शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

इचलकरंजीत दिवसभर नागरिकांची ये-जा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते ...

इचलकरंजी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा कालावधी १५ जूनपर्यंत वाढविला आहे. सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवांची आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अकरानंतरही नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून, प्रशासन केवळ गांधारीची भूमिका घेत आहे.

शहर व परिसरात दररोज किमान ५० कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला थोपविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहे. शहरातील मुख्य मार्ग व चौक वगळता अन्य ठिकाणी कारवाई शून्य आहे. अकरानंतर शहरात विनाकारण फिरण्यास बंदी आहे. तरीही नागरिक अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण व विनामास्क फिरत आहेत. यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे; अन्यथा कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे.

चौकटी

कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज

शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. एक-दोन दिवसांच्या कारवाईनंतर पथकाची कारवाई थंडावते. त्यामुळे नागरिक पुन्हा शहरात बिनधास्त फिरत असतात. यामुळे पथकाने करवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

अशाने कोरोना संसर्ग थांबणार कसा?

प्रशासनाकडून विनाकारण फिरणा-यांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात असून, यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरात फिरणारे चार ते पाचजण पॉझिटिव्ह आढळत असल्याने कोरोना संसर्ग वाढतच जाणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग थांबणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनाही खबरदारी घेण्याची गरज

प्रशासनाने केवळ सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक खरेदीसाठी परवानगी दिली आहे. परंतु आस्थापना बंद झाल्यानंतरही विनाकारण अनेकजण फिरत असतात. केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडले पाहिजे. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजीपोटी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.