शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सांस्कृतिक दहशतवाद रोखण्यास व्यापक चळवळ

By admin | Updated: March 25, 2015 00:39 IST

मूलनिवासी संघाचा परिसंवाद : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर : मेघा पानसरे

कोल्हापूर : शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि त्याचे आचरण हाच सांस्कृतिक दहशतवादाला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे़ यासाठी पुरोगामी संघटना आणि डाव्या पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर आधारित व्यापक चळवळ उभारणे हीच डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोेविंद पानसरे यांच्या हौतात्म्याला खरी सलामी ठरेल, असा सूर ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने व जबाबदाऱ्या’ या परिसंवादात निघाला़ मूलनिवासी संघातर्फेकोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सोमवारी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ प्रभाकर निसर्गंध होते़ प्रा़ मेघा पानसरे म्हणाल्या, भाजपचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर गोविंद पानसरे यांनी नथुराम गोडसे प्रवृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेण्याचे तंत्र अवलंबले होते़ या धर्मांध आणि सनातनी शक्तीची काळी बाजू थेट मांडली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती़ हल्ला होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशीही त्यांनी गोडसे प्रवृत्तीचा गांधीजींच्या खुनावरून खरपूस समाचार घेतला होता़ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पुरोगामी विचारांच्या प्रसाराचा वैचारिक ठेवा संपविण्यासाठी धर्मांध शक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला़ पानसरे म्हणाल्या, डॉ़ दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़; पण प्रबोधनाची ही लढाई अखंडित सुरू ठेवण्यासाठी निर्भीडपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे़ डॉ़ शरद गायकवाड म्हणाले, चार्वाक ते पानसरेंच्या हत्येच्या इतिहासाला विकृत मनुवृत्तीची झालर आहे़ सत्ताधाऱ्यांना मारेकरी माहीत आहेत; पण त्यांना ते शोधायचे नाहीत़ त्यामुळे ही लढाई पुरोगामी आणि प्रतिगामी अशी असून ही लढाई जिंकण्यासाठी बुद्धाची शांती आणि भीमाची क्रांती यावर आधारित संघर्षाची गरज आहे़ डॉ़ राजेंद्र कुंभार म्हणाले, सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सांस्कृतिक दहशतवाद समजून घेतला पाहिजे़ मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, दलित महासंघाचे लाला नाईक, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वायदंडे, संभाजी कांबळे, रघुनाथ मांडरे, बाळासाहेब भोसले, आदींची भाषणे झाली़