शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

जिल्ह्यातील नागरिकांनी भरला ५ कोटी ४० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर प्रशासनाने वारंवार सांगूनही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. ...

कोल्हापूर प्रशासनाने वारंवार सांगूनही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना काळात अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. परिणामी या सर्वांकडून प्रशासनाने तब्बल ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर हा संसर्गाद्वारे होणारा आजार असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात अनेकांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला. मात्र हळूहळू जसे लॉकडाऊन वाढत जाईल तसतसे नागरिकांचा संयम सुटला. आॅक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाचा कहर कमी झाला होता. त्यामुळे मास्क वगळता अन्य बंधने नव्हती. मात्र उर्वरित वर्षभरासाठी अनेक बंधने लादल्यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी अनेक बंधने झुगारली.

या सगळ्याच परिणाम म्हणजे प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली. संचारबंदी जाहीर झाली असताना विनाकारण वाहनांवरून फिरणे, वाहन चालक परवाना नसणे, मंडईत मास्क न लावता भाजी विक्रीसाठी बसणे, रस्त्यांवर मास्क न वापरता फिरणे, विनापरवाना दुकाने उघडणे, विवाह समारंभांचे आयोजन करणे अशासारख्या अनेक नियमांचा भंग केल्याप्रकरणी विविध पातळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी केलेल्या या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल २ लाख ५० हजार ९०२ प्रकरणांमध्ये ५ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचना गांभिर्याने घेतल्या नसल्याचेच हे द्योतक आहे. पोलिसांनी तर ज्या वेळी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली तेव्हा गाडीवरून फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त करून लॉकडाऊन उठल्यानंतर परत केल्या होत्या. एवढे असूनही अनेकजण घरात बसत नाहीत हे वास्तव आहे.

चौकट

स्थानिक स्वराज्य संस्था, विभाग एकूण प्रकरणे वसूल दंड

महानगरपालिका २७,१४३ १ कोटी ७२ लाख ३१ हजार ८३५

ग्रामपंचायतींमार्फत १४,५२६ ३२ लाख ९० हजार ५५०

पोलीस विभाग १, ९२, ४१९ २ कोटी ९८ लाख ८६ हजार ८७०

नगरपालिका १६७१३ ३५ लाख ८९ हजार १२०

एकूण ७१८२६/१,७९,०७६ ५ कोटी ३९ लाख ९८ हजार ३७५