शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

उपसाबंदी आली २२ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:30 IST

उपसाबंदी शिथिल : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी उपाय

 गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील शेतीच्या पाण्यासाठीची उपसाबंदी अखेर ३४ दिवसांवरून २२ दिवसांवर आणण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यातील यंदाची दुष्काळी स्थिती विचारात घेऊन उपसाबंदी कालावधी कमी करण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांसह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपासाबंदी कालावधी कमी करण्यात आला आहे. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नंदकुमार मोरे यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, ८ डिसेंबरला चित्री मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३३४ द.ल.घ.फू.इतका होता. त्यापैकी आपत्कालीन परिस्थितीसाठी तीनशे द.ल.घ.फू.इतका पाणीसाठा राखीव ठेवण्याची तरतूद प्रकल्पाच्या अहवालात आहे.गडहिंग्लज व आजरा या दोन शहरांसह तालुक्यातील ६० ते ७० ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजना आणि मर्यादित स्वरूपात शेतीला पाणी पुरविण्यासाठी हिरण्यकेशी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ३४ दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली होती.तथापि, उसासह रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्याच्या दृष्टिकोनातून उपसाबंदी कालावधी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत उपसाबंदी लागू राहील. त्यानंतर प्रकल्पातील पाणीसाठा आणि कार्यक्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपसाबंदी कालावधी निश्चित करणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)