली प्राधान्यता खरोखर वाखाणण्यासारखी आहे.लहानपणी आम्हाला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगताना चिऊचं आपलं घरटं बांधताना असणारं असीम प्रयत्नवादी धैर्य आम्ही त्यावेळी नुसतं ऐकायचो, पण आता त्या चिऊताईच्या कर्तव्यबुद्धिबद्दल थोडीशी उमग येतीये आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असा एक देखणा संदेश आमच्या जीवनाला देऊन जायचा. त्यातूनच मानवी मनावर कर्तव्य जोपासण्याठीचा एक देखणा संस्कार होतोय. तसं पाहिलं तर हालचाल हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं दार्शनिक लक्षण आहे. याचाच सामान्य अर्थ असा की जिवंत असण्यासाठी जीविताची हालचाल होणं खूप गरजेचं आहे. त्या हालचालीला जोपासणं म्हणजेच कर्तव्यप्रवण राहणं होय. आमच्या संत साहित्यात बऱ्याच ठिकाणी याच कर्तव्यप्रवणतेला विविध अंगांनी उत्तेजना दिलेली आहे. कधी आमच्या ज्ञानेश्वर माउलींनी 'उद्यमाचेनी मिसे’ असे सांगून तर कधी तुकोबारायांनीभिक्षापात्र अवलंबणे।जळो जिणे लाजिरवाणे।। असे म्हणून, कधी नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणेपक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनिया राहती।। असं सांगून तर कधी संत कबिरांच्या ‘करणी करेगा तो नर नारायण बन जायेगा’ या वाणीतून. या आणि अशा अनंत प्रकारांनी या सर्व संतांनी आम्हाला कर्तव्यबुद्धी जोपासायलाच सांगितलं आहे. एकूणच काय कर्तव्य जोपासना हीच साधकांच्या जीवनातील एक महत्त्वाची पायरी आहे म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुन नामक आपल्या लाडक्या शिष्याला ‘कर्म करणं हा तुझा अधिकार आहे’ असं सांगतात, तर त्याच बाबतीत आमचे ज्ञानोबारायतया सर्वात्मका ईश्वरा।स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा।तोषालागीं।। असं सांगतात.या सर्व महात्म्यांची ही मतं आमच्या कर्तव्यबुद्धीला चालनाच देतात आणि यातूनच आमच्या मनात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कर्म की दैव या दुमताचे उत्तर सापडते. याचसाठी आमच्या संत मालिकेत जे संत महात्मे झाले ते सगळेचजण आपापल्या कर्तव्यात रमून त्या सर्वसाक्षी परमात्म्याची आराधना करीत होते. म्हणूनच तुकोबाराय व्यापार, नामदेवराय शिंपीकाम, गोरोबाकाका कुंभारकाम, नाथराय आपलं कुलकर्णीपद, सावताबाबा आपली शेती, कबिरांचं कपडे विणणं, जनाबार्इंचं जात्यावर दळणं, रोहिदास महाराजांचं चर्मकाम,चोखोबारायांचं जनावरं राखणं इतकंच कायसजन कसाई यांचं मांस विकणं अशी ही सारी संत मंडळी कोणत्याही कर्तव्याचा त्याग न करता प्रभू आराधनेत रमलेली होती आणि सरतेशेवटी ही सारी मंडळी आयुष्याच्या खºया अर्थापर्यंत पोचलीदेखील होती. या सर्वांच्या या कृतींचा मागोवा घेतला की आम्ही काय करायला हवं याचं निर्देशन आपोआप आम्हाला मिळतं. कर्तव्यावाचून केलेला परमार्थ म्हणजे अपुरा परमार्थ होय. कर्तव्यविरहित जगणं कधीच भक्तांना खºया भक्तीपथापर्यंत पोचवू शकत नाही. कारण ज्यांना आमचे आराध्य समजतो, असे राम-कृष्णादी ईश्वरी पुरुष देखील इथे आपल्या कर्तव्यपूर्ततेत कधीच कमी पडले नाहीत. त्यांनीदेखील आपापली कर्तव्ये अतिशय कठीण आणि विपत्तीजन्य वातावरणात पार पाडली. मग आम्ही जरत्यांचा अनुनय करत असू तर आम्हीही कर्तव्यधार्जिणे व्हायला नको का! मुळात ही सगळी दैवीरत्नेअसीम कर्तृत्वाच्या बळावरच नावारूपाला आलेली आहेत.लोखंडी तुकड्याला परीसस्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं म्हणतात. आमच्या या निस्तेज जीवनात आम्ही कर्तव्यपूर्तीच्या परीसाकडे झोकून दिलं की आम्हीही तेजस्वीच होऊ आणि अवघ्यांना आपल्या तेजोवलयाने तेजस्वी करू शकू. मात्र, आम्ही ती कर्तव्यबुद्धी जोपासायला हवी, ती जोपासण्याचं बळ आणि धैर्य आपण सर्वजण प्राप्त करूया एवढीच अपेक्षा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)