शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

गुळाचे सौदे पाडले बंद

By admin | Updated: April 2, 2015 00:40 IST

२० हजार रवे पडून : अन्न-औषधाच्या कारवाईने व्यापारी आक्रमक

कोल्हापूर : सौद्यात खरेदी केलेल्या गुळाची सॅम्पल घेऊन संपूर्ण गूळ जप्तीची कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक झाले. व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि.१) गुळाचे सौदे काढण्यास नकार दिल्याने सुमारे २० हजार गुळाचे रवे समितीत पडून आहेत. समितीमध्ये शुक्रवारी (दि. २७) सौदा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ए. एच. कातावाला यांच्या गोडावूनमधून गुळाची सॅम्पल घेतली. गुळात हायड्रॉस पावडरचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांनी सर्व गूळ जप्त करून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली. व्यापारी आक्रमक झाले असून गूळ शेतकरी तयार करतात, मग कारवाई आमच्यावर का? असा सवाल करत बुधवारी सकाळी व्यापाऱ्यांनी गुळाचे सौदे काढण्यास नकार दिला. बुधवारी समितीत एक किलोचे साडेपाच हजार तर दहा किलोचे १५ हजार गूळरव्याची आवक झाली. सौदे काढले नसल्याने २० हजार गूळ रवे बाजार समितीत पडून आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशासक रंजन लाखे यांनी व्यापारी, शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. गुळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी समितीची असल्याने समितीने गूळ खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. शेतकरी, व्यापारी व समिती अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली. गुळात भेसळ व्यापाऱ्यांकडे होत नाही, मग आमच्यावर कारवाई का? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला. चूक नसताना गुन्हे दाखल होणार असतील तर आम्हाला हा व्यवसायच नको, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला. अखेर गुरुवारी सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन कारवाईबाबतचा विषय संपविण्याचा निर्णय घेतला. पण सौदे सुरू करण्यास नकार दिला. सौद्यात गूळ घेतल्यानंतर बाहेर पाठविताना अन्न औषध विभागाने कारवाई केली तर त्यास जबाबदार कोण? विनाकारण गुन्हे अंगावर का घ्यायचे? असा सवाल व्यापाऱ्यांनी केल्याने सौद्याचा पेच कायम राहिला. (प्रतिनिधी)समितीच्या दारात गूळ ओतूगुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, अवकाळी पाऊस, गुळाचा घसरलेल्या दरामुळे गुऱ्हाळघरांसाठी यंदाचा हंगाम अडचणीचा ठरला आहे. अशा परिस्थितीत गाळप करून गूळ समितीत आणून सौदे होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला. व्यापारी खरेदी करत नसतील आणि बाजार समिती केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल, तर आम्ही समितीच्या दारात गूळ ओतू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.