शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बावड्यातील पूल जमीन भूसंपादनाचा मोबदला १५ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST

• अगोदर जमिनीची खरेदी रमेश पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : राजाराम बंधाऱ्याजवळ नव्याने बांधण्यात ...

• अगोदर जमिनीची खरेदी

रमेश पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : राजाराम बंधाऱ्याजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, अशा ५५ शेतकऱ्यांबरोबर येत्या १५ दिवसांत जमीन खरेदीचे व्यवहार करून त्यांच्या खात्यावर रेडीरेकनरनुसार मोबदला जमा करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयाला जिल्हाधिकारी कार्यालयानेही हिरवा कंदील दाखवला असल्याचे समजते. भूसंपादन मोबदल्याची रक्कम सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात आहे.

‘कोल्हापूर बंधारा’ अशी राज्यभर ओळख करून देणारा राजाराम बंधारा कसबा बावड्यात पंचगंगा नदीवर १९२८ मध्ये बांधला गेला. पाणी अडविणे व गरजेनुसार खालील पात्रात पाणी सोडणे यासाठी या बंधाऱ्याची बांधणी करण्यात आली. मात्र बंधाऱ्याची उंची खूपच कमी असल्याने थोड्याशा पावसानेही हा बंधारा पाण्याखाली जातो व वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला. जानेवारी २०१७ ला पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली. मात्र पुलाच्या सुरुवातीच्या दोन पिलरचे काम जलद झाले. नंतर मात्र जमिनी भूसंपादनाचा प्रश्न उपस्थित झाल्याने हे काम रेंगाळत गेले. या पुलासाठी एकूण १३ गट नंबरमधील ५५ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांपैकी कसबा बावडा बाजूकडील चार शेतकरी, तर वडणगे, निगवे बाजूकडील ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी प्रथम जमीन भूसंपादनाचा मोबदला द्या व काम सुरू करा, अशी भूमिका घेतली. तरीही पुलाचे काम सुरू होते. शेतकऱ्यांनी या कामांला विरोध केला नव्हता. मात्र ठेकेदारांकडून कामाला विविध कारणांनी विलंब होत होता. पुलासाठी जमिनी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरनुसार मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग खरेदीचा व्यवहार करणार आहे. जसे व्यवहार पूर्ण होतील तसे त्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा केले जाणार आहेत. येत्या १५ दिवसांत हा सर्व व्यवहार पूर्ण करावयाचा निर्णय सार्वजनिक बांधकामने घेतला आहे.

चौकट

जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता

बावड्यातील पुलासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना जमीन भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत संबंधित शेतकऱ्यांना त्वरित भूसंपादनाची रक्कम अदा करावी, अशी मान्यता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्याने जमीन भूसंपादनाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

एस. बी. इंगवले शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम.

..............................

आता काय कारण सांगणार ?

कसबा बावडा पुलाचे काम अनेक वर्षे रेंगाळले आहे. प्रत्येक वेळी ठेकेदार कंपनी भूसंपादनाचा प्रश्न असल्याने काम रेंगाळल्याची कारणे सांगत होती; परंतु आता येत्या १५ दिवसांत हा सर्व प्रश्न निकाली निघाल्याने ठेकेदार कंपनीला पुलाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावेच लागणार आहे.