शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

चुयेकर, हत्तरकींच्या वारसदारांना डच्चू

By admin | Updated: December 27, 2014 00:18 IST

गोकुळ दूध संघ : ‘स्वीकृत’बरोबर आगामी पॅनेलमध्येही संधी अशक्य; संचालकांतील अंतर्गत राजकारण

राजाराम लोंढे- कोल्हापूर  जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) संस्थापक स्व. आनंदराव पाटील-चुयेकर व ज्येष्ठ संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या वारसांना विद्यमान संचालक मंडळात स्वीकृत करण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. दोन्ही नेत्यांचे निधन होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांच्या वारसांना संधी देण्यावर नेते व संचालक मंडळात एकमत झालेले नाही. संचालक मंडळ व नेत्यांमधील अंतर्गत राजकारण पाहता, संघाच्या आगामी निवडणुकीत पॅनेलमध्येही त्यांच्या वारसांना संधी मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.‘गोकुळ’चे शिल्पकार म्हणून आनंदराव पाटील-चुयेकर यांना सारा महाराष्ट्र ओळखत होता. त्यामध्ये तथ्यही आहे. संघाच्या घोडदौडीत पाटील-चुयेकर यांचे योगदान मोठे आहे, हे कोणीही नाकारत नाही. त्यामुळेच ‘गोकुळ’च्या निर्णय प्रक्रियेसह राजकारणात त्यांच्या शब्दाला वजन होते; पण अलीकडील दहा-पंधरा वर्षांत अंतर्गत राजकारणामुळे ते काहीसे बाजूला पडले होते. जिवंतपणी आपले स्मारक ‘गोकुळ’मध्ये उभे करावे, अशी त्यांची इच्छा होती; पण संचालक मंडळाला त्यांची इच्छा मरणानंतरही अद्याप पूर्ण करता आलेली नाही. राजकुमार हत्तरकी यांचेही संघाच्या वाटचालीत योगदान आहे. हत्तरकी यांचे २२ नोव्हेंबर २०१३ रोजी, तर चुयेकर यांचे १६ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. संचालक मंडळात या दोन अनुभवी संचालकांची उणीव भासतेच; पण त्यांच्या वारसांच्या रूपाने संचालक मंडळात त्यांना प्रतिनिधित्व देण्याची संधी संस्थेच्या संचालकांना होती. वर्ष झाले शशिकांत पाटील-चुयेकर व सदानंद हत्तरकी यांना संचालक मंडळात संधी देण्यावरून एकमत झाले नाही. शशिकांत पाटील यांच्याऐवजी आनंदराव पाटील यांच्या पत्नींना संधी द्यावी, अशीही काही दिवस चर्चा झाली. यासाठी काही ज्येष्ठ संचालक आग्रही होते; पण विविध कारणे पुढे करीत वेळ मारून नेण्याचे काम झाले. याबाबत नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. आता त्यांच्या वारसांना संघाच्या आगामी निवडणुकीत संधी मिळेल अशी अपेक्षा आहे; पण अंतर्गत राजकारण पाहता सत्तारूढ पॅनेलमध्ये त्यांना संधी मिळण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ‘स्वीकृत’बरोबर पॅनेलमधूनही चुयेकर, हत्तरकी यांच्या वारसदारांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. शाहूवाडीचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील-भेडसगावकर यांच्या निधनानंतरही त्यांच्या वारसदारांना स्वीकृतही केले नाही आणि त्यापुढील निवडणुकीत संधीही दिली नव्हती.‘त्या’ शपथेचे काय?तीन वर्षांपूर्वी संघाच्या सात माजी अध्यक्षांनी तिरूपती येथे जाऊन ‘बालाजी’च्या साक्षीने नेत्यांमध्ये काहीही मतभेद होऊ देत; पण एकत्रित राहण्याची शपथ घेतली होती. त्याची चर्चाही जिल्ह्यात जोरात होती; पण आता त्यातील दोन माजी अध्यक्षांच्या वारसांना स्वीकृत करून घेण्यासाठी कितीजणांनी प्रयत्न केले, ‘त्या’ शपथेचे काय झाले, अशी विचारणा आता त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.