शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी ...

कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी उद्योग वाढविला. त्यांनी दिलेला उद्योगाचा वारसा सध्याच्या आणि नव्यापिढीने नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेवून जावा. उद्योगाचा विकास करावा, असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा यांनी रविवारी येथे केले.

येथील शिवाजी उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (केईए) बुधवारी (दि.७) अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत असून त्याच्या बोधचिन्हाच्या (लोगो) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. मी भाग्यवान आहे, कारण या ‘केईए’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी अध्यक्ष होतो आणि आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण माझ्या हस्ते झाले आहे. उद्योग उभारणीचा सुरुवातीचा काळ आव्हानात्मक, समस्यांचा होता. मात्र, जिद्दी, कष्टाळू उद्योजकांनी त्यावर मात करत उद्योग सुरू केले. त्यात उद्योजक एस. ए. पाटील, वाय. पी. पोवार, राम मेनन आदींचे योगदान मोलाचे आहे. संस्थान विलीनीकरणात उद्योगांना जागा मिळावी यासाठी उद्योजक एस. ए. पाटील यांनी तर स्वत:कडील दागिने गहाण ठेवून संस्थानाकडे पैसे भरले. त्यानंतर कोल्हापूरच्या उद्योगनगरीची सुरुवात झाली. पुढे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन या आपल्या मातृसंस्थेची स्थापना झाली. अनेक आव्हानांचा सामना करत या संस्थेसह उद्योग वाढत राहिला. संस्थेच्या इतिहास लक्षात घेऊन संचालकांनी कार्यरत राहावे. नवउद्योजक, उद्योगांना ताकद द्यावी, असे आवाहन बाबाभाई वसा यांनी केले. उद्योग विकासाचे ध्येय घेवून एका विचाराने कार्यरत असणाऱ्या संचालकांमुळे आपली मातृसंस्था केईए ही अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. जुन्या पिढीतील उद्योजकांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवल्याने कोल्हापूरचा उद्योग वाढला असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, रणजित शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगांवकर, प्रकाश चरणे, श्रीकांत देसाई, प्रदीप व्हरांबळे, मिलिंद सार्दळ उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी प्रास्ताविक केले. सचिव दिनेश बुधले यांनी आभार मानले.

चौकट

तर पहिला ट्रॅक्टर ट्रेलर कोल्हापुरातील असता

सन १९७५-७६ मध्ये कोल्हापुरातील उद्योजक हे म्यानमार येथील कंपनीशी करार करून तेथील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जपानलाही गेले. या उद्योजकांना आणखी साथ मिळाली असती तर पहिला टॅक्टर ट्रेलर हा कोल्हापूरमध्ये तयार झाला असता. परंतु ते शक्य झाले नाही, अशी खंत बाबाभाई वसा यांनी व्यक्त केली.