शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

वीज बिल थकबाकीचे ओझे ग्रामपंचायतींना सोसवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : थकीत वीज बिलामुळे गावागावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग अलीकडे ग्रामस्थांना अनुभवयास ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : थकीत वीज बिलामुळे गावागावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग अलीकडे ग्रामस्थांना अनुभवयास येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन तोडल्याची नामुष्की सोसावी लागत आहे. लाखो रुपयांच्या बिलाची व्यवस्था करताना ग्रामपंचायतीची मात्र दमछाक होत असून, व्यवस्थापनाचा अभाव अन् पाणीपट्टी वसुलीचे नियोजन नसल्याचा फटका कनेक्शन तोडण्यास बसत आहे. कठोर नियमांची अंमलबजावणी केली तरच पाणीपुरवठाचे वीज कनेक्शन तोडण्याची वेळ येणार नाही.

कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या दोन्ही वर्षांतील मार्चचा महिना ग्रामपंचायतींना वसुलीशिवायच गेल्याची अवस्था पहावी लागली आहे. त्यातच जुनी लाखो रुपयांची थकबाकी डोक्यावर आहेत. त्यामुळे वीजवितरणचे बिलाचे पैसे देणे म्हणजे ग्रामपंचयतीसमोर दिव्यच बनले.

दुसरीकडे महावितरणला थकीत बिलाची वसुली करणे क्रमप्राप्त बनले. त्यांनीही बिल भरण्यासाठी तगादा लावणे सुरू केला. पण ग्रामपंचायतींना पाणीपट्टी वसुलीचे पैसेच आवश्यक तितके जमा करता आले नाहीत. त्यामुळे बिल भरणे शक्य झाले नाही. नाइलाजाने अशा शेकडो गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ वीजवितरण कंपन्यांवर आली. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा रोष ओढावून घेण्याची वेळ आली.

हातकणंगले तालुक्यातील पश्चिम विभागातील अनेक गावच्या सरपंचांची वीज कनेक्शन तोडण्याचा मोहिमेला विरोध करण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये काही मागण्या करून पर्याय सुचविण्यात आले, पण त्याची दखल मात्र वीज विभागाने घेतलेली नाही.

एकेक गावात तर सदस्यांनी वर्गणी काढून बिले भरली. विशेष म्हणजे पाणीपट्टीची वसुली वेळेत करणाऱ्या काही गावांनी मात्र बिले वेळेत भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात सातत्य राखले आहे.

दरम्यान, शासनाच्या ग्रामविकास विभागाने आठवड्यापूर्वी पाणीपुरवठा योजनांची वीजदेयके १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. यामुळे ग्रामपंचायतींसमोरचे वीज बिल भरण्याचे ओझे थोडे कमी झाले आहे. पण या निर्णयास थोडा उशीर झाला आहे. कारण १५ व्या वित्त आयोगातील कामाचा आराखडा बहुधा जानेवारीत तयार करण्यात आला आहे. त्या पद्धतीने तो खर्च करावा लागतो. आता वीज बिल भरण्यासाठी निधी खर्च करण्यासाठी आराखड्याच्या संदर्भात बदल प्रस्ताव तयार करून तो पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठवून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यांनतर बिल भरण्यास हातभार लागेल.

एकंदरीत कनेक्शन तोडण्याची नामुष्की आणि थकबाकीचे ओझे कमी करताना कमालीची कसरत मात्र ग्रामपंचायतीची होत आहे.