शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बंदिस्त गटारीबाबत आरोग्याधिकारी धारेवर

By admin | Updated: December 12, 2014 00:36 IST

टोलविरोधी कृती समिती : ‘आयआरबी’च्या गटर्स सफाईबाबत विचारला जाब; मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा

कोल्हापूर : शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून ‘बीओटी’ तत्त्वावर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूला दुतर्फा बांधण्यात आलेल्या गटारींची साफसफाई कितीवेळा केली? अशी विचारणा आज, गुरुवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. याप्रश्नी महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांना धारेवर धरत ‘आयआरबी’ विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. यावर शहरात बांधलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी समिती व प्रशासन यांचा मंगळवारी (दि. १६) संयुक्त पाहणी दौरा करू, असे आश्वासन डॉ. दिलीप पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व ‘आयआरबी’ने ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर शहरात ४९.४९ किलोमीटरचे रस्ते तयार केले. या रस्त्यांच्या कडेला दुतर्फा बांधलेल्या बंदिस्त गटारींची रोज साफसफाई करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. या गटारींतून प्रवाहित होणाऱ्या सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गत तीन वर्षांत या गटारींची कितीवेळा स्वच्छता केली? अशी विचारणा बाबा इंदुलकर यांनी केली. तसेच, कितीवेळा त्यावरील झाकणे उघडून गटारींची साफसफाई केली? यांत्रिक व्यवस्था उभी केली आहे का? ‘आयआरबी’ला महापालिकेने गटारींची ‘एनओसी’(ना हरकत प्रमाणपत्र) दिली आहे का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानंतर दिलीप देसाई, दिलीप पवार यांनीही या प्रश्नांचा जाब विचारला. त्यावर डॉ. दिलीप पाटील यांनी, बांधलेली गटारे साफसफाईसाठी अडचणीची आहेत. तरीही साफसफाई करू, असे सांगितले. विजय पाटील यांनी, गटारी स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. शक्य तेवढे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, अशोक पोवार, दीपा पाटील, अजित सासने, महेश सासने, लाला गायकवाड, सुरेश जरग, अशोक रामचंदानी, जयकुमार शिंदे, हंबीरराव मुळीक, वैशाली महाडिक, गीता राऊत, विवेक कोरडे, राजवर्धन यादव, सुनील मोहिते, वसंतराव मुळीक, गौरव लांडगे, सुजाता चव्हाण, सुशीला चव्हाण, किशोर घाटगे, सुनील पाटील, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, अर्जुन जाधव, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)मांडलेले मुद्दे असे...१) गटारींमुळे रोगराई पसरून मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.२) १७ डिसेंबर २०११ पासून आजअखेर कितीवेळा ही गटारे स्वच्छ केली ?३) गटारींची रोज साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्याला खुर्चीवर बसवामहापालिकेने आरोग्य विभागाशी निगडित नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे पदविका नाही. त्यामुळे या पदावर सक्षम अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसवावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी यावेळी केली.महापालिकेबरोबर ‘आयआरबी’ने कसा करार केला आहे, हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. काय करार केला आहे, हे मी पाहिलेले नाही, ते पहिल्यांदा बघू. - डॉ. दिलीप पाटील, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका.