शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

नगराध्यक्षपदाच्या निवड पद्धतीवरून संभ्रम

By admin | Updated: April 20, 2015 00:13 IST

निवडणुकीचे वेध : इचलकरंजीत इच्छुकांची चाचपणी सुरू

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिका क्षेत्रात आगामी निवडणुकांचे वेध लागले असून, इचलकरंजीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले आहे. नगरसेवकांची निवडणूक प्रत्येक प्रभागाला एक सदस्य या पद्धतीने होत असताना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत निश्चित नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे. मात्र, काही इच्छुकांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आणि नगराध्यक्षपदाची निवड हा विषय ऐरणीवर आला आहे.गेली ५० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी सन १९९८-९९ पासून नगरपालिकांतील सदस्य व नगराध्यक्षपदासाठी आरक्षणे होऊ लागली. इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद प्रथमच अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. राजीव आवळे यांची १७ डिसेंबर १९९८ ला नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीला अठरा महिने होत असतानाच बदललेल्या राजकीय स्थितीमुळे राजीव आवळे यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला आणि ५ आॅक्टोबर २००० रोजी संजय आवळे नगराध्यक्ष झाले.त्यानंतर नोव्हेंबर २००१ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित झाले आणि नगराध्यक्षासाठी शहरातील सर्व मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यावेळी कॉँग्रेसच्या किशोरी आवाडे या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. पुढे नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत इचलकरंजीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण असे खुले झाले. त्यावेळी पुन्हा कॉँग्रेसचे बहुमत होऊन नगरसेवकांनी किशोरी आवाडे यांनाच नगराध्यक्षपदी निवडून दिले. पुढे बदललेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे आवाडे यांना नगराध्यक्षपदापासून दूर जावे लागले आणि २३ नोव्हेंबर २००९मध्ये मेघा चाळके या नगराध्यक्षा झाल्या.नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाले. या अडीच वर्षांत अनुक्रमे रत्नप्रभा भागवत, सुप्रिया गोंदकर, सुमन पोवार व बिस्मिल्ला मुजावर या चौघींना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे. त्याप्रमाणे सध्या शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा आहेत.२०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांकरिता अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.एका प्रभागातून एक नगरसेवक याप्रमाणे प्रभाग रचना करण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे; पण आगामी निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांतून होणार अथवा लोकनियुक्त नगराध्यक्षा असणार, याबाबत शासनाने कोणतेही निश्चित धोरण जाहीर केले नसल्याने काहीशी संभ्रमावस्था आहे. कारण नगराध्यक्ष हा लोकनियुक्त म्हणजे शहरातून निवडून द्यायचा झाल्यास संबंधित पदाचा उमेदवार ‘इलेक्शन मेरीट’ असणारा पाहिजे, अशी राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.