शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रितेशकुमार यांची बदली रद्द करा

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

‘भाकप’च्या बैठकीत मागणी : आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

कोल्हापूर : फक्त एक वर्षाचा सेवा कार्यकाळ झाला असताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या झालेल्या अचानक बदलीमुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. यामुळे भाकप नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प होऊ शकतो. यासाठी रितेशकुमार यांची बदली रद्द करावी, अशी मागणी बुधवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात आज, गुरुवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाणार आहे.बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या अचानक झालेल्या बदलीबाबत चर्चा झाली. एक वर्षाचा कार्यकाळ झाला असतानाही त्यांची अचानक बदली होते. हे करून सरकारला गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडू द्यायचे नाही आहे का? असा प्रश्न उभा राहतो. रितेशकुमार यांच्या चांगल्या पद्धतीने आताच तपास सुरू केला आहे. यासाठी त्यांनी राज्यासह इतर राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन तपासाच्या दृष्टीने आपली कार्यवाही सुरू ठेवली आहे. तपासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ पथके नेमण्यात आली आहेत. असे असताना त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे तपास ठप्प होऊ शकतो. तसेच भाकपच्या कार्यकर्त्यांनी तपासाबाबत रितेशकुमार यांच्यावर तपासाबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित न करता बदलीचीही मागणी केलेली नाही. असे असताना सरकारने अचानक केलेली बदली संशयास्पद वाटत आहे, अशा भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.या संदर्भात आज, गुरुवारी दुपारी दोन वाजता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास दोन महिने होऊनही लागलेला नाही. तो जलदगतीने होऊन मारेकऱ्यांना तातडीने पकडावे, रितेशकुमार यांचा तपास शीघ्रगतीने सुरू आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.बैठकीला दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, एस. बी. पाटील, मिलिंद कदम, राजू यादव, सुशीला यादव, आशा कुकडे, शिवाजी शिंदे, विक्रम कदम, दिलदार मुजावर, सुभाष वाणी, उमेश पानसरे, उमेश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.गोयल यांच्या बदलीची अडचणपानसरे हत्येचा तपास करणारे अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची काही दिवसांत पदोन्नतीवर बदली होणार आहे. त्यांची बदली झाल्यास या प्रकरणाचा तपासच कोलमडणार आहे. त्यामुळे त्यांचीही बदली रद्द व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.