शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

पोलीस खात्याच्या दाखल्यावरून उमेदवारांत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

अनिल पाटील मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड ...

अनिल पाटील

मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्वयंघोषणा पत्रामध्ये, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नाही, असे घोषणापत्र उमेदवार देत आहेच. मग पुन्हा दोनशे रुपये खर्च करून पोलीस स्टेशनमधून वेगळ्या प्रमाणपत्राची गरज कशासाठी? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी याबाबत निवडणूक निर्णायक अधिकाऱ्याकडून योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी निवडत असताना तो गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा नसावा, हा उदात्त हेतू ठेवून या प्रमाणपत्राची आवश्यकता ठेवली असेलही. पण मग लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकीत हा निकष पाळला आहे का? असा प्रश्न ग्रामपंचायत इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत. अगोदरच ऑनलाईन आवेदन पत्र भरताना ढीगभर अडचणी येत आहेत. एक फाॅर्म भरण्यासाठी सुमारे एक तास लागतो. शिवाय सर्व्हर डाऊन झाला तर हा वेळ वाढतो. रात्री-अपरात्री महा ई सेवा केंद्र व खासगी संस्थेत आवेदन पत्र भरताना उमेदवार दिसत आहेत. त्यात पुन्हा हे पोलिसी प्रमाणपत्र अडचणीचे ठरत आहे.

गुन्हा नोंद नसलेले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलीस खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड टाकून पाच स्टेप्सवर विविध माहिती भरावी लागते. त्यानंतर सुमारे १२३ रुपये ऑनलाईन पैसे भरावे लागतात. हे आवेदन पत्र भरण्यासाठी सुमारे पन्नास ते शंभर रुपये, असे अधिकचे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येत आहे. तसेच उमेदवारी अर्जासाठी अंदाजे तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. याशिवाय आवेदन पत्र दाखल करताना अनामत रक्कम ही वेगळीच द्यावी लागते.

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर फोटोसहित माहिती भरलेला फाॅर्म व पैसे भरल्याची पावती घेऊन या उमेदवाराला जवळच्या पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यानंतर त्याबाबत तपासणी करून त्या उमेदवाराला जिल्हा पोलीसप्रमुख यांच्यामार्फत, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. काही ठिकाणी याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. पण काही जण मात्र हे गरजेचे असल्याचे सांगत असल्याने, इच्छुकांच्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे तात्काळ याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहेत.