शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:07 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा ...

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंत प्रतिक्विंटल ३४५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. हंगाम संपल्यानंतर काय होईल, ही बाब कारखान्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साखरेचे दर वाढू लागले की केंद्रीय वाणिज्य मंत्री रामविलास पासवान ट्विट करायचे, ‘कारखाने व व्यापाºयांना स्टॉक मर्यादा घातली.’ पण आता ते गप्प का? असा सवाल करीत गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ झाल्याने सरासरी तीन हजार रुपये एफआरपी झाली आहे.उसाच्या पहिल्या उचलीबाबत निर्णय घेताना ३५०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. साखरेचे दर ३४०० रुपयांच्या खाली येऊ नयेत, यासाठी शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व रघुनाथदादा पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.सध्या राज्य बॅँकेने साखरेचे ३५०० रुपये मूल्यांकन केले असून त्यातील प्रक्रिया खर्च प्रतिटन २५० रुपये, अल्पमुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सहवीज / एम. टी. / मशिनरी आधुनिकीकरण कर्ज, पॅकेज पुनर्बांधणी कर्जहप्ता, थकीत व्याज यांसाठी प्रतिटन ५०० रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे केवळ उसासाठी २२७५ रुपये उपलब्ध होणार आहेत. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर मागील पंधरवड्यातील उसाचे पैसे भागवायचे म्हटले तरी अडचण येणार आहे.साखर मूल्यांकन व शॉर्ट मार्जिनसाखर मूल्यांकन बॅँकांकडून उसाची पहिली कमी पडणारीमिळणारी रक्कम उचल रक्कम३५०० रुपये २२२५ रुपये ३००० रु. ७७५ रुपये३४५० रुपये २१८२ रुपये ३००० ८१८ रुपये३४०० रुपये २१४० रुपये ३००० ८६० रुपये३३०० रुपये २०५५ रुपये ३००० ९४५ रुपयेयासाठीच तीन टप्प्यांत दर हवापक्क्या मालाचा दर निश्चित नसताना, तो वर्षभर गोदामामध्ये पडून राहत असताना कच्च्या मालाचा दर ठरविणारा साखर उद्योग हा एकमेव आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी उसाचा दर तीन टप्प्यांत देणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.शेट्टींवर विश्वास !देशातील शेतकरी संघटनांचा दोन दिवसांत दिल्लीत मोर्चा आहे. तिथे राजू शेट्टी साखरेच्या घसरलेल्या दराचा मुद्दा मांडतील, याचा मला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती