शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चिकोत्रा प्रकल्प सिंचनासाठी होणार ‘नॉट रिचेबल’

By admin | Updated: November 9, 2015 23:41 IST

‘लक्ष्मणरेषा’ निश्चित : जानेवारी महिन्यापर्यंत मिळणार दोन वेळाच पाणी

दत्तात्रय पाटील- म्हाकवे -चिकोत्रा धरणात यंदा पावसाअभावी केवळ ४६ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील ३३ गावांची जूनअखेर तहान भागविण्यासाठी उपलब्ध ६९८ द.ल.घ.फू. पैकी १३५ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे, तर जूनअखेरपर्यंत १०० द.ल.घ.फू. इतके पाणी बाष्पीभवन होऊन वाया जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या पाणी वापराला ‘लक्ष्मणरेषा’ घालण्यात आली आहे.सिंचनासाठी केवळ १९० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे हे पाणी दोन महिन्यांसाठी टप्प्याटप्प्याने १२ जानेवारीपर्यंत दोन वेळाच दिले जाणार आहे. त्यानंतर जून किंवा पावसाळा सुरू होईपर्यंत शेतीसाठी पाण्याचा थेंबही मिळणार नसल्याचे चिकोत्रा प्रकल्प प्रशासनाने जाहीरपणे नमूद केले आहे. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील पिके धोक्यात असून याचा येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.१९९६ मध्ये चिकोत्रा खोऱ्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची गरज ओळखून दीड टीएमसी इतका पाणीसाठा होईल या दृष्टीने चिकोत्रा नदीवर हे धरण बांधण्यात आले; परंतु या धरणात येणाऱ्या पाणी स्रोताचे प्रमाण कमी आहे. त्यातच भरीस भर म्हणजे यंदा पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या धरणात अत्यल्प पाणीसाठा झाला. या खोऱ्यात सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे, तर ३३ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काहीअंशी निकाली निघाला.मात्र, अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि चिकोत्रा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची संयुक्तिक बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम देण्यात आला, तर शेतीच्या पाण्याला उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. जानेवारीनंतर शेतीच्या पाण्याची जबाबदारी चिकोत्रा प्रशासनाने झटकली आहे.विशेष म्हणजे येथील पाणीटंचाई लक्षात घेऊन तालुक्यातील शाहू, मंडलिक, सरसेनापती घोरपडे या कारखान्यांनीही या क्षेत्रातील ऊस प्राधान्याने उचल करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी आंदोलनाची धग थांबून कारखाने सुरळीत चालून येथील संपूर्ण उसाची तोड होईपर्यंत का असेना पाण्याची गरज आहेच.४६ टक्के पाणीसाठा : ऊस लावणी थांबवागेल्या दीड महिन्यापूर्वीपासूनच चिकोत्रा प्रशासनाने पाण्याची कमतरता लक्षात घेऊन या कार्यक्षेत्रातील गावांत ग्रामपंचायत तसेच स्वत: अधिकाऱ्यांनी ऊस लावणी करू नये. जानेवारीनंतर पिकांना पाणी मिळणे कठीण आहे, असे आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाचे न ऐकता ऊस लावणी केल्या आहेत. त्यामुळे या लावण झालेल्या उसाचे भवितव्य अंधारमय बनले आहे.