शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

चंदगड : ४१ ग्रामपंचायतींसाठी १६९ व्यक्तींचे १७१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

चंदगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतींपैकी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १५३ व्यक्तींनी १५४ अर्ज, तर आजअखेर एकूण १६९ व्यक्तींनी ...

चंदगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतींपैकी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १५३ व्यक्तींनी १५४ अर्ज, तर आजअखेर एकूण १६९ व्यक्तींनी १७१ अर्ज दाखल केल्याची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.

अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायती : दाटे ९, तुडये १२ व्यक्ती १३ अर्ज, हलकर्णी ५, कालकुंद्री १, कोवाड १३, बसर्गे १४, दिंडलकोप ३, राजगोळी बुद्रुक १, करेकुंडी ५, बुक्कीहाळ ४, कळसगादे ९, पाटणे ४, इब्राहिमपूर १, हाजगोळी २०, नागवे ५, होसूर ३, शिनोळी खुर्द २३, बागिलगे ७, नांदवडे ६, आसगाव १, देवरवाडी ७ अशा २१ ग्रामपंचायतींच्या १५३ उमेदवारांनी आज दिवसभरात १५४ अर्ज दाखल केले आहेत.

२० ग्रामपंचायतींच्या उमेदवारांनी अद्याप एकही अर्ज दाखल केलेला नाही. धुमडेवाडी, मलतवाडी, तावरेवाडी, ढोलगरवाडी, म्हाळेवाडी, किटवाड, कानडी या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.