शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बंदिस्त गटारीबाबत आरोग्याधिकारी धारेवर

By admin | Updated: December 12, 2014 00:36 IST

टोलविरोधी कृती समिती : ‘आयआरबी’च्या गटर्स सफाईबाबत विचारला जाब; मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा

कोल्हापूर : शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘बीओटी’ तत्त्वावर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूला दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारींची साफसफाई कितीवेळा केली? अशी विचारणा आज, गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. याप्रश्नी महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांना धारेवर धरत ‘आयआरबी’ विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर शहरात बांधलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी समिती व प्रशासन यांचा मंगळवारी (दि. १६) संयुक्त पाहणी दौरा करू, असे आश्वासन डॉ. दिलीप पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व ‘आयआरबी’ने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर शहरात ४९.४९ किलोमीटरचे रस्ते तयार केले. या रस्त्यांच्या कडेला दुतर्फा बांधलेल्या बंदिस्त गटारींची रोज साफसफाई करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. या गटारींतून प्रवाहित होणाऱ्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गत तीन वर्षांत या गटारींची कितीवेळा स्वच्छता केली? अशी विचारणा बाबा इंदुलकर यांनी केली. तसेच, कितीवेळा त्यावरील झाकणे उघडून गटारींची साफसफाई केली? यांत्रिक व्यवस्था उभी केली आहे का? ‘आयआरबी’ला महापालिकेने गटारींची ‘एनओसी’(ना हरकत प्रमाणपत्र) दिली आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानंतर दिलीप देसाई, दिलीप पवार यांनीही या प्रश्नांचा जाब विचारला. त्यावर डॉ. दिलीप पाटील यांनी, बांधलेली गटारे साफसफाईसाठी अडचणीची आहेत. तरीही साफसफाई करू, असे सांगितले. विजय पाटील यांनी, गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. शक्य तेवढे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, दीपा पाटील, अजित सासने, महेश सासने, लाला गायकवाड, सुरेश जरग, अशोक रामचंदानी, जयकुमार शिंदे, हंबीरराव मुळीक, वैशाली महाडिक, गीता राऊत, विवेक कोरडे, राजवर्धन यादव, सुनील मोहिते, वसंतराव मुळीक, गौरव लांडगे, सुजाता चव्हाण, सुशीला चव्हाण, किशोर घाटगे, सुनील पाटील, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, अर्जुन जाधव, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)मांडलेले मुद्दे असे...१) गटारींमुळे रोगराई पसरून मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.२) १७ डिसेंबर २०११ पासून आजअखेर कितीवेळा ही गटारे स्वच्छ केली ?३) गटारींची रोज साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याला खुर्चीवर बसवामहापालिकेने आरोग्य विभागाशी निगडित नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे पदविका नाही. त्यामुळे या पदावर सक्षम अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसवावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी यावेळी केली.महापालिकेबरोबर ‘आयआरबी’ने कसा करार केला आहे, हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. काय करार केला आहे, हे मी पाहिलेले नाही, ते पहिल्यांदा बघू. - डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका.