शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

बावडा ‘एसटीपी’चा आज फैसला होणार

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

पंचगंगा प्रदूषण : जयंती नाला नदीत सोडण्याबाबत होणार बैठक; नाला सोडण्याशिवाय गत्यंतर नाही : महापालिका

कोल्हापूर : कसबा बावडा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. एसटीपी १०० टक्के बंद ठेवून रखडलेल्या ३०० मीटरच्या कामासाठी किमान पंधरा दिवस उपसा बंद करून जयंती नाला नदीत सोडणे गरजेचे आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज, गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, पंचगंगा प्रदूषण प्रश्नी याचिकाकर्ते, आदी सर्वांची बैठक बोलावली आहे. जयंती नाला पंचगंगेत सोडल्याखेरीज एसटीपी सुरू होणे अशक्य असल्याने यावर एकमत होण्याची शक्यता आहे.कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया क रणारे ७५ कोटींच्या एसटीपी केंद्राचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. न्यायालयाने गेल्या दीड वर्षात चार वेळा ‘डेडलाईन’ दिली. न्यायालयाने दिलेली ३१ जानेवारी २०१५ ची अंतिम मुदतही संपली. यानंतर पंचनामा करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट आयुक्तांना नोटीस पाठविली. मात्र, केंद्र पूर्ण क्षमतेने सुरूच होऊ शकले नाही. ‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तर संपूर्णपणे खासगी शेतातून जाते. त्यामुळे सुरुवातीस या पाईपलाईनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. पाईपलाईनला विरोध करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जुना व नवा असे दोन्ही एसटीपी प्रकल्प पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)