शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल थकबाकीचे ओझे ग्रामपंचायतींना सोसवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : थकीत वीज बिलामुळे गावागावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग अलीकडे ग्रामस्थांना अनुभवयास ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : थकीत वीज बिलामुळे गावागावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग अलीकडे ग्रामस्थांना अनुभवयास येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना वीज कनेक्शन तोडल्याची नामुष्की सोसावी लागत आहे. लाखो रुपयांच्या बिलाची व्यवस्था करताना ग्रामपंचायतीची मात्र दमछाक होत असून, व्यवस्थापनाचा अभाव अन् पाणीपट्टी वसुलीचे नियोजन नसल्याचा फटका कनेक्शन तोडण्यास बसत आहे. कठोर नियमांची अंमलबजावणी केली तरच पाणीपुरवठाचे वीज कनेक्शन तोडण्याची वेळ येणार नाही.

कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या दोन्ही वर्षांतील मार्चचा महिना ग्रामपंचायतींना वसुलीशिवायच गेल्याची अवस्था पहावी लागली आहे. त्यातच जुनी लाखो रुपयांची थकबाकी डोक्यावर आहेत. त्यामुळे वीजवितरणचे बिलाचे पैसे देणे म्हणजे ग्रामपंचयतीसमोर दिव्यच बनले.

दुसरीकडे महावितरणला थकीत बिलाची वसुली करणे क्रमप्राप्त बनले. त्यांनीही बिल भरण्यासाठी तगादा लावणे सुरू केला. पण ग्रामपंचायतींना पाणीपट्टी वसुलीचे पैसेच आवश्यक तितके जमा करता आले नाहीत. त्यामुळे बिल भरणे शक्य झाले नाही. नाइलाजाने अशा शेकडो गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ वीजवितरण कंपन्यांवर आली. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा रोष ओढावून घेण्याची वेळ आली.

हातकणंगले तालुक्यातील पश्चिम विभागातील अनेक गावच्या सरपंचांची वीज कनेक्शन तोडण्याचा मोहिमेला विरोध करण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये काही मागण्या करून पर्याय सुचविण्यात आले, पण त्याची दखल मात्र वीज विभागाने घेतलेली नाही.

एकेक गावात तर सदस्यांनी वर्गणी काढून बिले भरली. विशेष म्हणजे पाणीपट्टीची वसुली वेळेत करणाऱ्या काही गावांनी मात्र बिले वेळेत भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात सातत्य राखले आहे.

दरम्यान, शासनाच्या ग्रामविकास विभागाने आठवड्यापूर्वी पाणीपुरवठा योजनांची वीजदेयके १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. यामुळे ग्रामपंचायतींसमोरचे वीज बिल भरण्याचे ओझे थोडे कमी झाले आहे. पण या निर्णयास थोडा उशीर झाला आहे. कारण १५ व्या वित्त आयोगातील कामाचा आराखडा बहुधा जानेवारीत तयार करण्यात आला आहे. त्या पद्धतीने तो खर्च करावा लागतो. आता वीज बिल भरण्यासाठी निधी खर्च करण्यासाठी आराखड्याच्या संदर्भात बदल प्रस्ताव तयार करून तो पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठवून त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यांनतर बिल भरण्यास हातभार लागेल.

एकंदरीत कनेक्शन तोडण्याची नामुष्की आणि थकबाकीचे ओझे कमी करताना कमालीची कसरत मात्र ग्रामपंचायतीची होत आहे.