शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

दानोळीत तिरंगी लढतीची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST

भालचंद्र नांद्रेकर दानोळी: येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वाटत असली तरी जिंकून येण्याची कुवत असूनही उमेदवारी मिळाली नाही ...

भालचंद्र नांद्रेकर

दानोळी: येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता वाटत असली तरी जिंकून येण्याची कुवत असूनही उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार अशा उमेदवारांची वेगळी मोट बांधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १६ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शरद कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे होते. पण जिल्हा परिषद निवडणुकीवेळी त्यांची युती विस्कळीत झाली.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिंदे यांची ग्रामविकास आघाडी विरुद्ध माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे गट, रावसाहेब भिलवडे गट, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष रामचंद्र शिंदे गट, जनसेवा ग्रुप, राऊत-दळवी गट, शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे गट सध्यातरी एकत्र असून यांची नागरिक संघटनेच्या माध्यमातून मुख्य लढत होणार आहे. पण नागरिक संघटनेत अनेक गटनेते एकत्र आल्याने इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढणार यात शंका नाही.

सतरा जागांसाठी सहा प्रभाग असून मतदार संख्याही मोठी आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून तरुण वर्ग सक्रिय झाला असून वाड्या, वस्त्या, वाॅर्डात निवडणुकीबाबत बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तरुणांचे श्रेयही मोठे ठरणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ईर्षा आणि प्रतिष्ठेची लढत

गावामध्ये काँग्रेस, स्वाभिमानी आणि शिवसेना या तीन पक्षांचे तालुका अध्यक्ष आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीबरोबर प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकहाती सत्ता मिळविण्यासाठी ही लढत काट्याची होणार हे मात्र निश्चित.

सक्षम उमेदवार निवडावा लागणार

निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होऊ नये, यासाठी प्रत्येक प्रभागातील उमेदवार हा सक्षम निवडावा लागणार असून मोठी ताकदही लावावी लागणार आहे.