शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे आव्हान-- कोल्हापूरचा अजेंडा

By admin | Updated: September 30, 2015 01:15 IST

नव्या पर्यायांची आवश्यकता---वसुलीत हवी पारदर्शकता---उत्पन्न घटल्याने अडचणी

भारत चव्हाण - कोल्हापूर --महानगरपालिकेची स्थापना १५ मे १९७२ रोजी झाली. नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत होऊन तब्बल ४३ वर्षे झाली. एखादी संस्था जशी वयाने मोठी होते, तशी ती आर्थिकदृष्ट्याही सक्षम होत जाते, हा अनेक संस्थांच्या बाबतीतील अनुभव आहे. ४३ वर्षांत कोल्हापूर शहराचा बराच कायापालट झाला, ही वस्तुस्थिती असली तरी महापालिका प्रशासन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले का, असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याला दुर्दैवाने ‘नाही’ असेच उत्तर मिळते. अनेक कारणांनी महापालिकेचे उत्पन्न वाढले नाही, वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला नाही, हे वास्तव आहे. अधिकारी पातळीवरील उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. प्रदीर्घ परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर महापालिकेत रुपांतर होताना शहराची हद्दवाढ होणे अपेक्षित होते. महापालिकेत रूपांतर करण्याचा ठराव झाला, त्या सभागृहात नगरसेवकांनी हद्दवाढीची एकमुखी मागणी केली; पण ती पूर्ण झाली नाही. पुढच्या काळात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. प्रत्येक सभागृहात ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठविला. त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आजवर अनेक ठराव झाले, मात्र हद्दवाढ करून देण्याबाबत काही झाले नाही. परिणामी विकासावर, कामकाजावर आणि उत्पन्नावर त्याचे विपरीत परिणाम झाले आहेत. या दुष्परिणामांचा प्रशासनाला आजही सामना करावा लागत आहे. हद्दवाढ होणे आवश्यकचकोणत्याही शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सरकारांनी फक्त त्याला कायदेशीर स्वरूप द्यावे लागते. परंतु सरकारच जर नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा दबावाखाली काम करायला लागले तर हद्दवाढ होणे अशक्य आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्यासाठी नवी पंचायत राज्य व्यवस्था स्वीकारायची आणि दुसरीकडे त्यांच्या समस्या, दुखणी काय आहेत हे जाणून न घेता भलतेच निर्णय घ्यायचे, हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. हद्दवाढ झाली असती तर कदाचित मिळकत कर, बांधकाम परवाने, ड्रेनेज फंड, वॉटर बेनिफिट टॅक्स, आदी करांच्या रूपाने उत्पन्न वाढले असते. मिळकत करातून सध्या ४१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. ते कदाचित ६५ ते ७० कोटींच्या घरात गेले असते; परंतु हद्दवाढ झाली नसल्याने त्यावर मर्यादा पडल्या. भाडेकराराची पद्धत बदलणे आवश्यक महापालिकेचे दुकानगाळे हे उत्पन्न मिळवून देणारे महत्त्वाचे साधन आहे; परंतु त्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. भाड्याने देण्याची पद्धत अत्यंत चुकीची वापरल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. मनपाचा कोणताही गाळा, जागा भाड्याने द्यायची म्हटले की त्याचे करार हे ३० वर्षे, ६० वर्षे, ९९ वर्षे कराराने केले जातात. करारावेळी नाममात्र भाडे आकारले आहे. उदा. शिवाजी मार्केटमध्ये १०० स्क्वेअर फुटांचा दुकानगाळा भाड्याने घ्यायचा झाला, तर त्याला चार ते पाच हजार रुपये भाडे द्यावे लागते, परंतु तोच गाळा मनपाचा असेल, तर त्याला भाडे केवळ ५०० रुपये असेल. दीर्घकाळाच्या करारांमुळे हे नुकसान होत आहे. अलीकडे रेडीरेकनर ही पद्धत असली तरी मुदत संपलेले गाळे फारच कमी आहेत.