शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जीवन सुंदर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात ...

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात केले. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करा, असेही आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या ७३ व्या निरंकारी समागमात त्या बोलत होत्या. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टीव्ही चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ जगभरातील भक्तगणांनी घेतला.

सुदीक्षाजी म्हणाल्या, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आणि शाश्वत आहे. त्याच्याशी नाते जोडल्यावर मनात स्थैर्य येते. विवेकपूर्ण निर्णयाची क्षमता वाढते. जीवनातील चढउताराचा सामना सहजपणे करू शकतो. आपला पाया परमात्म्याशी जोडला असेल, त्याच्याशी एकरूप झाला असेल तर परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार तुम्हाला विचलित करू शकत नाहीत. जगात उलथापालथ होतच राहणार, परिस्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असेल; पण निराश न होता चढउतारामध्ये समतोल ठेवून चालल्याने जीवनात स्थिरता निर्माण होते.

समागमाच्या या कार्यक्रमात झालेल्या सेवा दल रॅलीत कवायत, प्रार्थना, खेळ, लघुनाटिकांतून मानवतेचा संदेश दिला गेला. बहुभाषिक कविसंमेलनही झाले. याशिवाय सुमधुर गायन, पुरातन संताची भजने, अभंगवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

फोटो: १०१२२०२०-कोल-निरंकारी