शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

थकहमीची रक्कम ठरविण्यासाठी शासनाने नेमली समिती; राजगोपाल देवरा अध्यक्ष : साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने विविध सहकारी संस्थांच्या कर्जाला दिलेल्या थकहमीची नक्की किती रक्कम आहे हे निश्चित करण्यासाठी शासनानेच गुरुवारी ...

कोल्हापूर : राज्य शासनाने विविध सहकारी संस्थांच्या कर्जाला दिलेल्या थकहमीची नक्की किती रक्कम आहे हे निश्चित करण्यासाठी शासनानेच गुरुवारी समिती स्थापन केली. वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा या समितीचे अध्यक्ष आहेत. सहा सदस्यीय समितीने तीन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. या थकहमीवरून राज्य शासन व राज्य सहकारी बँक यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने नक्की किती रक्कम राज्य बँकेला द्यावी लागणार, हे निश्चित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या व अन्य सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँकेने कर्जे दिली आहेत. या थकहमीचे २५०० कोटीं रुपये मिळावेत, असा दावा राज्य बँकेने केला आहे. न्यायालयाच्या क्लेम समितीने ही रक्कम १००९ कोटी निश्चित केली. त्यामध्ये व्याजाचा समावेश नाही. यापैकी शासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम कोरोनामुळे देता आलेली नाही. आता नेमलेली समिती मुख्यत: किती व्याजदर लावायचा हे निश्चित करणार आहे. व्याजदर निश्चित झाल्यावर रक्कमही निश्चित होईल व ती शासनाला मान्य असेल तर ती दिल्यानंतर हा वाद संपुष्टात येऊ शकतो. बँकेने अजून न्यायालयातील दावा मागे घेतलेला नाही. त्यामुळे शासन व राज्य बँक अशा चर्चेतून मार्ग काढण्यासाठी या दोन्हींचे नेते असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या संस्थेसाठी हे कर्ज दिले होते, त्या संस्था अडचणीत आल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्या संस्थांकडून ही रक्कम मिळणार नसेल तर त्याचे दायित्व शासनाकडेच येते. या रकमा खूप वर्षांपूर्वी दिल्या आहेत, त्यांची मुद्दल व व्याजाची रक्कम नेमकी किती द्यावी लागेल याची संस्थानिहाय चर्चा करून ठरविण्याचे काम ही समिती करील.

समिती अशी

अध्यक्ष : राजगोपाल देवरा, सदस्य सर्वश्री. साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख, साखर आयुक्त कार्यालयातील अर्थ विभागाचे सहसंचालक मंगेश तिटकारे हे सदस्य सचिव आहेत.

अजित पवार कनेक्शन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक संचालकांवर राज्य बँकेच्या थकीत कर्जापोटी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील बहुतांश रक्कम ही याच संस्थांची आहे. त्यामुळे शासनाने ही थकहमी दिल्यानंतर राज्य बँकेच्या कर्जाची परतफेड होते. परिणामी फसवणुकीच्या गुन्ह्यातूनही पवार यांच्यासह सर्वांचीच सुटका होऊ शकते.

तीन जिल्हा बँकांना मिळणार रक्कम

राज्य बँकेच्या सहकार्याने त्यावेळी नांदेड, उस्मानाबाद व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही काही सूतगिरण्यांना कर्ज दिले होते. त्यांनाही या थकहमीपोटी रक्कम मिळू शकते.