शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली अभयारण्यग्रस्तांचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन ...

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन वाटपासाठी उपलब्ध झाली नाही तर लढ्याचा दुसरा टप्पा नव्या तीव्रतेने व दिशेने सुरू केला जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिला.

दलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. गायरान जमीन वर्ग करण्याचे काम गेली तीन साडेतीन वर्षे भिजत पडले आहे. केंद्र व राज्य शासनाला एवढेच पर्यावरण प्रेम होते, तर आधीच जमीन उपलब्ध करून मग मूळ ठिकाणाहून अभयारण्यग्रस्तांना का हलवले नाही, २० वर्षांहून अधिक काळ लढूनही त्यांच्यावर ही वेळ आणणे हा क्रूरपणा आहे. निर्वाणीकरणाच्या प्रस्तावित जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. ती हटवली जात नाहीत. दुसरीकडे अभयारण्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायातून पैसा मिळवला जात आहे. हा प्रकार म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, पण आता अभयारण्यग्रस्त मढी होणार नाहीत ते स्वत:चा अधिकार बजावतील. आजवर वनविभागाने अभयारण्यग्रस्त व धरणग्रस्तांची झाडाझडती केली आहे आता हे दोघे मिळून जबाबदार यंत्रणेची झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे यात म्हटले आहे.

--