शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच कोल्हापुरात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने परगावहून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर ...

कोल्हापूर : कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने परगावहून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर अथवा ॲन्टीजन टेस्ट नकारात्मक असल्याचे ४८ तासांच्या आतील प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश काढला आहे.

जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये १५ टक्क्यांहून अधिक संख्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आहे. यात मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकप्रतिनिधींनी परगावहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली होती. त्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला.

त्यानुसार जिल्ह्यात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी येणाऱ्या किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या व्यक्तींनी जिल्ह्यात किंवा गावात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासात आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजन चाचणी केल्याचे व तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र नसल्यास प्रभाग समिती, ग्राम समिती किंवा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून या व्यक्तींना प्रवेश नाकारला जाईल.

एका गावांतून दुसऱ्या गावांत जाण्यावरही निर्बंध..

जिल्ह्यांतर्गत एका गावातून किंवा दुसऱ्या गावात जाण्यासाठीदेखीलसुद्धा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देणे, गृह-ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे याबाबत ग्राम समिती व प्रभाग समितीचा निर्णय अंतिम असेल. गावागावांच्या वेशीवर त्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

--

प्रमाणपत्र नसल्यास स्वॅब द्या

प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींनी तालुक्यातील शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत आधी स्वॅब देणे बंधनकारक आहे. तपासणी अहवाल नकारात्मक येईपर्यंत या नागरिकांना सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहावे लागेल. तपासणी न करता परस्पर घरी गेल्यास सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहावे लागेल. तीन दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील चार दिवसांच्या अलगीकरणातून सुट मिळेल.

--

लसीकरण झालेल्यांना सूट

कोल्हापुरात येणाऱ्या व्यक्तीने लसीकरणाचे दोनही डोस घेतले असतील व ज्यांना कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना ग्राम समिती व प्रभाग समितीच्या खात्रीनंतर अलगीकरणात राहणे बंधनकारक असणार नाही.

--

त्रास होणार, पण...

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु त्याचा फटका नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने रोज शेजारच्या गावांत, तालुक्यात व जिल्ह्यांत जाणाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे हा आदेश लागू होताच, लोकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली.