शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाण्याच्या टाकीत ढपला

By admin | Updated: June 23, 2016 01:08 IST

महापालिकेचा कारभार : ८२ लाखांच्या टाकीचे १.७५ कोटी रुपये अदा

कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड परिसरात पाण्याची टाकी उभारण्याचे मूळ काम ८१ लाख ७३ हजार रुपयांचे; पण निविदा मंजूर झाली १०९ टक्के जादा दराची; म्हणजेच तब्बल १ कोटी ७५ लाखांची! टाकीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरीही या टाकीत अद्याप पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. प्रशासनाने निवडलेली चुकीची जागा, ठेकेदाराने काम करण्यास लावलेला विलंब आणि चुकीच्या कामाचा फटका मात्र या टाकीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील हजारो नागरिकांना बसला आहे. पैसेच्या पैसे गेले अन् पाण्याचाही पत्ता नाही; त्यामुळे नागरिकांसाठी हे काम केले की पैसे लाटण्यासाठी, अशी शंका निर्माण झाली आहे. या कामात पन्नास लाखांचा ढपला पाडल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला.कोल्हापूर महानगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणीपुरवठा विभागाने मार्केट यार्ड परिसरात २० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचे काम हाती घेतले. मूळ अंदाजपत्रकानुसार या कामाची किंमत ८१ लाख ७३ हजार रुपये होती. या कामासाठी मे. जे. एन. सिंग सिव्हिल इंजिनिअर या ठेकेदाराने १०९ टक्के जादा दराने निविदा भरली होती. अन्य ठेकेदाराने हे काम मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची तयारी दाखविली होती. तरीही ते जे. एन. सिंग यांना काम दिले गेले. ८१ लाख ७३ हजारांचे हे काम १ कोटी ७५ लाखांवर गेले. सिंग यांना आतापर्यंत ही रक्कम अदा केली. कामाची मुदत संपून गेल्यानंतर नऊ महिने उशिरा काम पूर्ण केले गेले. तरीही ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. आता पुन्हा ठेकेदाराने जादा कामाचे ३६ लाख रुपये बिल मिळावे म्हणून महापालिकेकडे पत्रव्यवहार केला असून, काही अधिकारी ते अदा करण्याच्या प्रयत्नात आहेत. मूळ किमतीपेक्षा १०९ टक्के जादा रक्कम खर्च करूनही या टाकीत अद्याप पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. एकदा चाचणी घेण्यासाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाण्याची टाकी भरण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला; कारण या टाकीत पाणीच चढत नाही. टाकीसाठी निवडलेली चुकीची जागा, झालेले चुकीचे काम यामुळे टाकी भरत नसल्याची बाब आता अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करून टाकी बांधूनही काहीच उपयोग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या टाकीच्या चुकीच्या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)कामाचे पुनर्मूल्यांकन करावेपाण्याच्या टाकीचे जे काम पूर्ण केले आहे, त्याचे पुनर्मूल्यांकन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावे. टाकीत पाणी पडत नाही याची जबाबदारी म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याकडून झालेला खर्च वसूल करावा; तसेच जे. एन. सिंग यांना काळ्या यादीत टाकावे, अशा मागण्या शेटे यांनी केल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव, मेंबर सेक्रेटरी जीवन प्राधिकरण, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडेही अशा प्रकारची मागणी केली आहे.