शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धनाची पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:47 IST

स्त्री भ्रूणहत्येवर बंदी असून, त्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही आहे. तरीही लोकांची मानसिकता हेरून बेकायदेशीररीत्या स्त्री भ्रूणहत्या करणारे काही डॉक्टर आहेत.

जागतिक बालिका दिन बुधवारी सर्वत्र साजरा झाला. यानिमित्ताने ‘बेटी बचाओ’चे जनजागरण करण्यात आले. आपल्याकडे मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगी म्हणजे दुसºयाचे धन असा एक पूर्वापार चालत आलेला समज आहे. काळानुसार त्यात बदल होत आहे. लोकांची मानसिकता बदलत आहे; परंतु आजही स्त्री-पुरुष प्रमाण पाहिल्यास दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या केरळ आणि पुद्दुचेरी वगळता देशातील एकाही राज्यात जादा नाही. केरळमध्ये १०८४, तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०३७ आहे. हेच प्रमाण लहान मुलांच्या बाबतीत पाहिल्यास देशात असे एकही राज्य नाही की जिथे दरहजारी मुलांमागे मुलींची संख्या हजारपेक्षा जादा आहे. म्हणजे हजाराला हजार असे समान तर आहे का, तर तेही नाही. कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रमाण ९४९ स्त्रिया असे आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ते ९६२, तर नागरी भागात ९१८ इतके आहे. २०११च्या जनगणनेतून निघालेले हे निष्कर्ष आहेत. ही खरोखरच चिंतेची बाब आहे. त्यामुळेच सरकार हडबडून जागे झाले आहे. स्त्री भ्रूणहत्येवर बंदी असून, त्यासाठी कडक शिक्षेची तरतूदही आहे. तरीही लोकांची मानसिकता हेरून बेकायदेशीररीत्या स्त्री भ्रूणहत्या करणारे काही डॉक्टर आहेत.

स्त्री भ्रूणहत्या उघडकीस आली किंवा त्यांच्याबाबत कुणी माहिती दिली की त्यांच्यावरही छापे टाकले जातात, कारवाई केली जाते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत गेल्यावर्षी पडलेले छापे आणि झालेली कारवाई ही त्यांची काही उदाहरणे आहेत. पैशाच्या मोहापायी व्यवसायातील नीतिमत्तेशी द्रोह करणारे हे डॉक्टरच असले प्रकार बंद करणार नाहीत तोपर्यंत या भ्रूणहत्या कुणीही रोखू शकणार नाही असेच नाइलाजाने म्हणावेसे वाटते. याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करीत आहेत

सरकार वेगवेगळ्या योजना राबवून मुलींची संख्या वाढावी यासाठी प्रोत्साहन देत आहे. स्वयंसेवी संस्था प्र्रबोधनपर कार्यक्रम राबवून जनजागृतीचे प्रयत्न करीत असतात. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते आहे. महाराष्टÑात बारावीपर्यंत मुलींचे शिक्षण मोफत आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा कायद्याने दिला असला तरी समाजाने तो अद्याप पूर्णपणे मान्य केला नाही, असेच म्हणावे लागेल. कारण अजूनही आमच्या महिलांनी नोकरी, घराबाहेरपडलेले चालणार नाही असे सांगणारे अनेकजण भेटतात. स्वत:ला ते कुलीन, उच्च समजतात; पण अलीकडे शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढत आहे तसा यात थोडाफार बदल होत आहे. शहरी भागात विशेषत: मुंबई, पुणे यासारख्या शहरांत नवरा-बायको दोघांनीही नोकरी, व्यवसाय केला तरच त्यांना संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीने चालविता येतो. ग्रामीण भागातही हा बदल हळूहळू का होईना होत आहे.

परवा सीमाभागातील एका खेडेगावात नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांच्या घरी आठवीत शिकणारी एक मुलगी होती. गावची लोकसंख्या असेल सुमारे चार हजार. गावात एक हायस्कूल, एक कन्नड आणि एक मराठी प्राथमिक शाळा आहे. त्या मुलीला सहज विचारले, तुमच्या वर्गात मुलं किती. तिने झटक्यात सांगितले ३८, त्यात मुली २२ आणि मुले १४. याचाच अर्थ या गावातील आठवीच्या वर्गात मुलांपेक्षा मुलींची संख्या जादा आहे. एकेकाळी मुलींना शिक्षण कशाला द्यायचे, चूल आणि मूल एवढेच तिचे जग असे म्हणणारा आपला समाज किती बदलत आहे, याचेच हे द्योतक आहे. एका बाजूला हा चांगला बदल असला तरी शिक्षणाबरोबरच तिला समान हक्क देण्याच्या बाबतीत मात्र अजून खूप काही व्हायला हवे. चीन या देशात मुलगा असो की मुलगी एकच बस्स! असे, तर भारतात ‘हम दो, हमारे दो’ असे धोरण आहे. एक मुलगा, एक मुलगी असावी, अशी अनेक दाम्पत्यांची इच्छा असते. एका मुलीनंतर यासाठीच मुलगा होईपर्यंत स्त्री भ्रूणहत्या केल्या जातात. डॉक्टरने नाही म्हटले तर गावठी उपायही शोधले जातात. हे बंद व्हायला हवे. त्यासाठी मुलगा असो मुलगी यात भेदभाव केला जाऊ नये. मात्र, हे व्हायला खूप काळ जावा लागेल. असे असले तरी दोन मुलींवरच थांबणारे अनेकजण आहेत. मुलगी ही धनाची पेटी समजून एका मुलीवरच आता बस्स! म्हणणारे भेटतात. त्यांना सलाम करायलाच हवा.- चंद्रकांत कित्तुरे