शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

इचलकरंजीत दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते ...

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवांची आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अकरानंतरही नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, प्रशासन केवळ गांधारीची भूमिका घेत आहे.

शहर व परिसरात दररोज किमान ५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहे. शहरातील मुख्य मार्ग व चौक वगळता अन्य ठिकाणी कारवाई शून्य आहे. अकरानंतर शहरात विनाकारण फिरण्यास बंदी आहे. तरीही नागरिक अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण व विनामास्क फिरत आहेत. यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे.

चौकटी

कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज

शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. एक-दोन दिवसांच्या कारवाईनंतर पथकाची कारवाई थंडावते. त्यामुळे नागरिक पुन्हा शहरात बिनधास्त फिरत असतात. यामुळे पथकाने करवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

अशाने कोरोना संसर्ग थांबणार कसा?

प्रशासनाकडून विनाकारण फिरणा-यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात असून, यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात फिरणारे चार ते पाचजण पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोरोना संसर्ग वाढतच जाणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग थांबणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनाही खबरदारी घेण्याची गरज

प्रशासनाने केवळ सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु आस्थापना बंद झाल्यानंतरही विनाकारण अनेकजण फिरत असतात. केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडले पाहिजे. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजीपोटी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.