शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ओढे-नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ओढे-नाले व त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ओढे-नाले व त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आले. पर्यावरण अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पूरनियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासंबंधीचे निवेदन बुधवारी (दि. २८) पाठविले होते. त्या कार्यालयाकडून महापालिकेस आलेल्या सूचनांनुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. महापुराचा अभ्यास केलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेही ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे. परवाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत, अशा अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने यंत्रणा हलली आहे.

दोन वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्यावर शासनाने सगळ्याच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने प्रमुख नऊ पुलांचे ऑडिट करून घेतले. परंतु ते सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आले. त्या पुलांची पाणी वाहून जाण्याची क्षमता किती आहे, याचा विचार त्यावेळी झाला नव्हता. आता ओढे-नाले व पूल यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता या एकाच हेतूने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील २०१९ ची पूररेषा आणि २०२१ चा पाऊस आधार धरून हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितले.

धैर्यप्रसाद हॉलपासून सुरू होऊन विन्स हॉस्पिटलपर्यंत जाणाऱ्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र किती आहे, त्यामध्ये किती पाऊस पडतो, त्याचे किती पाणी तयार होईल, त्यातील किती पाणलोट बुजले आहेत, आता किती आकारापर्यंत ओढ्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे, असा ढोबळमानाने प्रत्येक ओढ्याचा अभ्यास अपेक्षित आहे. अनेक नाले विनाकारणच थेट काटकोनात वळविण्यात आले आहेत. टाकाळ्यावरून राजारामपुरीत येणारा नाला किमान पाच ठिकाणी काटकोनात वळवण्यात आला आहे. तो सरळ करता येणे शक्य आहे का, याचीही शक्यता तपासून पाहिली जाणार आहे.

अतिक्रमणे काढणार...

ओढे सुरू होताना त्यांची रुंदी जास्त आहे. मध्येच त्यामध्ये अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण किती व कुठेपर्यंत झाले आहे, ते काढण्यासाठी काय करावे लागेल. समजा, ओढा सुरू होताना त्याची रुंदी पाच फूट होती, तर तेवढीच रुंदी शेवटपर्यंत करता येऊ शकेल का, असाही अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे.

-----

काय करणार...

सर्वेक्षण करून हे सर्व नाले अगोदर कोल्हापूर महापालिकेच्या नकाशावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नाले सुरू होतात कुठून, ते कुठे संपतात, त्यांचे पाणलोटक्षेत्र यांची माहिती मिळेल.

पाहणी पथक

नगररचना विभाग, पाणीपुरवठा व सांडपाणी विभाग, नगर अभियंता आणि पर्यावरण अभ्यासक.

----

कोल्हापुरात प्रमुख नऊ नाले आहेत; परंतु त्याशिवायही इतरही छोटे-मोठे नाले आहेत.

जयंती, दुधाळी, फुलेवाडी, शाम सोसायटी, निकम पार्कशेजारील, जरगनगर, रामानंदनगर, गोमती नाल्याचे चार उपनाले, विद्यापीठातून वाहणारे, आरटीओ कार्यालय-विवेकानंद कॉलेजच्या मागील बाजूने वाहणारा ओढा, आयुक्त निवास ते बसंत-बहारपर्यंतचा, अशोक जाधव यांच्या घरापासून, मुक्त सैनिक वसाहतीतील चार नाले.

----

कोल्हापुरातील प्रमुख पूल

शाहूकालीन जयंती नाल्यावरील व विल्सन पूल. सिद्धिविनायक मंदिराजवळील दत्ताजीराव शेळके, दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर, संभाजी पूल, सावित्रीबाई फुले रुग्णालयाची मागील बाजूस, गोखले कॉलेज ते बाईचा पुतळ्यापर्यंत दोन पूल, यल्लमा ओढ्यावरील, हॉकी स्टेडियमजवळील, जरगनगर, हनुमाननगर, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या ओढ्यावरील, शास्त्रीनगरातील भैया घोरपडे यांच्या घराजवळील, ॲस्टर आधार रुग्णालयाच्या उजव्या व डाव्या बाजूकडील, प्रतिभानगरातील, सायबर ते राजेंद्रनगर दरम्यानचे तीन पूल.

तत्कालीन हेतू कालबाह्य

जेव्हा हे पूल बांधण्यात आले, तेव्हा त्या-त्या परिसराला वाहतुकीने जोडणारे म्हणूनच त्यांचा विचार झाला. त्या पुलांची पाणी वाहून नेण्याची क्षमता किती याचा विचार त्यावेळी व त्यानंतरही महापालिकेने कधी केलेला नाही. आता प्रथमच वाहतुकीशिवाय प्रत्येक पुलाखालून नक्की पाणी किती वाहून जाते, त्यातील अडथळे कोणते, ते काढण्यासाठी काय करावे लागणार व त्यासाठी नक्की खर्च किती येणार, याचे आराखडे केले जाणार आहेत.

२९०७२०२१-कोल-यल्लमा ओढा पूल

कोल्हापूर शहरातील यल्लमा ओढ्यावरील या पुलास किमान १० दरवाजे आहेत; परंतु पाणी मात्र कसेबसे चारच दरवाजांतून वाहते. अशीच स्थिती शहरातील बहुतांशी पुलांची झाल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडखळतो व तुंबलेले पाणी लोकांच्या घरादारांत घुसते. (नसीर अत्तार)