शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली अभयारण्यग्रस्तांचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन ...

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन वाटपासाठी उपलब्ध झाली नाही तर लढ्याचा दुसरा टप्पा नव्या तीव्रतेने व दिशेने सुरू केला जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिला.

दलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. गायरान जमीन वर्ग करण्याचे काम गेली तीन साडेतीन वर्षे भिजत पडले आहे. केंद्र व राज्य शासनाला एवढेच पर्यावरण प्रेम होते, तर आधीच जमीन उपलब्ध करून मग मूळ ठिकाणाहून अभयारण्यग्रस्तांना का हलवले नाही, २० वर्षांहून अधिक काळ लढूनही त्यांच्यावर ही वेळ आणणे हा क्रूरपणा आहे. निर्वाणीकरणाच्या प्रस्तावित जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. ती हटवली जात नाहीत. दुसरीकडे अभयारण्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायातून पैसा मिळवला जात आहे. हा प्रकार म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, पण आता अभयारण्यग्रस्त मढी होणार नाहीत ते स्वत:चा अधिकार बजावतील. आजवर वनविभागाने अभयारण्यग्रस्त व धरणग्रस्तांची झाडाझडती केली आहे आता हे दोघे मिळून जबाबदार यंत्रणेची झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे यात म्हटले आहे.

--