शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

चुयेकर, हत्तरकींच्या वारसदारांना डच्चू

By admin | Updated: December 27, 2014 00:18 IST

गोकुळ दूध संघ : ‘स्वीकृत’बरोबर आगामी पॅनेलमध्येही संधी अशक्य; संचालकांतील अंतर्गत राजकारण

राजाराम लोंढे- कोल्हापूर  जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संस्थापक स्व. आनंदराव पाटील-चुयेकर व ज्येष्ठ संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या वारसांना विद्यमान संचालक मंडळात स्वीकृत करण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. दोन्ही नेत्यांचे निधन होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांच्या वारसांना संधी देण्यावर नेते व संचालक मंडळात एकमत झालेले नाही. संचालक मंडळ व नेत्यांमधील अंतर्गत राजकारण पाहता, संघाच्या आगामी निवडणुकीत पॅनेलमध्येही त्यांच्या वारसांना संधी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.‘गोकुळ’चे शिल्पकार म्हणून आनंदराव पाटील-चुयेकर यांना सारा महाराष्ट्र ओळखत होता. त्यामध्ये तथ्यही आहे. संघाच्या घोडदौडीत पाटील-चुयेकर यांचे योगदान मोठे आहे, हे कोणीही नाकारत नाही. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या निर्णय प्रक्रियेसह राजकारणात त्यांच्या शब्दाला वजन होते; पण अलीकडील दहा-पंधरा वर्षांत अंतर्गत राजकारणामुळे ते काहीसे बाजूला पडले होते. जिवंतपणी आपले स्मारक ‘गोकुळ’मध्ये उभे करावे, अशी त्यांची इच्छा होती; पण संचालक मंडळाला त्यांची इच्छा मरणानंतरही अद्याप पूर्ण करता आलेली नाही. राजकुमार हत्तरकी यांचेही संघाच्या वाटचालीत योगदान आहे. हत्तरकी यांचे २२ नोव्हेंबर २०१३ रोजी, तर चुयेकर यांचे १६ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. संचालक मंडळात या दोन अनुभवी संचालकांची उणीव भासतेच; पण त्यांच्या वारसांच्या रूपाने संचालक मंडळात त्यांना प्रतिनिधित्व देण्याची संधी संस्थेच्या संचालकांना होती. वर्ष झाले शशिकांत पाटील-चुयेकर व सदानंद हत्तरकी यांना संचालक मंडळात संधी देण्यावरून एकमत झाले नाही. शशिकांत पाटील यांच्याऐवजी आनंदराव पाटील यांच्या पत्नींना संधी द्यावी, अशीही काही दिवस चर्चा झाली. यासाठी काही ज्येष्ठ संचालक आग्रही होते; पण विविध कारणे पुढे करीत वेळ मारून नेण्याचे काम झाले. याबाबत नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. आता त्यांच्या वारसांना संघाच्या आगामी निवडणुकीत संधी मिळेल अशी अपेक्षा आहे; पण अंतर्गत राजकारण पाहता सत्तारूढ पॅनेलमध्ये त्यांना संधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ‘स्वीकृत’बरोबर पॅनेलमधूनही चुयेकर, हत्तरकी यांच्या वारसदारांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. शाहूवाडीचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील-भेडसगावकर यांच्या निधनानंतरही त्यांच्या वारसदारांना स्वीकृतही केले नाही आणि त्यापुढील निवडणुकीत संधीही दिली नव्हती.‘त्या’ शपथेचे काय?तीन वर्षांपूर्वी संघाच्या सात माजी अध्यक्षांनी तिरूपती येथे जाऊन ‘बालाजी’च्या साक्षीने नेत्यांमध्ये काहीही मतभेद होऊ देत; पण एकत्रित राहण्याची शपथ घेतली होती. त्याची चर्चाही जिल्ह्यात जोरात होती; पण आता त्यातील दोन माजी अध्यक्षांच्या वारसांना स्वीकृत करून घेण्यासाठी कितीजणांनी प्रयत्न केले, ‘त्या’ शपथेचे काय झाले, अशी विचारणा आता त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.