शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पोलीस खात्याच्या दाखल्यावरून उमेदवारांत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

अनिल पाटील मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड ...

अनिल पाटील

मुरगूड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना ज्या त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनमधून गुन्हा नोंद नसल्याबाबत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. ऑनलाईन आवेदन पत्र भरताना स्वयंघोषणा पत्रामध्ये, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नाही, असे घोषणापत्र उमेदवार देत आहेच. मग पुन्हा दोनशे रुपये खर्च करून पोलीस स्टेशनमधून वेगळ्या प्रमाणपत्राची गरज कशासाठी? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी याबाबत निवडणूक निर्णायक अधिकाऱ्याकडून योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी निवडत असताना तो गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा नसावा, हा उदात्त हेतू ठेवून या प्रमाणपत्राची आवश्यकता ठेवली असेलही. पण मग लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकीत हा निकष पाळला आहे का? असा प्रश्न ग्रामपंचायत इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत. अगोदरच ऑनलाईन आवेदन पत्र भरताना ढीगभर अडचणी येत आहेत. एक फाॅर्म भरण्यासाठी सुमारे एक तास लागतो. शिवाय सर्व्हर डाऊन झाला तर हा वेळ वाढतो. रात्री-अपरात्री महा ई सेवा केंद्र व खासगी संस्थेत आवेदन पत्र भरताना उमेदवार दिसत आहेत. त्यात पुन्हा हे पोलिसी प्रमाणपत्र अडचणीचे ठरत आहे.

गुन्हा नोंद नसलेले प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलीस खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागते. त्यानंतर मिळालेला युजर नेम आणि पासवर्ड टाकून पाच स्टेप्सवर विविध माहिती भरावी लागते. त्यानंतर सुमारे १२३ रुपये ऑनलाईन पैसे भरावे लागतात. हे आवेदन पत्र भरण्यासाठी सुमारे पन्नास ते शंभर रुपये, असे अधिकचे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येत आहे. तसेच उमेदवारी अर्जासाठी अंदाजे तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. याशिवाय आवेदन पत्र दाखल करताना अनामत रक्कम ही वेगळीच द्यावी लागते.

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर फोटोसहित माहिती भरलेला फाॅर्म व पैसे भरल्याची पावती घेऊन या उमेदवाराला जवळच्या पोलीस स्टेशनला जावे लागते. त्यानंतर त्याबाबत तपासणी करून त्या उमेदवाराला जिल्हा पोलीसप्रमुख यांच्यामार्फत, आपल्यावर कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. काही ठिकाणी याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. पण काही जण मात्र हे गरजेचे असल्याचे सांगत असल्याने, इच्छुकांच्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे तात्काळ याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहेत.