शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

दानोळीत तिरंगी लढतीची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

भालचंद्र नांद्रेकर दानोळी: येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वाटत असली तरी जिंकून येण्याची कुवत असूनही उमेदवारी मिळाली नाही ...

भालचंद्र नांद्रेकर

दानोळी: येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वाटत असली तरी जिंकून येण्याची कुवत असूनही उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार अशा उमेदवारांची वेगळी मोट बांधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १६ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शरद कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे होते. पण जिल्हा परिषद निवडणुकीवेळी त्यांची युती विस्कळीत झाली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिंदे यांची ग्रामविकास आघाडी विरुद्ध माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे गट, रावसाहेब भिलवडे गट, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष रामचंद्र शिंदे गट, जनसेवा ग्रुप, राऊत-दळवी गट, शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे गट सध्यातरी एकत्र असून यांची नागरिक संघटनेच्या माध्यमातून मुख्य लढत होणार आहे. पण नागरिक संघटनेत अनेक गटनेते एकत्र आल्याने इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढणार यात शंका नाही.

सतरा जागांसाठी सहा प्रभाग असून मतदार संख्याही मोठी आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून तरुण वर्ग सक्रिय झाला असून वाड्या, वस्त्या, वाॅर्डात निवडणुकीबाबत बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तरुणांचे श्रेयही मोठे ठरणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ईर्षा आणि प्रतिष्ठेची लढत

गावामध्ये काँग्रेस, स्वाभिमानी आणि शिवसेना या तीन पक्षांचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकहाती सत्ता मिळविण्यासाठी ही लढत काट्याची होणार हे मात्र निश्चित.

सक्षम उमेदवार निवडावा लागणार

निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होऊ नये, यासाठी प्रत्येक प्रभागातील उमेदवार हा सक्षम निवडावा लागणार असून मोठी ताकदही लावावी लागणार आहे.