शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: December 31, 2015 00:21 IST

जुजबी कारवाई : वाळू वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत

संदीप बावचे == शिरोळ -महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बॅक वॉटरबरोबर सीमाभागातील गावात दळणवळणासाठी सोयिस्कर ठरावा यासाठी बंधारा उभारण्यात आला. अवजड वाहतुकीला बंदी असतानाही राजरोसपणे ही वाहतूक सुरू असते. सामाजिक संघटनांनी आंदोलने करूनही केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच बंधाऱ्याला अवकळा आली आहे. स्व. आ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या उद्देशाने राजापूर बंधाऱ्याची उभारणी झाली त्याची पायमल्लीच मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या परिसरातील गावांना फायदेशीर ठरला. बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीबरोबर माती, दगड, विटा याचीही वाहतूक होत असल्यामुळे बंधारा कमकुवत होण्यात भर पडली आहे. बंधाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कमानीही वाळू तस्करी करणाऱ्यांनी उखडून टाकल्या असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येते. दोन राज्यांतील सीमाभागाचा फायदा घेत, दरवर्षी वाळू तस्कर बंधाऱ्यानजीकच यांत्रिकी बोटी टाकून बेसुमार वाळू उपसा करतात. सीमेचा प्रश्न दाखवीत शिरोळ महसूल विभागाकडून जुजबी कारवाई केली जाते. ठोस कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा असला तरी सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित तो असल्यामुळे हा बंधारा ‘ना घरका, ना घाटका’ बनला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळेच वाळू उपसा असो अथवा अवजड वाहतूक याला कोणतेच बंधन राहिले नाही. रखवालदार नसल्यामुळे ‘आओ-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था बंधाऱ्याची आहे. या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ३५ वर्षे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती वेळोवेळी झाली असती तर बंधाऱ्याची ही अवस्था झाली नसती, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. पाटबंधारे विभागाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. (समाप्त)खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्षशेतकरी चळवळीतून खासदार व आमदार पदावर पोहोचलेले खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील बंधाऱ्याच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील. राजापूर बंधाऱ्याचे महत्त्व दोघांनाही माहीत असल्यामुळे निश्चित पाठपुरावा करून बंधाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.दूरदृष्टीतून निर्मितीपाऊस कमी, आणि महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची तहान भागविण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळावा या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून बंधारा बांधण्यात आला. गेली ३५ वर्षे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे २२ हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळत आहे. यामुळे वेळीच लक्ष घालून बंधारा वाचविण्याची गरज आहे.