शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

उपसाबंदी आली २२ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:30 IST

उपसाबंदी शिथिल : रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी उपाय

 गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्यासाठी हिरण्यकेशी नदीवरील शेतीच्या पाण्यासाठीची उपसाबंदी अखेर ३४ दिवसांवरून २२ दिवसांवर आणण्यात आली. गडहिंग्लज तालुक्यातील यंदाची दुष्काळी स्थिती विचारात घेऊन उपसाबंदी कालावधी कमी करण्याची मागणी विविध पक्ष-संघटनांसह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपासाबंदी कालावधी कमी करण्यात आला आहे. गडहिंग्लज पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नंदकुमार मोरे यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, ८ डिसेंबरला चित्री मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३३४ द.ल.घ.फू.इतका होता. त्यापैकी आपत्कालीन परिस्थितीसाठी तीनशे द.ल.घ.फू.इतका पाणीसाठा राखीव ठेवण्याची तरतूद प्रकल्पाच्या अहवालात आहे.गडहिंग्लज व आजरा या दोन शहरांसह तालुक्यातील ६० ते ७० ग्रामपंचायतींच्या नळ पाणीपुरवठा योजना आणि मर्यादित स्वरूपात शेतीला पाणी पुरविण्यासाठी हिरण्यकेशी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ३४ दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली होती.तथापि, उसासह रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्याच्या दृष्टिकोनातून उपसाबंदी कालावधी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारीपर्यंत उपसाबंदी लागू राहील. त्यानंतर प्रकल्पातील पाणीसाठा आणि कार्यक्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपसाबंदी कालावधी निश्चित करणार आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)