शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

By admin | Updated: November 14, 2016 00:37 IST

आर्थिक तरतूद : प्रत्येक जिल्ह्यासाठी सव्वा लाखाचा निधी; बालगृहांसाठी भेट

भंडारा : आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्र हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे खर्च होतो का, हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. कारण, आज अनेक मोठ्या घरांतील मुलांना मिळणारा पॉकेटमनी ते बेटींगवर खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि या निमित्ताने पॉकेटमनीच्या उपयोगाबाबतही वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास असतो हे मान्य, पण तरीही तो तुम्ही दिलेल्या पॉकेटमनीचा दुरुपयोग तर करित नाही ना हे सुध्दा लक्षात घेणं महत्वाच असतं. मुलांच्या गरजा ओळखूनच पालकांनी पॉकेटमनी दिला पाहिजे. यासाठी आधी त्याचा अंदाज घेण गरजेचं आहे. म्हणजे, कॉलेजला जाण्यायेण्याचा खर्च, बसनं जातोय, की बाईक आहे, मग पेट्रोल किती लागेल, क्लासला जात असेल, त्याचा वाहतुकीचा खर्च, बाहेर खाण्या-पिण्याचा खर्च या सगळ्या बाबींचा पालकांनी नीट विचार करुन मुलांना पॉकेटमनी द्यावा. आपला पाल्य पॉकेटमनीचा दुरुपयोग करीत असेल तर ते त्याच्या वागणुकीतून दिसत असत. म्हणजे अचानक त्याचं वागणं बदलण, चिडचिडा स्वभाव होणं, संगत बदलणं, यावर नजर ठेवून राहू नये. हल्ली बहुतेक घरात मुलांची स्वत:ची बँक अकाऊंटस असतात. पालक त्यातच दर महिन्याला एक ठराविक रक्कम डिपॉझिट करतात. या अकाऊंटचं एटीएम कार्ड मुलांकडेच देण्यात येतं. काही घरांमध्ये तर मुलांवर पूणर्त: विश्वास ठेवून फक्त डेबीट कार्डच नव्हे, तर व्रेष्ठडिट काडर्ही देण्यात येतं. या पॉकेटमनीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेरचं खाणं, फास्ट पूष्ठड, डिझायनर कपडे, गिफ्ट्स, मोबाईल बिल्स, सिनेमा, कॉस्मेटिक्स, चॉकलेट्स या साठयाचा खर्च भागवायचा असतो. मित्र मैत्रिणीसोबत भटकंतीच्या प्लॅन्समध्येही खिसा चांगलाच हलका होतो. सध्याच्या तरुणाईसाठी प्रेझेंटेबल दिसणं सर्वाधिक महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा ब्रँडेड कपड्यांवर होतो. मुलींचा होणारा एक आणखी ब्युटिपार्लरची पेष्ठरी. अर्थात हा असा नट्टापट्टा फक्त मुलींची मक्तेदारी राहिली नसल्याने ब्युटी ट्रिटमेंटरवर पोरांचाही बराच पैसा खर्च होतो. त्यातच तुमची कोणी खास मैत्रीण किंवा मित्र असेल तर खर्चाचा हा आकडा भलतांच पुढे जातो. महागडे कॉफी शॉप्स, मॉल्स्, जॉइंटस, मल्टिप्लेक्स इथे तर पैसा कसा खर्च होतो काही कळतंच नाही. सध्याची पिढी सॉलिड टेक्नोसॅव्ही असल्याने नवनव्या गॅजेटस्मध्ये हा पॉकेटमनी हरवून जातो. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर एसएमएस पॅकसोबत इंटरनेट पॅक मारावाच लागतो. या भल्या पॅकेजमुळे महिनाअखेर आला की तंगी जाणवतेच. किती काही केलं तरी महिन्याच्या शेवटी आपली झोळी फाटकीच राहते. त्यासाठी मुलांनी गरजेनुसार खर्च केला पाहिजे. पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)