शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शहराशेजारचे निर्जन माळ गुन्हेगारी कारवाईची केंद्रे

By admin | Updated: May 18, 2015 01:20 IST

पोलीस गस्तीची गरज : कात्यायनी, गिरगाव, पाचगावचे माळ लक्ष्य

एकनाथ पाटील / कोल्हापूर डोंगर-दऱ्या, खुरटी झुडपे आणि स्मशान शांतता असलेल्या शहराशेजारील कात्यायनी, पाचगाव व गिरगाव परिसरातील माळ खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुन्हेगारांना सुरक्षित ठिकाण बनली आहेत. एक महिन्यापूर्वी कात्यायनी परिसरात एका युवतीचा खून करण्यात आला होता. त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. तोपर्यंत लहू ढेकणे याचा शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून मृतदेह पाचगाव-गिरगाव येथील डोंगरात टाकण्यात आला. या घटनांमुळे या परिसरात, शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. करवीर व गोकुळ शिरगाव या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादामुळे या परिसरात पोलिसांची गस्त नाही. याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी या निर्जन परिसराला लक्ष केले आहे. कात्यायनी, पाचगाव व गिरगाव गावातील या माळरानाच्या सीमा एकमेकांस लागून आहेत. डोंगराळ भाग असलेल्या या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने कोणी एकटे-दुकटे जाण्याचे धाडस करीत नाही. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशान शांतता असते. निर्जन, निसर्गसौंदर्याचा व धार्मिक परिसर म्हणून कात्यायनी परिसराची ओळख वाढू लागल्याने या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढू लागला. निर्जनस्थळी आलेल्या प्रेमीयुगलांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गांसाठी वापर करीत आहेत. दि. १९ एप्रिलला कात्यायनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चरीत २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिचा चेहरा ओळखू नये यासाठी चेहऱ्यावर सत्तर किलोंचा दगड ठेवण्यात आला होता. अशा घटनांनी या परिसरात गवत कापणे, गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी व शेतकरी या घटनांमुळे चक्रावून गेले आहेत. कणेरीवाडी येथील पाझर तलावात दि. ६ एप्रिल रोजी चाळीस वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह खून करून पोत्यात बांधून टाकलेला गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळून आला होता. या खुनाचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. हादेखील परिसर निर्जन आहे.