शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: December 31, 2015 00:21 IST

जुजबी कारवाई : वाळू वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत

संदीप बावचे == शिरोळ -महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बॅक वॉटरबरोबर सीमाभागातील गावात दळणवळणासाठी सोयिस्कर ठरावा यासाठी बंधारा उभारण्यात आला. अवजड वाहतुकीला बंदी असतानाही राजरोसपणे ही वाहतूक सुरू असते. सामाजिक संघटनांनी आंदोलने करूनही केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच बंधाऱ्याला अवकळा आली आहे. स्व. आ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या उद्देशाने राजापूर बंधाऱ्याची उभारणी झाली त्याची पायमल्लीच मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या परिसरातील गावांना फायदेशीर ठरला. बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीबरोबर माती, दगड, विटा याचीही वाहतूक होत असल्यामुळे बंधारा कमकुवत होण्यात भर पडली आहे. बंधाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कमानीही वाळू तस्करी करणाऱ्यांनी उखडून टाकल्या असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येते. दोन राज्यांतील सीमाभागाचा फायदा घेत, दरवर्षी वाळू तस्कर बंधाऱ्यानजीकच यांत्रिकी बोटी टाकून बेसुमार वाळू उपसा करतात. सीमेचा प्रश्न दाखवीत शिरोळ महसूल विभागाकडून जुजबी कारवाई केली जाते. ठोस कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा असला तरी सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित तो असल्यामुळे हा बंधारा ‘ना घरका, ना घाटका’ बनला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळेच वाळू उपसा असो अथवा अवजड वाहतूक याला कोणतेच बंधन राहिले नाही. रखवालदार नसल्यामुळे ‘आओ-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था बंधाऱ्याची आहे. या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ३५ वर्षे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती वेळोवेळी झाली असती तर बंधाऱ्याची ही अवस्था झाली नसती, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. पाटबंधारे विभागाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. (समाप्त)खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्षशेतकरी चळवळीतून खासदार व आमदार पदावर पोहोचलेले खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील बंधाऱ्याच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील. राजापूर बंधाऱ्याचे महत्त्व दोघांनाही माहीत असल्यामुळे निश्चित पाठपुरावा करून बंधाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.दूरदृष्टीतून निर्मितीपाऊस कमी, आणि महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची तहान भागविण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळावा या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून बंधारा बांधण्यात आला. गेली ३५ वर्षे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे २२ हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळत आहे. यामुळे वेळीच लक्ष घालून बंधारा वाचविण्याची गरज आहे.