शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST

कोपार्डे - राज्यातील १८७ साखर कारखान्यांकडून ८ कोटी ४३ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याचा ...

कोपार्डे - राज्यातील १८७ साखर कारखान्यांकडून ८ कोटी ४३ लाख ८६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३ टक्के असून ८ कोटी ६९ लाख ३५ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सध्या राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली असून साखर हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारी व ऊसतोड मजुरांची टंचाई यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर हंगाम सुरू करण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. पण सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला. ऊस दराबाबत कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यामध्ये तडजोड झाली. नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील कारखान्यांच्या गाळप हंगामाला गती मिळाली. राज्यात सहकारी ९५, तर खासगी ९२ असे एकूण १८७ साखर कारखान्यांनी हंगाम यशस्वी पार पाडले.

राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, सरासरी साखर उतारा व साखर उत्पादनात आघाडीवर आहे. पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४ एप्रिलपर्यंत राज्यातील ३२ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २५ साखर कारखाने आहेत. कोल्हापूर २, पुणे -१, औरंगाबाद, नांदेड प्रत्येकी, नागपूर २ असे कारखाने बंद झाले आहेत. हंगाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. राज्यात अजूनही ५० ते ६० लाख मे. टन ऊस गाळपाविना उभा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

४ एप्रिलपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा लेखाजोखा लाख मे. टनात

विभाग - ऊस गाळप - साखर उत्पादन उतारा टक्के

कोल्हापूर २०४.३३ २४२.४६ ११.८७

पुणे १८५.१८ १९७.३५ १०.६६

सोलापूर १६८.८७ १५७.०३ ९.३

अहमदनगर १२७.१३ १२१.३७ ९.५५

औरंगाबाद। ७३.२६ ६८.६८ ९.२९

नांदेड ७५.०५ ७४.६ ९.८७

अमरावती। ५.८१ ५.२ ८.९५

नागपूर ३.५३। ३.२ ९.०७ ------------------------------------------------------------

एकूण ८४३.८६ ८६९.३६ १०.३