शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

कर्तव्याने घडतो माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:03 IST

इंद्रजित देशमुख कधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून ...

इंद्रजित देशमुखकधीतरी सकाळच्या पहाटप्रहरी प्रवास करत असताना सुधीर फडके बाबूजींनी गायिलेली कविवर्य मनोहर कवीश्वरांची ‘कर्तव्याने घडतो माणूस जाणून घे पार्था’ ही रचना कानावर पडते आणि मन सखोल चिंतनाच्या गर्तेत घिरट्या घालू लागतं. भगवान जगातील उच्चतम अशा कर्तव्य प्रतिपालनाबद्दल झालेल्या या गीतातील संवादातून मानवाच्या बहुउच्च विकसनासाठी या गीतात कर्तव्याला दिलेली प्राधान्यता खरोखर वाखाणण्यासारखी आहे.लहानपणी आम्हाला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगताना चिऊचं आपलं घरटं बांधताना असणारं असीम प्रयत्नवादी धैर्य आम्ही त्यावेळी नुसतं ऐकायचो, पण आता त्या चिऊताईच्या कर्तव्यबुद्धिबद्दल थोडीशी उमग येतीये आणि संपूर्ण आयुष्यभर पुरेल असा एक देखणा संदेश आमच्या जीवनाला देऊन जायचा. त्यातूनच मानवी मनावर कर्तव्य जोपासण्याठीचा एक देखणा संस्कार होतोय. तसं पाहिलं तर हालचाल हे जिवंतपणाचं सगळ्यात मोठं दार्शनिक लक्षण आहे. याचाच सामान्य अर्थ असा की जिवंत असण्यासाठी जीविताची हालचाल होणं खूप गरजेचं आहे. त्या हालचालीला जोपासणं म्हणजेच कर्तव्यप्रवण राहणं होय. आमच्या संत साहित्यात बऱ्याच ठिकाणी याच कर्तव्यप्रवणतेला विविध अंगांनी उत्तेजना दिलेली आहे. कधी आमच्या ज्ञानेश्वर माउलींनी 'उद्यमाचेनी मिसे’ असे सांगून तर कधी तुकोबारायांनीभिक्षापात्र अवलंबणे।जळो जिणे लाजिरवाणे।। असे म्हणून, कधी नाथबाबांनी सांगितल्याप्रमाणेपक्षी अंगणी उतरती। ते का गुंतोनिया राहती।। असं सांगून तर कधी संत कबिरांच्या ‘करणी करेगा तो नर नारायण बन जायेगा’ या वाणीतून. या आणि अशा अनंत प्रकारांनी या सर्व संतांनी आम्हाला कर्तव्यबुद्धी जोपासायलाच सांगितलं आहे. एकूणच काय कर्तव्य जोपासना हीच साधकांच्या जीवनातील एक महत्त्वाची पायरी आहे म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुन नामक आपल्या लाडक्या शिष्याला ‘कर्म करणं हा तुझा अधिकार आहे’ असं सांगतात, तर त्याच बाबतीत आमचे ज्ञानोबारायतया सर्वात्मका ईश्वरा।स्वकर्म कुसुमांची वीरा।पूजा केली होय अपारा।तोषालागीं।। असं सांगतात.या सर्व महात्म्यांची ही मतं आमच्या कर्तव्यबुद्धीला चालनाच देतात आणि यातूनच आमच्या मनात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कर्म की दैव या दुमताचे उत्तर सापडते. याचसाठी आमच्या संत मालिकेत जे संत महात्मे झाले ते सगळेचजण आपापल्या कर्तव्यात रमून त्या सर्वसाक्षी परमात्म्याची आराधना करीत होते. म्हणूनच तुकोबाराय व्यापार, नामदेवराय शिंपीकाम, गोरोबाकाका कुंभारकाम, नाथराय आपलं कुलकर्णीपद, सावताबाबा आपली शेती, कबिरांचं कपडे विणणं, जनाबार्इंचं जात्यावर दळणं, रोहिदास महाराजांचं चर्मकाम,चोखोबारायांचं जनावरं राखणं इतकंच कायसजन कसाई यांचं मांस विकणं अशी ही सारी संत मंडळी कोणत्याही कर्तव्याचा त्याग न करता प्रभू आराधनेत रमलेली होती आणि सरतेशेवटी ही सारी मंडळी आयुष्याच्या खºया अर्थापर्यंत पोचलीदेखील होती. या सर्वांच्या या कृतींचा मागोवा घेतला की आम्ही काय करायला हवं याचं निर्देशन आपोआप आम्हाला मिळतं. कर्तव्यावाचून केलेला परमार्थ म्हणजे अपुरा परमार्थ होय. कर्तव्यविरहित जगणं कधीच भक्तांना खºया भक्तीपथापर्यंत पोचवू शकत नाही. कारण ज्यांना आमचे आराध्य समजतो, असे राम-कृष्णादी ईश्वरी पुरुष देखील इथे आपल्या कर्तव्यपूर्ततेत कधीच कमी पडले नाहीत. त्यांनीदेखील आपापली कर्तव्ये अतिशय कठीण आणि विपत्तीजन्य वातावरणात पार पाडली. मग आम्ही जरत्यांचा अनुनय करत असू तर आम्हीही कर्तव्यधार्जिणे व्हायला नको का! मुळात ही सगळी दैवीरत्नेअसीम कर्तृत्वाच्या बळावरच नावारूपाला आलेली आहेत.लोखंडी तुकड्याला परीसस्पर्श झाला की त्याचं सोन्यात रूपांतर होतं असं म्हणतात. आमच्या या निस्तेज जीवनात आम्ही कर्तव्यपूर्तीच्या परीसाकडे झोकून दिलं की आम्हीही तेजस्वीच होऊ आणि अवघ्यांना आपल्या तेजोवलयाने तेजस्वी करू शकू. मात्र, आम्ही ती कर्तव्यबुद्धी जोपासायला हवी, ती जोपासण्याचं बळ आणि धैर्य आपण सर्वजण प्राप्त करूया एवढीच अपेक्षा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)