शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कर्तव्याने घडतो माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:03 IST

इंद्रजित देशमुख कधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून ...

इंद्रजित देशमुखकधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून घे पार्था’ ही रचना कानावर पडते आणि मन सखोल चिंतनाच्या गर्तेत घिरट्या घालू लागतं. भगवान जगातील उच्चतम अशा कर्तव्य प्रतिपालनाबद्दल झालेल्या या गीतातील संवादातून मानवाच्या बहुउच्च विकसनासाठी या गीतात कर्तव्याला दिलेली प्राधान्यता खरोखर वाखाणण्यासारखी आहे.लहानपणी आम्हाला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगताना चिऊचं आपलं घरटं बांधताना असणारं असीम प्रयत्नवादी धैर्य आम्ही त्यावेळी नुसतं ऐकायचो, पण आता त्या चिऊताईच्या कर्तव्यबुद्धिबद्दल थोडीशी उमग येतीये आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असा एक देखणा संदेश आमच्या जीवनाला देऊन जायचा. त्यातूनच मानवी मनावर कर्तव्य जोपासण्याठीचा एक देखणा संस्कार होतोय. तसं पाहिलं तर हालचाल हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं दार्शनिक लक्षण आहे. याचाच सामान्य अर्थ असा की जिवंत असण्यासाठी जीविताची हालचाल होणं खूप गरजेचं आहे. त्या हालचालीला जोपासणं म्हणजेच कर्तव्यप्रवण राहणं होय. आमच्या संत साहित्यात बऱ्याच ठिकाणी याच कर्तव्यप्रवणतेला विविध अंगांनी उत्तेजना दिलेली आहे. कधी आमच्या ज्ञानेश्वर माउलींनी 'उद्यमाचेनी मिसे’ असे सांगून तर कधी तुकोबारायांनीभिक्षापात्र अवलंबणे।जळो जिणे लाजिरवाणे।। असे म्हणून, कधी नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणेपक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनिया राहती।। असं सांगून तर कधी संत कबिरांच्या ‘करणी करेगा तो नर नारायण बन जायेगा’ या वाणीतून. या आणि अशा अनंत प्रकारांनी या सर्व संतांनी आम्हाला कर्तव्यबुद्धी जोपासायलाच सांगितलं आहे. एकूणच काय कर्तव्य जोपासना हीच साधकांच्या जीवनातील एक महत्त्वाची पायरी आहे म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुन नामक आपल्या लाडक्या शिष्याला ‘कर्म करणं हा तुझा अधिकार आहे’ असं सांगतात, तर त्याच बाबतीत आमचे ज्ञानोबारायतया सर्वात्मका ईश्वरा।स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा।तोषालागीं।। असं सांगतात.या सर्व महात्म्यांची ही मतं आमच्या कर्तव्यबुद्धीला चालनाच देतात आणि यातूनच आमच्या मनात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कर्म की दैव या दुमताचे उत्तर सापडते. याचसाठी आमच्या संत मालिकेत जे संत महात्मे झाले ते सगळेचजण आपापल्या कर्तव्यात रमून त्या सर्वसाक्षी परमात्म्याची आराधना करीत होते. म्हणूनच तुकोबाराय व्यापार, नामदेवराय शिंपीकाम, गोरोबाकाका कुंभारकाम, नाथराय आपलं कुलकर्णीपद, सावताबाबा आपली शेती, कबिरांचं कपडे विणणं, जनाबार्इंचं जात्यावर दळणं, रोहिदास महाराजांचं चर्मकाम,चोखोबारायांचं जनावरं राखणं इतकंच कायसजन कसाई यांचं मांस विकणं अशी ही सारी संत मंडळी कोणत्याही कर्तव्याचा त्याग न करता प्रभू आराधनेत रमलेली होती आणि सरतेशेवटी ही सारी मंडळी आयुष्याच्या खºया अर्थापर्यंत पोचलीदेखील होती. या सर्वांच्या या कृतींचा मागोवा घेतला की आम्ही काय करायला हवं याचं निर्देशन आपोआप आम्हाला मिळतं. कर्तव्यावाचून केलेला परमार्थ म्हणजे अपुरा परमार्थ होय. कर्तव्यविरहित जगणं कधीच भक्तांना खºया भक्तीपथापर्यंत पोचवू शकत नाही. कारण ज्यांना आमचे आराध्य समजतो, असे राम-कृष्णादी ईश्वरी पुरुष देखील इथे आपल्या कर्तव्यपूर्ततेत कधीच कमी पडले नाहीत. त्यांनीदेखील आपापली कर्तव्ये अतिशय कठीण आणि विपत्तीजन्य वातावरणात पार पाडली. मग आम्ही जरत्यांचा अनुनय करत असू तर आम्हीही कर्तव्यधार्जिणे व्हायला नको का! मुळात ही सगळी दैवीरत्नेअसीम कर्तृत्वाच्या बळावरच नावारूपाला आलेली आहेत.लोखंडी तुकड्याला परीसस्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं म्हणतात. आमच्या या निस्तेज जीवनात आम्ही कर्तव्यपूर्तीच्या परीसाकडे झोकून दिलं की आम्हीही तेजस्वीच होऊ आणि अवघ्यांना आपल्या तेजोवलयाने तेजस्वी करू शकू. मात्र, आम्ही ती कर्तव्यबुद्धी जोपासायला हवी, ती जोपासण्याचं बळ आणि धैर्य आपण सर्वजण प्राप्त करूया एवढीच अपेक्षा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)