शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कार, मोटारसायकली पेटविल्या

By admin | Updated: January 1, 2015 00:34 IST

ताराबाई रोडवरील घटना : रसायने, पेट्रोलचा वापर; अज्ञात हल्लेखोरांचे कृत्य

कोल्हापूर : येथील ताराबाई रोडवरील जाधव गल्लीमध्ये माजी महापौर बाळासाहेब जाधव-कसबेकर यांच्या घरासमोर पार्किंग केलेल्या आलिशान आॅडी मोटारीसह तीन मोटारसायकली अज्ञात हल्लेखोरांनी काल, मंगळवारी मध्यरात्री रसायने व पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. त्यामध्ये चार गाड्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, गाड्या पेटविणारे कोण, याचा शोध जुना राजवाडा पोलिसांसह नागरिक घेत आहेत. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, अनिल बाळकृष्ण जाधव (वय ६१, रा. जाधव गल्ली, ताराबाई रोड) हे रात्री अकरा वाजता जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची दारात लावलेली पल्सर मोटारसायकल पेटत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मिसाळ यांनी पाहिले. त्यांनी जाधव यांना दार ठोठावून याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी घरातील पाणी मारून आग विझविली.भरत जनार्दन जाधव यांची मोटारसायकल (एमएच ०९ वाय ३५५५), मुकुंद सदाशिव कुलकर्णी (तोफखाने बोळ) यांची मोपेड व नरेंद्र ओसवाल यांच्या आॅडी (एमएच ०४ आर ३२५०) गाडीचे कव्हरही पेटवून दिले होते. अचानक गाड्या पेटवून दिल्याने परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी रस्त्यावर येऊन गाड्या पेटविणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या जुना राजवाडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हल्लेखोरांनी रसायनाच्या साहाय्याने गाड्या पेटविल्याचे निदर्शनास आले. एका गाडीजवळ पेट्रोलच्या दोन बाटल्या पोलिसांना मिळून आल्या. काही रसायने पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली. मोटारसायकलींच्या पेट्रोलच्या केबल कट केल्याचेही निदर्शनास आले. हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.