शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

स्वनिधीवरून सदस्यांचा गोंधळ

By admin | Updated: March 25, 2015 00:40 IST

अर्थसंकल्पीय सभा : व्यासपीठासमोर येऊन मागणी; दोन लाखांच्या वाढीनंतर शांत

कोल्हापूर : अर्थसंकल्पात स्वनिधीची रक्कम १७ लाख रुपये करावी, अशी जोरदार मागणी मंगळवारी अर्थसंकल्पीय सभेत जि. प. सदस्यांनी केली. त्यासाठी बहुतांश सदस्य व्यासपीठाजवळ आले. त्यामुळे काही काळ सभेत गोंधळ झाला. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन लाखांचा वाढीव निधी देण्याचा निर्णय झाला. यामुळे प्रत्येक सदस्याला १३ लाखांचा स्वनिधी मिळणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात सदस्यांना ११ लाखांची तरतूद केली आहे. धैर्यशील माने, अरुण इंगवले, अप्पी पाटील, संजय मंडलिक, उमेश आपटे, आनंद पाटील, विकास कांबळे, शिवप्रसाद तेली, आदींनी स्वनिधी वाढीचा मुद्दा उपस्थित केला. उपाध्यक्ष शशिकांत खोत, अभिजित तायशेटे यांनी पाच कोटींची देय रक्कम शासनाकडून आल्यानंतर विचार केला जाईल, असे सांगितले. मात्र, सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी स्वनिधी १७ लाख रुपये करावा, अशी मागणी आक्रमकपणे लावून धरली. शेवटी सदस्य मंडलिक, उपाध्यक्ष खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अविनाश सुभेदार यांनी व्यासपीठाजवळील खोलीत जाऊन चर्चा केली. संजय मंडलिक यांनी शिष्टाई केली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ११ लाख आणि शासनाकडून देय अनुदान आल्यानंतर २ लाख असा स्वनिधी देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर गोंधळ शमला. यावेळी माने यांनी सभागृहाचे कामकाज थांबवून स्वतंत्र बैठकीत निर्णय घेण्याचा हा कोणता नवीन पायंडा पाडला आहे, असा सवाल उपस्थित केला. आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर यांनी सभापतींनी स्वनिधीसंंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. ‘पहिल्यांदा सदस्यांचे, मग सभापतींचे पाहूया’ असे म्हणत उपाध्यक्ष खोत यांनी केसरकर यांना खाली बसविले. यावर केसरकर यांनी सभागृहात अशा पद्धतीने बोलून मागणी मांडण्यापासून रोखणे चुकीचे असल्याचे सांगितले.सदस्यांनाही ब्रीफकेससभागृहाचे कामकाज सुरू असतानाच सर्व सदस्यांनाही ब्रीफकेस वाटप करण्यात आले. मात्र, जाताना काही ‘बड्या’ सदस्यांनी जिल्हा परिषदेचे शिपाई आणि स्वीय सहायक यांना सभागृहातून ब्रीफकेस घेऊन आपल्या वाहनात ठेवण्याची सूचना दिली. यंदा प्रशासनाने ब्रीफकेस देण्याचा नवा पायंडा पाडण्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. एकाही सदस्याने ब्रीफकेस भेट देऊन पैसा वायफळ खर्च केल्याचे मांडले नाही, हे विशेष.प्रशासन गतिमान झाले का ?विविध शीर्षाखाली संगणकीकरण, अत्याधुनिकीकरण यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते. ती प्रत्येक वर्षी होते. मात्र, प्रत्यक्षात गतिमान प्रशासनासाठी तिचा उपयोग झाला आहे का? असा सवाल राजेश पाटील यांनी उपस्थित केला. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी होत असल्याकडेही माने यांनी लक्ष वेधले.