शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

By admin | Updated: November 14, 2016 00:37 IST

आर्थिक तरतूद : प्रत्येक जिल्ह्यासाठी सव्वा लाखाचा निधी; बालगृहांसाठी भेट

भंडारा : आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्र हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे खर्च होतो का, हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. कारण, आज अनेक मोठ्या घरांतील मुलांना मिळणारा पॉकेटमनी ते बेटींगवर खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि या निमित्ताने पॉकेटमनीच्या उपयोगाबाबतही वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास असतो हे मान्य, पण तरीही तो तुम्ही दिलेल्या पॉकेटमनीचा दुरुपयोग तर करित नाही ना हे सुध्दा लक्षात घेणं महत्वाच असतं. मुलांच्या गरजा ओळखूनच पालकांनी पॉकेटमनी दिला पाहिजे. यासाठी आधी त्याचा अंदाज घेण गरजेचं आहे. म्हणजे, कॉलेजला जाण्यायेण्याचा खर्च, बसनं जातोय, की बाईक आहे, मग पेट्रोल किती लागेल, क्लासला जात असेल, त्याचा वाहतुकीचा खर्च, बाहेर खाण्या-पिण्याचा खर्च या सगळ्या बाबींचा पालकांनी नीट विचार करुन मुलांना पॉकेटमनी द्यावा. आपला पाल्य पॉकेटमनीचा दुरुपयोग करीत असेल तर ते त्याच्या वागणुकीतून दिसत असत. म्हणजे अचानक त्याचं वागणं बदलण, चिडचिडा स्वभाव होणं, संगत बदलणं, यावर नजर ठेवून राहू नये. हल्ली बहुतेक घरात मुलांची स्वत:ची बँक अकाऊंटस असतात. पालक त्यातच दर महिन्याला एक ठराविक रक्कम डिपॉझिट करतात. या अकाऊंटचं एटीएम कार्ड मुलांकडेच देण्यात येतं. काही घरांमध्ये तर मुलांवर पूणर्त: विश्वास ठेवून फक्त डेबीट कार्डच नव्हे, तर व्रेष्ठडिट काडर्ही देण्यात येतं. या पॉकेटमनीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेरचं खाणं, फास्ट पूष्ठड, डिझायनर कपडे, गिफ्ट्स, मोबाईल बिल्स, सिनेमा, कॉस्मेटिक्स, चॉकलेट्स या साठयाचा खर्च भागवायचा असतो. मित्र मैत्रिणीसोबत भटकंतीच्या प्लॅन्समध्येही खिसा चांगलाच हलका होतो. सध्याच्या तरुणाईसाठी प्रेझेंटेबल दिसणं सर्वाधिक महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा ब्रँडेड कपड्यांवर होतो. मुलींचा होणारा एक आणखी ब्युटिपार्लरची पेष्ठरी. अर्थात हा असा नट्टापट्टा फक्त मुलींची मक्तेदारी राहिली नसल्याने ब्युटी ट्रिटमेंटरवर पोरांचाही बराच पैसा खर्च होतो. त्यातच तुमची कोणी खास मैत्रीण किंवा मित्र असेल तर खर्चाचा हा आकडा भलतांच पुढे जातो. महागडे कॉफी शॉप्स, मॉल्स्, जॉइंटस, मल्टिप्लेक्स इथे तर पैसा कसा खर्च होतो काही कळतंच नाही. सध्याची पिढी सॉलिड टेक्नोसॅव्ही असल्याने नवनव्या गॅजेटस्मध्ये हा पॉकेटमनी हरवून जातो. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर एसएमएस पॅकसोबत इंटरनेट पॅक मारावाच लागतो. या भल्या पॅकेजमुळे महिनाअखेर आला की तंगी जाणवतेच. किती काही केलं तरी महिन्याच्या शेवटी आपली झोळी फाटकीच राहते. त्यासाठी मुलांनी गरजेनुसार खर्च केला पाहिजे. पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)