शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा परिषदेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता ...

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता हे कार्यालयच जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. २०१९ मध्येही सलग १५ दिवस जिल्हा परिषदेतून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे महापुराच्या संकटात जिल्हा परिषद पुन्हा एकदा प्रशासनाचा आधार ठरली आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने साहजिकच पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याचे पाणी शहरात पसरले आहे. जयंती नाल्याची फूग थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली आहे. पाणीच जाण्यासाठी वाव नसल्याने पावसाचे पाणीही जागीच साठून राहत आहे. परिणामी सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी साडेअकरानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यास सुरुवात झाली. दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव हे त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेत दाखल झाले.

तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना देत जिल्हा परिषद मुख्यालयातील यंत्रणा सक्रिय केली होती. दुपारी दोन नंतर पालकमंत्री सतेज पाटील, संध्याकाळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी जिल्ह्यातील महापुराच्या आपत्तीचे व्यवस्थापन सुरू होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अन्य कामांपेक्षा आता महापुराच्या संकटावर मात करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन अन्य शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सक्रिय झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत आल्याने या ठिकाणचा माहोलच बदलून गेला आहे. २०१९ च्या महापुरावेळीही येथूनच व्यवस्थापन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेतच बैठक घेतली होती.