शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांचे पालकत्व सांगलीकरांसाठी दुर्मीळ

By admin | Updated: April 13, 2015 00:08 IST

कामे रखडली : पक्षीय कार्यक्रमांनाच उपस्थिती

सांगली : प्रशासकीय स्तरावर अडणारी गोरगरिबांची कामे, योजनांची अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष संबंध पालकमंत्र्यांशी येतो. समित्या गठित करणे, वारंवार योजनांचा आढावा घेणे या गोष्टींची जबाबदारी पालकमंत्र्यांची असूनही, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांचे दर्शन दुर्मीळ झाल्याने, गेल्या सहा महिन्यात केवळ दोनच प्रशासकीय बैठका झाल्या आहेत. प्रशासकीय कामांपेक्षा पक्षीय कार्यक्रमांनाच त्यांची उपस्थिती लागत असल्याने विविध समित्या स्थापन होऊ शकल्या नाहीत. नियोजनची बैठक, टंचाई आढावा याबाबत कोणतीही कार्यवाही होऊ शकलेली नाही. सोमवारी १३ एप्रिल रोजी त्यांचा जिल्हा दौरा असला तरी, पक्षीय व अन्य कार्यक्रमांनाच त्यांची उपस्थिती लागणार आहे. आघाडी सरकारच्या कालावधित पतंगराव कदम यांच्या दहा दिवसांतून एकदा आढावा बैठका होत होत्या. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर कधीही कोणत्याही कामाचा खोळंबा पालकमंत्र्यांअभावी होत नव्हता. सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा दौरे कमी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आजवर दोनवेळाच त्यांनी बैठका घेतल्या. त्यानंतर पुन्हा त्यांचे दर्शन जिल्हाधिकारी कार्यालयास झाले नाही. संजय गांधी निराधार योजनेची समिती अद्याप स्थापन होऊ शकलेली नाही. पालकमंत्रीच ही समिती स्थापन करीत असतात. तेच न आल्यामुळे समिती गठित होऊ शकली नाही. निराधारांसाठी आधार ठरलेल्या श्रावणबाळ, संजय गांधी या योजनांसाठी अशासकीय समिती गठित न झाल्याने हजारो लाभार्थी पेन्शनपासून वंचित राहिले आहेत. गेल्या पाच महिन्यांत समिती नसल्याने बैठक झाली नाही. त्यामुळे नवे निराधारांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. निराधार वृध्द, विधवा, अपंगांच्या निर्वाह वेतनाची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत.गेल्या पाच महिन्यांपासून यासाठी अशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे याचे काम रखडले आहे. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात. तेच इतर सदस्य नियुक्त करतात. पालकमंत्रीच न आल्यामुळे समितीच गठित झाली नाही. यामुळे निराधारांना मार्गदर्शन मिळणे बंद होण्याबरोबरच योग्य लाभार्थी शोधणेही बंद झाले आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या भागातील लाभार्थी शोधून त्यांना पेन्शनचा लाभ मिळवून देत होते. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या कागदत्रांसाठीही कार्यकर्त्यांची मदत लाभार्थींना होत होती. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून हे कामच थांबले आहे. (प्रतिनिधी)सहा महिन्यात केवळ दोन बैठकासहा महिन्यात केवळ दोनवेळाच चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची एकच बैठक पार पडली. त्यानंतर एक आढावा बैठक त्यांनी घेतली. पालकमंत्र्यांअभावी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या याद्यांचेही काम रखडले आहे. शासकीय रुग्णालयांचा औषध पुरवठा नाही. हे सर्व प्रश्न पालकमंत्र्यांमुळे मार्गी लागू शकतात. पालकमंत्री म्हणून किमान पंधरा दिवसांतून एकदा तरी त्यांचा जिल्हा दौरा अपेक्षित असताना, अनेक महिने त्यांची प्रतीक्षा करावी लागते.