शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

बदलती रचना गटबाजीच्या पथ्यावर

By admin | Updated: September 18, 2014 00:18 IST

मतविभागणीचा फायदा : पै-पाहुण्यांच्या राजकारणाला खो

राजाराम कांबळे - मलकापूर -स्वातंत्र्यापूर्वी शाहूवाडी तालुका कोल्हापूर व विशाळगड संस्थानांत विभागला होता. येथील ६८ गावांचा कारभार विशाळगड जहागिरीतून चालत होता. १९५० पासून शाहूवाडी तालुक्यात १३१ गावांचा समावेश झाला. १९५२ साली शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना पन्हाळा-शाहूवाडी अशी झाली. पुनर्रचनेत शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा समावेश होता; तर पन्हाळा तालुक्यातील चार जिल्हा परिषदा व आठ पंचायत समिती मतदारसंघांचा मिळून शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ आकारास आला. जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी अधिराज्य गाजविले. पक्षापेक्षा गटांच्या नेत्यांच्या शब्द प्रमाण मानणारा, गटातटाचे राजकारण केंद्रित असणारा शाहूवाडी तालुक्याचा इतिहास. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी गटांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला.१९५२ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पहिले आमदार म्हणून भाई रंगराव पाटील-वडगावकर यांनी प्रतिनिधित्व केले; पाठोपाठ १९५७ ला त्र्यंबक कारखानीस हे निवडून आले. त्यामुळे शाहूवाडी तालुका शेकापचा बालेकिल्ला बनला. बालेकिल्ल्यास १९६२ मध्ये कॉँग्रेसचे उदयसिंहराव गायकवाड यांनी सुरुंग लावला. त्यांनी पाच वर्षे तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. मतदारसंघातील बांबवडे, मलकापूर, आंबा, करंजफेण या मोठ्या गावांत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, तसेच पै-पाहुण्यांची मांदियाळी असल्याचा तसा फायदा गायकवाड यांनाच झाला. यावरच गायकवाड यांनी या मतदारसंघावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापने आंदोलने करत माजी आमदार राऊ पाटील-पेरीडकर यांनी गायकवाड यांचा पराभव केला. मात्र, खऱ्या अर्थाने तालुक्याचा भूगोल बदलला तो १९७२ नंतरच. उदयसिंहराव गायकवाड पुन्हा आमदार झाले. याचवेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या गटाचा उदय झाला. पाच वर्षांनी उदयसिंहराव गायकवाड खासदार झाल्याने पुढे धुरा सांभाळत बाबासाहेब पाटील आमदार झाले. येथूनच माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांनी आपल्या काकांचा हात धरून राजकारणात प्रवेश केला. बंडखोरी करून संजयसिंह गायकवाड यांनी शाहूवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांनाही पै-पाहुण्यांच्या मांदियाळीचा, तसेच उदयसिंहराव गायकवाड यांचा अंतर्गत हातमिळवणीचा फायदाच झाला. येथूनच सरूडकर गट, गायकवाड गट असे समीकरण तयार झाले. संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड आमदार झाल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. २००४ मध्ये आमदार सत्यजित पाटील यांनी निवडून येऊन त्यांनी शिवसेनेचा झेंडा उभारला. त्यावेळी मानसिंगराव गायकवाड व करणसिंह गायकवाड अशी दोन गटांत फूट पडली. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ २००९ मध्ये निर्माण झाला. या नव्या आकाराला आलेल्या मतदारसंघावर तसे विनय कोरे यांनीच प्राबल्य दाखविले. नव्या मतदारसंघात पन्हाळा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद, ८ पंचायत समित्यांचा समावेश झाला. त्यामुळे या पन्हाळा तालुक्यातील मोठ-मोठ्या गावांमुळे शाहूवाडी तालुक्यातील जुन्या मतदारसंघातील दुर्गम, लहान वाड्या-वस्त्या खुज्या ठरल्या. त्यातच दोन्ही तालुके जोडल्यानंतर पूर्ण पन्हाळा तालुक्यातून एकटे विनय कोरे अन् शाहूवाडी तालुक्यातून मानसिंग आणि करणसिंह गायकवाडसह सत्यजित पाटील, आदी उमेदवारांमुळे मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा कोरे यांनीच उठवून या नव्या आकारास आलेल्या मतदारसंघावर आजअखेर प्राबल्य ठेवण्यात यश मिळविले.