शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कोल्हापुरात पोलिसांनीच उधळला चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन ...

कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन उधळून लावले. दाभोळकर कॉर्नर चौकात रस्ता रोखण्यासाठी आलेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलकांना आंदोलन सुरु करण्याआधीच पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने काेंबण्यात आले. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, मागे घ्या, मागे घ्या, काळे कायदे मागे घ्या’ अशा त्वेषपूर्ण घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये जाेरदार झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकारकडून दडपले जात असल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राजधानी दिल्ली वगळता देशभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापुरातही दाभोळकर कॉर्नर चौकात सकाळी ११ ते १ यावेळेत चक्काजामचे आयोजन समन्वय समितीकडून केले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आंदोलक ११ वाजल्यापासून दाभोळकर कॉर्नर चौकात जमले. याठिकाणी तासभर भाषणे झाल्यानंतर चक्काजाम करण्यासाठी मानवी साखळी करण्यास सुरुवात करताच शांत बसलेले पोलीस एकदम आक्रमक झाले.

एकाचवेळी शंभरभर पोलीस रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या कारवाईमुळे आंदोलकांचाही गोंधळ उडाला. उदय नारकर, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे यांना ओढतच गाडीत कोंबण्यात आले. एवढ्यात माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलकांमध्ये पुन्हा जोश संचारला. शेट्टी यांनी चौकातच ठिय्या मारल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आधीच व्हीनस कॉर्नर, कावळा नाका येथून वाहतून अन्य मार्गाने वळवली होती. पोलिसांनी कडे करुन शेट्टी यांनाही उचलून पोलीस व्हॅनमध्ये नेले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. सर्व आंदोलकांना शाहूपुरीत पोलिसांनी नेले. काहीवेळ थांबवून घेत नंतर सुटका करण्यात आली.

या आंदाेलनात दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, गिरीश फोेडे, बी. एल. बरगे, रघुनाथ कांबळे यांच्यासह डाव्या संघटनांचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चौकट ०१

कोल्हापूरकरांनो साथ द्या

अन्यायी कायदे दुरुस्त करायला कोल्हापूरकर भाग पाडतात, हे टोल आंदोलनातून दाखवून दिले आहे. आता अन्यायी शेतकरी कायदेही रद्द करण्यासाठी दीर्घपल्ल्यांची लढाई लढण्यास कोल्हापूरकर सज्ज आहेत. सरकारला विचार करायला भाग पाडणारे आंदोलन कोल्हापुरातून उभारु, साथ द्या, असे भावनिक आवाहन चंद्रकांत यादव यांनी केले.