शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मदतीचे जुने निकष लावून मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर: ज्यांना शेतीतले कळत नव्हते, त्यांनी २०१९च्या महापुरात मदत केली, पण आता सगळं कळतंय तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले ...

कोल्हापूर: ज्यांना शेतीतले कळत नव्हते, त्यांनी २०१९च्या महापुरात मदत केली, पण आता सगळं कळतंय तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. जुने निकष लावून जाहीर होणाऱ्या मदतीचे आकडे पाहिले तर मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्तांची कुचेष्टाच झाली आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली. सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या २३ ऑगस्टला पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील, असेही त्यांनी जाहीर केले.

जिल्ह्यात महापुराने झालेली हानी आणि सरकारच्या मदतीच्या निकषावरून पूरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांचा आवाज ‘स्वाभिमानी’च्या झेंड्याखाली एकत्र करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्याची सविस्तर माहिती शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिली. २३ ला दुपारी १ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. पूरग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी, यंत्रमागधारक यात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यानवर, जनार्दन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, यावेळच्या महापुराने २०१९ पेक्षाही जास्त नुकसान केले आहे. शेती, उद्योग उद्‌ध्वस्त झाला आहे, त्यांना उभारी देण्यासाठी भरीव मदतीची अपेक्षा होती. महापूर पाहणी दौऱ्यावेळी आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांनीही भरीव मदतीचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात हातात काहीही पडलेले नाही.

चौकट

काडीकचऱ्याचा खर्चही निघणार नाही

मंत्रालयातून माहिती घेतली असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला ५०० ते ६०० कोटी रुपयेच येणार आहेत. रक्कम कमी असल्याने २०१५ चा निकषांनुसार त्यांचे वाटप होणार आहे. यातील निकष पाहता ३३ टक्के नुकसानीसह उसाला प्रतिएकर ५ हजार ४०० रुपये मिळणार आहेत झालेले नुकसान पाहिले तर शेतातील कुजलेले काडसार बाहेर काढण्याचाही खर्च निघणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

मोर्चातील प्रमुख मागण्या

पूरग्रस्तांची पीक कर्जमाफी करावी

कोल्हापूर व सांगलीतील १०३ पुलांच्या बाजूचा भराव काढून कमालीचे पूल बांधावेत

नियमित कर्जदारांना ५० हजाराचे सानुग्रह अनुदान द्यावे

पूरपट्ट्यातील घरांचे गायरानात विनाअट पुनर्वसन करावे

विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करावी

कृष्णा उपनद्या पूर अभ्यासगट नेमावा

अलमट्टी पाणीपातळी ५०९ मीटरपर्यंत स्थिर ठेवावी