शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापुरात पोलिसांनीच उधळला चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन ...

कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन उधळून लावले. दाभोळकर कॉर्नर चौकात रस्ता रोखण्यासाठी आलेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलकांना आंदोलन सुरु करण्याआधीच पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने काेंबण्यात आले. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, मागे घ्या, मागे घ्या, काळे कायदे मागे घ्या’ अशा त्वेषपूर्ण घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये जाेरदार झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकारकडून दडपले जात असल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राजधानी दिल्ली वगळता देशभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापुरातही दाभोळकर कॉर्नर चौकात सकाळी ११ ते १ यावेळेत चक्काजामचे आयोजन समन्वय समितीकडून केले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आंदोलक ११ वाजल्यापासून दाभोळकर कॉर्नर चौकात जमले. याठिकाणी तासभर भाषणे झाल्यानंतर चक्काजाम करण्यासाठी मानवी साखळी करण्यास सुरुवात करताच शांत बसलेले पोलीस एकदम आक्रमक झाले.

एकाचवेळी शंभरभर पोलीस रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या कारवाईमुळे आंदोलकांचाही गोंधळ उडाला. उदय नारकर, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे यांना ओढतच गाडीत कोंबण्यात आले. एवढ्यात माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलकांमध्ये पुन्हा जोश संचारला. शेट्टी यांनी चौकातच ठिय्या मारल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आधीच व्हीनस कॉर्नर, कावळा नाका येथून वाहतून अन्य मार्गाने वळवली होती. पोलिसांनी कडे करुन शेट्टी यांनाही उचलून पोलीस व्हॅनमध्ये नेले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. सर्व आंदोलकांना शाहूपुरीत पोलिसांनी नेले. काहीवेळ थांबवून घेत नंतर सुटका करण्यात आली.

या आंदाेलनात दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, गिरीश फोेडे, बी. एल. बरगे, रघुनाथ कांबळे यांच्यासह डाव्या संघटनांचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौकट ०१

कोल्हापूरकरांनो साथ द्या

अन्यायी कायदे दुरुस्त करायला कोल्हापूरकर भाग पाडतात, हे टोल आंदोलनातून दाखवून दिले आहे. आता अन्यायी शेतकरी कायदेही रद्द करण्यासाठी दीर्घपल्ल्यांची लढाई लढण्यास कोल्हापूरकर सज्ज आहेत. सरकारला विचार करायला भाग पाडणारे आंदोलन कोल्हापुरातून उभारु, साथ द्या, असे भावनिक आवाहन चंद्रकांत यादव यांनी केले.