शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

बदलती रचना गटबाजीच्या पथ्यावर

By admin | Updated: September 18, 2014 00:18 IST

मतविभागणीचा फायदा : पै-पाहुण्यांच्या राजकारणाला खो

राजाराम कांबळे - मलकापूर -स्वातंत्र्यापूर्वी शाहूवाडी तालुका कोल्हापूर व विशाळगड संस्थानांत विभागला होता. येथील ६८ गावांचा कारभार विशाळगड जहागिरीतून चालत होता. १९५० पासून शाहूवाडी तालुक्यात १३१ गावांचा समावेश झाला. १९५२ साली शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना पन्हाळा-शाहूवाडी अशी झाली. पुनर्रचनेत शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा समावेश होता; तर पन्हाळा तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा मिळून शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ आकारास आला. जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी अधिराज्य गाजविले. पक्षापेक्षा गटांच्या नेत्यांच्या शब्द प्रमाण मानणारा, गटातटाचे राजकारण केंद्रित असणारा शाहूवाडी तालुक्याचा इतिहास. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी गटांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला.१९५२ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार म्हणून भाई रंगराव पाटील-वडगावकर यांनी प्रतिनिधित्व केले; पाठोपाठ १९५७ ला त्र्यंबक कारखानीस हे निवडून आले. त्यामुळे शाहूवाडी तालुका शेकापचा बालेकिल्ला बनला. बालेकिल्ल्यास १९६२ मध्ये कॉँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड यांनी सुरुंग लावला. त्यांनी पाच वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. मतदारसंघातील बांबवडे, मलकापूर, आंबा, करंजफेण या मोठ्या गावांत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, तसेच पै-पाहुण्यांची मांदियाळी असल्याचा तसा फायदा गायकवाड यांनाच झाला. यावरच गायकवाड यांनी या मतदारसंघावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापने आंदोलने करत माजी आमदार राऊ पाटील-पेरीडकर यांनी गायकवाड यांचा पराभव केला. मात्र, खऱ्या अर्थाने तालुक्याचा भूगोल बदलला तो १९७२ नंतरच. उदयसिंहराव गायकवाड पुन्हा आमदार झाले. याचवेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या गटाचा उदय झाला. पाच वर्षांनी उदयसिंहराव गायकवाड खासदार झाल्याने पुढे धुरा सांभाळत बाबासाहेब पाटील आमदार झाले. येथूनच माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांनी आपल्या काकांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला. बंडखोरी करून संजयसिंह गायकवाड यांनी शाहूवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनाही पै-पाहुण्यांच्या मांदियाळीचा, तसेच उदयसिंहराव गायकवाड यांचा अंतर्गत हातमिळवणीचा फायदाच झाला. येथूनच सरूडकर गट, गायकवाड गट असे समीकरण तयार झाले. संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड आमदार झाल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. २००४ मध्ये आमदार सत्यजित पाटील यांनी निवडून येऊन त्यांनी शिवसेनेचा झेंडा उभारला. त्यावेळी मानसिंगराव गायकवाड व करणसिंह गायकवाड अशी दोन गटांत फूट पडली. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ २००९ मध्ये निर्माण झाला. या नव्या आकाराला आलेल्या मतदारसंघावर तसे विनय कोरे यांनीच प्राबल्य दाखविले. नव्या मतदारसंघात पन्हाळा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद, ८ पंचायत समित्यांचा समावेश झाला. त्यामुळे या पन्हाळा तालुक्यातील मोठ-मोठ्या गावांमुळे शाहूवाडी तालुक्यातील जुन्या मतदारसंघातील दुर्गम, लहान वाड्या-वस्त्या खुज्या ठरल्या. त्यातच दोन्ही तालुके जोडल्यानंतर पूर्ण पन्हाळा तालुक्यातून एकटे विनय कोरे अन् शाहूवाडी तालुक्यातून मानसिंग आणि करणसिंह गायकवाडसह सत्यजित पाटील, आदी उमेदवारांमुळे मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा कोरे यांनीच उठवून या नव्या आकारास आलेल्या मतदारसंघावर आजअखेर प्राबल्य ठेवण्यात यश मिळविले.