शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान

By admin | Updated: December 31, 2015 00:21 IST

जुजबी कारवाई : वाळू वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत

संदीप बावचे == शिरोळ -महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बॅक वॉटरबरोबर सीमाभागातील गावात दळणवळणासाठी सोयिस्कर ठरावा यासाठी बंधारा उभारण्यात आला. अवजड वाहतुकीला बंदी असतानाही राजरोसपणे ही वाहतूक सुरू असते. सामाजिक संघटनांनी आंदोलने करूनही केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच बंधाऱ्याला अवकळा आली आहे. स्व. आ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या उद्देशाने राजापूर बंधाऱ्याची उभारणी झाली त्याची पायमल्लीच मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या परिसरातील गावांना फायदेशीर ठरला. बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीबरोबर माती, दगड, विटा याचीही वाहतूक होत असल्यामुळे बंधारा कमकुवत होण्यात भर पडली आहे. बंधाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कमानीही वाळू तस्करी करणाऱ्यांनी उखडून टाकल्या असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येते. दोन राज्यांतील सीमाभागाचा फायदा घेत, दरवर्षी वाळू तस्कर बंधाऱ्यानजीकच यांत्रिकी बोटी टाकून बेसुमार वाळू उपसा करतात. सीमेचा प्रश्न दाखवीत शिरोळ महसूल विभागाकडून जुजबी कारवाई केली जाते. ठोस कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा असला तरी सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित तो असल्यामुळे हा बंधारा ‘ना घरका, ना घाटका’ बनला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळेच वाळू उपसा असो अथवा अवजड वाहतूक याला कोणतेच बंधन राहिले नाही. रखवालदार नसल्यामुळे ‘आओ-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था बंधाऱ्याची आहे. या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ३५ वर्षे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती वेळोवेळी झाली असती तर बंधाऱ्याची ही अवस्था झाली नसती, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. पाटबंधारे विभागाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. (समाप्त)खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्षशेतकरी चळवळीतून खासदार व आमदार पदावर पोहोचलेले खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील बंधाऱ्याच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील. राजापूर बंधाऱ्याचे महत्त्व दोघांनाही माहीत असल्यामुळे निश्चित पाठपुरावा करून बंधाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.दूरदृष्टीतून निर्मितीपाऊस कमी, आणि महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची तहान भागविण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळावा या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून बंधारा बांधण्यात आला. गेली ३५ वर्षे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे २२ हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळत आहे. यामुळे वेळीच लक्ष घालून बंधारा वाचविण्याची गरज आहे.