शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सहकारातील सत्तेसाठी संस्थांच्या जोडण्या

By admin | Updated: November 2, 2014 23:54 IST

निवडणुकीचे वेध : दोन हजार ६८९ सहकारी संस्था

कसबा बावडा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेचे गुऱ्हाळ पंधरा दिवस होऊनही अद्याप थांबलेले नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ६८९ सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यांत घेण्याच्या हालचाली सहकार खात्याने सुरू केल्याने पुन्हा एकदा निवडणुकांच्या चर्चेच्या गुऱ्हाळाला जोरात सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये जिल्हा बॅँक, गोकुळ संघ आणि बलाढ्य नेतेमंडळींच्या ताब्यात असणाऱ्या काही कारखान्यांचा समावेश आहे.‘गोकुळ’ला काय होणार, जिल्हा बॅँक राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार काय? या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमदारांची कशी आणि काय भूमिका राहणार? जिल्हा बॅँकेत संचालकपदाची संख्या घटल्याने कोणाचा पत्ता ‘कट’ होणार, या दोन्ही संस्थांत विविध पक्षांचे नेते सत्तेसाठी एकत्र येतील काय? साखर कारखाना पुन्हा सत्तारूढ गटाच्या ताब्यात राहणार काय? अशा प्रकारच्या या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.या चर्चेप्रमाणेच आपल्या गावातील विकास सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, दूध संस्था यांच्या निवडणुकांबद्दलही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही गावपातळीवरील नेतेमंडळींही आता सावध भूमिका घेत आहेत.ग्रामीण भागात सहकारी संस्थेवर चेअरमन, संचालक असणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे असते. त्यामुळे या संस्थांवरील सत्तेसाठी कार्यकर्ते धडपडत असतात. त्यामुळे ज्याला निवडणूक लढवावयाची आहे असे अनेक इच्छुक आता आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेड केल्याचा दाखला घेत आहेत. आपण कोणत्या संस्थेत कोणाला जामीन तर नाही ना? याची माहितीही घेत आहेत.सध्या ग्रामीण भागात सुगीचे दिवस सुरू आहेत; परंतु सायंकाळी घरी परतल्यानंतर गावच्या पारावर, दूध डेअरीच्या व विकास संस्थेच्या कार्यालयात निवडणुकीच्या खलबतांना सुरुवात झाली आहे. सहकार खात्याने निवडणुकीत पात्र ठरलेल्या तब्बल दोन हजार ६८९ संस्थांना निवडणुकीविषयी कळविले आहे. त्यामुळे सहकारी संस्थाही आता सावध झाल्या आहेत. आज ना उद्या केव्हाही निवडणुकीची तयारी करा, असा आदेश येऊ शकतो. त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून पात्र संस्था त्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत. एकूण २,६८० संस्थांच्या निवडणुका जरी येत्या काही महिन्यांत होणार असल्या तरी पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात ३७७ संस्थांच्या निवडणुकासहकार खात्याकडून केव्हाही निवडणुकीची तयारी करा, असा आदेश येऊ शकतो. त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून पात्र संस्था त्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत. इच्छुक आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेड केल्याचा दाखला घेत आहेत. एकूण २,६८९ संस्थांच्या निवडणुका होणार पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुकासहकार खात्याने पात्र संस्थांना निवडणुकीसंदर्भात कळवले आहे.