शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शहराशेजारचे निर्जन माळ गुन्हेगारी कारवाईची केंद्रे

By admin | Updated: May 18, 2015 01:20 IST

पोलीस गस्तीची गरज : कात्यायनी, गिरगाव, पाचगावचे माळ लक्ष्य

एकनाथ पाटील / कोल्हापूर डोंगर-दऱ्या, खुरटी झुडपे आणि स्मशान शांतता असलेल्या शहराशेजारील कात्यायनी, पाचगाव व गिरगाव परिसरातील माळ खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुन्हेगारांना सुरक्षित ठिकाण बनली आहेत. एक महिन्यापूर्वी कात्यायनी परिसरात एका युवतीचा खून करण्यात आला होता. त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. तोपर्यंत लहू ढेकणे याचा शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून मृतदेह पाचगाव-गिरगाव येथील डोंगरात टाकण्यात आला. या घटनांमुळे या परिसरात, शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. करवीर व गोकुळ शिरगाव या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादामुळे या परिसरात पोलिसांची गस्त नाही. याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी या निर्जन परिसराला लक्ष केले आहे. कात्यायनी, पाचगाव व गिरगाव गावातील या माळरानाच्या सीमा एकमेकांस लागून आहेत. डोंगराळ भाग असलेल्या या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने कोणी एकटे-दुकटे जाण्याचे धाडस करीत नाही. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशान शांतता असते. निर्जन, निसर्गसौंदर्याचा व धार्मिक परिसर म्हणून कात्यायनी परिसराची ओळख वाढू लागल्याने या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढू लागला. निर्जनस्थळी आलेल्या प्रेमीयुगलांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गांसाठी वापर करीत आहेत. दि. १९ एप्रिलला कात्यायनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चरीत २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिचा चेहरा ओळखू नये यासाठी चेहऱ्यावर सत्तर किलोंचा दगड ठेवण्यात आला होता. अशा घटनांनी या परिसरात गवत कापणे, गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी व शेतकरी या घटनांमुळे चक्रावून गेले आहेत. कणेरीवाडी येथील पाझर तलावात दि. ६ एप्रिल रोजी चाळीस वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह खून करून पोत्यात बांधून टाकलेला गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळून आला होता. या खुनाचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. हादेखील परिसर निर्जन आहे.